शहरं
Join us  
Trending Stories
1
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
2
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
3
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
4
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
5
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
6
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
7
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
8
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
9
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
10
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
11
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
12
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
13
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
14
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
15
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
16
Chipi Airport: चिपी विमानतळ सेवा पुन्हा सुरू होणार; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
17
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
18
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
19
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
20
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!

‘एमआयडीसी’साठी जमीन देणार नाही

By admin | Updated: April 7, 2015 01:23 IST

आकुर्डे ग्रामस्थांचा विरोध : ‘एमआयडीसी’च्या प्रादेशिक अधिकाऱ्यांंना निवेदन

कोल्हापूर : मौजे आकुर्डे (ता. भुदरगड) येथील पठारावरील जमीन शासनाने २००३ मध्ये ‘एमआयडीसी’साठी संपादित केली आहे; परंतु आजतागायत त्यावर काहीही केलेले नाही. तसेच येथील गट क्रमांकावर आरक्षणाचा शेरा पडल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे ही जमीन शासनास देण्यास विरोध आहे, असे निवेदन सोमवारी ग्रामस्थांच्यावतीने ‘एमआयडीसी’चे प्रादेशिक अधिकारी अशोक पाटील यांना दिले.आकुर्डे येथील जमीन २००३ मध्ये ‘एमआयडीसी’साठी शासनाने संपादित केली आहे. तेथील गट क्रमांकावर याबाबतचा शेरा नोंद केल्यामुळे २००३ पासून शेतकऱ्यांच्या प्रापंचिक गरजेपोटी त्या जमिनीवर कोणत्याही प्रकारचे कर्जकाढता आलेले नाही. तसेच कौटुंबिक व व्यक्तीगत गरजेपोटी जमीन विक्री करता आलेली नाही. जमीन संपादित केली; पण त्यावर काहीही न झाल्याने शेतकऱ्यांवर फार मोठा अन्याय झाला आहे. शासनाने १३ वर्षांत काहीही केले नसल्यामुळे आता ही जमीन ‘एमआयडीसी’स देण्यास ग्रामस्थांचा विरोध आहे.शासनाने २०१० मध्ये संबंधित शेतकऱ्यांची तत्कालीन जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख, प्रांताधिकारी विवेक आगवणे, तहसीलदार मोहिनी चव्हाण, आमदार के. पी. पाटील, माजी आमदार बजरंग देसाई यांच्यासमवेत बैठक घेऊन प्रति हेक्टरी सात लाख दहा हजार इतका दर ठरविण्यात आला होता; परंतु तो देखील शासनाने शेतकऱ्यांना दिला नाही. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. शासनावर शेतकऱ्यांचा कोणत्याही प्रकारे विश्वास राहिलेला नाही. तरी भूसंपादनाला आमचा विरोध राहील, असे या निवेदनात म्हटले आहे.शिष्टमंडळात नितीन पोवार, कृष्णात पाटील, शशिकांत पोवार, दत्तात्रय पोवार, कृष्णा पोवार, सदाशिव पाटील, विश्वास पोवार, आनंदा पाटील, बापू कुंभार, पांडू कुंभार, आदींसह ग्रामस्थांचा समावेश होता. (प्रतिनिधी)