शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
3
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
4
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
5
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
6
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
7
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
8
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
9
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
10
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
11
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
12
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
13
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
14
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
15
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
16
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
17
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
18
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
19
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
20
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार

जमीन मोजणीच्या गाडीला सुसाट वेग

By admin | Updated: May 23, 2015 00:32 IST

मुंबई-गोवा महामार्ग : जिल्ह्यात चौपदरीकरणाचा मार्ग मोकळा

प्रकाश वराडकर -रत्नागिरी--मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणासाठी आवश्यक असलेल्या वाढीव जमिनीच्या मोजणीची गाडी गेल्या दीड महिन्यात सुसाट वेगाने धावत आहे. जिल्ह्यात जमीन मोजणीच्या १०२ पैकी ८३ ठिकाणची मोजणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे ८० टक्क्यांपेक्षा अधिक काम पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील जमीनमोजणीचे काम ७ जून २०१५ पर्यंत पूर्ण करण्याचे प्रशासनाकडून महामार्ग विभागाला आदेश होते. त्यानुसार जिल्ह्यातील यंत्रणेने हे काम अंतिम टप्प्यात आणले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात १०२ ठिकाणी जमीन मोजणी होणार आहे. दीड महिन्यापूर्वी त्यातील केवळ ६ ठिकाणीच मोजणी पूर्ण झाली होेती. परिणामी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एप्रिल २०१५ पासून चौपदरीकरण काम सुरू करण्याचा जाहीर केलेला मुहूर्त हुकला होता. जमीन मोजणीचे केवळ सहा टक्केच काम पूर्ण झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिध्द केल्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली होती. दीड महिन्यापूर्वी संबंधित विभागांची बैठक घेऊन जिल्हा प्रशासनाने ७ जून २०१५पूर्वी मोजणीचे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग विभाग व भूमी अभिलेख विभागाने जोरदार मोहीम हाती घेत महामार्गासाठी लागणाऱ्या जमीन मोजणीचे काम ९० टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाणात पूर्ण केले आहे. रत्नागिरी व संगमेश्वर तालुक्यात जमीन मोजणीचे हे काम ९७ टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहे. मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या ४२०० कोटी खर्चाच्या कामाला केंद्र सरकारने मंजुरी दिली असून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या प्रकल्पाच्या पूर्णत्त्वासाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. चौपदरीकरणाचे काम लवकरात लवकर सुरू करता यावे म्हणून गडकरी यांनी रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांची डिसेंबर २०१४ मध्ये बैठकही घेतली होती. मात्र, त्यानुसार ३१ मार्चपर्यंत मोजणीचे काम दुर्लक्षितच राहिले होते. गेल्या दीड महिन्यात या कामाला खऱ्या अर्थाने वेग आला आहे. केवळ राजापूर तालुक्यातच सर्वाधिक भूसर्व्हेक्षण बाकी राहिले आहे.रत्नागिरी, संगमेश्वरमध्ये सर्वाधिक काम पूर्ण जिल्ह्यातील खेड तालुक्यात रस्त्याच्या जागेसाठी मोजणीची २५ ठिकाणे असून, त्यातील ११ ठिकाणी मोजणी पूर्ण झाली आहे. चिपळूण तालुक्यातील मोजणीच्या १४पैकी १२ ठिकाणी मोजणी झाली आहे. संगमेश्वर तालुक्यातील २३ पैकी २२ ठिकाणची मोजणी पूर्ण झाली आहे. म्हाबळे येथील मोजणी व्हावयाची आहे. रत्नागिरी तालुक्यात १२ पैकी ११ ठिकाणी मोजणी झाली आहे. खानू येथील मोजणी आक्षेपामुळे थांबली आहे. राजापूरमधील १७ पैकी १५ ठिंकाणी मोजणी पूर्ण झाली आहे. लांजा तालुक्यातील ११पैकी ९ ठिकाणची मोजणी पूर्ण झाली आहे. उर्वरित ठिकाणी येत्या ७ जूनपूर्वी मोजणी पूर्ण होईल, असा विश्वास राष्ट्रीय महामार्ग विभागाने व्यक्त केला आहे.