शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

हिंदुस्तान अँटिबायोटिक्सची जमीन विकणार

By admin | Updated: December 22, 2016 00:47 IST

आर्थिक विपन्नावस्थेमुळे बंद पडलेल्या हिंदुस्तान अँटिबायोटिक्स लि. (एचएएल) या केंद्र सरकारच्या मालकीच्या कंपनीची पुण्याजवळ

कोल्हापूर : कायद्याने १४ दिवसांत ‘एफआरपी’ देणे बंधनकारक असताना जिल्ह्यातील बहुतांश कारखान्यांनी कायदाच धाब्यावर बसविला आहे. यंदा साखरेचे दर चांगले असतानाही ३० नोव्हेंबरअखेर केवळ पाच कारखान्यांनी पूर्ण रक्कम अदा केली आहे. ऊस बिलापोटी कारखान्यांकडे अद्यापही सुमारे ३०० कोटी रुपये अडकले आहेत. यंदा उसाची कोंडी लवकर फुटल्याने जिल्ह्यात ५ नोव्हेंबरपासून गळीत हंगामास सुरुवात झाली. उसाचे उत्पादन कमी असल्याने साखरेचे दर स्थिर राहणार हे निश्चित होते. त्यानुसार गेले महिनाभर घाऊक बाजारात सरासरी ३४०० रुपये साखरेचा दर राहिला आहे. त्यामुळे उसाची पहिली उचल देण्यास कारखान्यांना फारशी अडचण राहणार नाही, अशी परिस्थिती आहे. हंगाम सुरू होऊन ४५ दिवस उलटले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात सुमारे ३५ लाख टनांपेक्षा अधिक उसाचे गाळप झाले आहे. १४ दिवसांत शेतकऱ्यांना एफआरपी देणे कायद्याने बंधनकारक आहे. तरीही साखर कारखान्यांच्या प्रथेप्रमाणे १५ दिवसांचे ऊस बिल राखूनच शेतकऱ्यांना पैसे दिले जातात. त्यानुसार ३० नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांना पैसे देणे अपेक्षित होते. परंतु, ‘दालमिया-आसुर्ले’, ‘दत्त-शिरोळ’, ‘डी. वाय. पाटील-असळज’, ‘गुरुदत्त-टाकळीवाडी’, ‘नलवडे शुगर्स-म्हाळुंगे’ या पाचच कारखान्यांनी पैसे अदा केल्याचे दिसते. उर्वरित कारखान्यांनी बिलांची घोषणा केली असली तरी अद्याप शेतकऱ्यांच्या हातात पैसे पडलेले नाहीत. चलन तुटवड्यामुळे दुधाची बिले शेतकऱ्यांना मिळत नाहीत. त्यात दीड महिना झाला तरी उसाचे पैसे मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. साखरेचे दर चांगले असतानाही कारखानदार १४ दिवसांचा कायदा पाळत नाहीत. याबाबत सरकारची भूमिका केवळ बघ्याचीच दिसत आहे. विभागात एक कोटी ८४ लाख टनांचे गाळपराज्यातील सात विभागांत आतापर्यंत एक कोटी ८४ लाख टन उसाचे गाळप झाले असून, सरासरी उतारा १०.१८ टक्के राहिला आहे. सर्वाधिक गाळप पुणे विभागात ७२ लाख ८६ हजार, तर कोल्हापूर विभागात ६३ लाख ५३ हजार टन झाले आहे. कोल्हापूर विभाग ११.३१ टक्के साखर उतारा राखत आघाडीवर राहिला आहे. गत वर्षीपेक्षा ६० लाख टनाने उसाचे उत्पादन कमी झाले आहे. कारखान्याकडून शेतकऱ्यांची कुचेष्टासरकारच्या पातळीवर ऊस बिलांचा साधा आढावा घेतला जात नाही, हे दुर्दैवी आहे.चौदा दिवसांचा नियम धाब्यावर