शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

हिंदुस्तान अँटिबायोटिक्सची जमीन विकणार

By admin | Updated: December 22, 2016 00:47 IST

आर्थिक विपन्नावस्थेमुळे बंद पडलेल्या हिंदुस्तान अँटिबायोटिक्स लि. (एचएएल) या केंद्र सरकारच्या मालकीच्या कंपनीची पुण्याजवळ

कोल्हापूर : कायद्याने १४ दिवसांत ‘एफआरपी’ देणे बंधनकारक असताना जिल्ह्यातील बहुतांश कारखान्यांनी कायदाच धाब्यावर बसविला आहे. यंदा साखरेचे दर चांगले असतानाही ३० नोव्हेंबरअखेर केवळ पाच कारखान्यांनी पूर्ण रक्कम अदा केली आहे. ऊस बिलापोटी कारखान्यांकडे अद्यापही सुमारे ३०० कोटी रुपये अडकले आहेत. यंदा उसाची कोंडी लवकर फुटल्याने जिल्ह्यात ५ नोव्हेंबरपासून गळीत हंगामास सुरुवात झाली. उसाचे उत्पादन कमी असल्याने साखरेचे दर स्थिर राहणार हे निश्चित होते. त्यानुसार गेले महिनाभर घाऊक बाजारात सरासरी ३४०० रुपये साखरेचा दर राहिला आहे. त्यामुळे उसाची पहिली उचल देण्यास कारखान्यांना फारशी अडचण राहणार नाही, अशी परिस्थिती आहे. हंगाम सुरू होऊन ४५ दिवस उलटले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात सुमारे ३५ लाख टनांपेक्षा अधिक उसाचे गाळप झाले आहे. १४ दिवसांत शेतकऱ्यांना एफआरपी देणे कायद्याने बंधनकारक आहे. तरीही साखर कारखान्यांच्या प्रथेप्रमाणे १५ दिवसांचे ऊस बिल राखूनच शेतकऱ्यांना पैसे दिले जातात. त्यानुसार ३० नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांना पैसे देणे अपेक्षित होते. परंतु, ‘दालमिया-आसुर्ले’, ‘दत्त-शिरोळ’, ‘डी. वाय. पाटील-असळज’, ‘गुरुदत्त-टाकळीवाडी’, ‘नलवडे शुगर्स-म्हाळुंगे’ या पाचच कारखान्यांनी पैसे अदा केल्याचे दिसते. उर्वरित कारखान्यांनी बिलांची घोषणा केली असली तरी अद्याप शेतकऱ्यांच्या हातात पैसे पडलेले नाहीत. चलन तुटवड्यामुळे दुधाची बिले शेतकऱ्यांना मिळत नाहीत. त्यात दीड महिना झाला तरी उसाचे पैसे मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. साखरेचे दर चांगले असतानाही कारखानदार १४ दिवसांचा कायदा पाळत नाहीत. याबाबत सरकारची भूमिका केवळ बघ्याचीच दिसत आहे. विभागात एक कोटी ८४ लाख टनांचे गाळपराज्यातील सात विभागांत आतापर्यंत एक कोटी ८४ लाख टन उसाचे गाळप झाले असून, सरासरी उतारा १०.१८ टक्के राहिला आहे. सर्वाधिक गाळप पुणे विभागात ७२ लाख ८६ हजार, तर कोल्हापूर विभागात ६३ लाख ५३ हजार टन झाले आहे. कोल्हापूर विभाग ११.३१ टक्के साखर उतारा राखत आघाडीवर राहिला आहे. गत वर्षीपेक्षा ६० लाख टनाने उसाचे उत्पादन कमी झाले आहे. कारखान्याकडून शेतकऱ्यांची कुचेष्टासरकारच्या पातळीवर ऊस बिलांचा साधा आढावा घेतला जात नाही, हे दुर्दैवी आहे.चौदा दिवसांचा नियम धाब्यावर