शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

मंदिर परिसरातील भूसंपादन अनावश्यक

By admin | Updated: April 17, 2015 00:05 IST

संघटनेचे महापौरांना निवेदन : अंबाबाई मंदिर विकास आराखडा फसवा असल्याचा आरोप

कोल्हापूर : अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखडा हा २००९ साली मांडलेल्या आराखड्याप्रमाणेच आहे. मंदिर परिसरातील जागा संपादित केल्याने ३०० कुटुंबे व ४०० व्यापाऱ्यांना फटका बसणार आहे. मोठी शाळाही स्थलांतरित करावी लागणार असून, महाद्वार ही व्यापारी गल्ली असणारी ओळख पुसली जाणार आहे. गरज नसताना या परिसरातील भूसंपादन करण्याचा घाट घातला जात आहे. तरी सोमवारच्या सभेपुढे येणारा अंबाबाई मंदिर विकास आराखडा मंजूर करू नये, अशी मागणी श्री अंबाबाई मंदिर परिसर रहिवासी व व्यापारी संघटनेने निवेदनाद्वारे महापौर तृप्ती माळवी यांच्याकडे गुरुवारी केली.चार वर्षांपूर्वी केलेला आराखडाच पुन्हा दुसऱ्या नावाने सादर केलेला आहे. यावेळी आराखड्याविरोधात जनआंदोलन उभे राहिले होते. परिसरातील सर्वच घटकांचा मंदिराशी असणाऱ्या संबंधाचा या आराखड्यात अभ्यास झालेला नाही. व्यापाऱ्यांना विस्थापित केल्यास त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे. विद्यापीठ हायस्कूल हलविल्यास त्याचा दोन हजार विद्यार्थ्यांना फटका बसेल. नवरात्री काळात दररोज सुमारे एक लाख भाविक देवीचे दर्शन घेतात. मंदिराच्या पूर्व बाजूस असलेली जागा या सर्व भाविकांना सामावून घेण्यास पुरेशी आहे. तरीही कोट्यवधी रुपये खर्चून ७५० भाविकांसाठी सभामंडप व बगीचा करणे, ही निव्वळ उधळपट्टी ठरणार आहे. मंदिर परिसरातील दाटी कमी करण्यासाठी फेरीवाल्यांचे व्यवस्थित नियोजन करावे, अतिक्रमणाचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी संघटनेने केली आहे. (प्रतिनिधी)