शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

जमीन गैरव्यवहारात वकिलास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 00:36 IST

कºहाड : ओगले काच कारखान्याच्या चौदा एकर जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करणाºया वकिलास शुक्रवारी कºहाड शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. याबाबत पाच वर्षांपूर्वी न्यायालयात फिर्याद दाखल झाली होती. तेव्हापासून या प्रकरणाचा तपास सुरू होता. तब्बल पाच वर्षानंतर वकिलास अटक झाल्याने खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्दे पाच वर्षांपूर्वी फिर्याद; ओगले ग्लासच्या जमिनीत घोटाळ्याचा आरोप; बनावट कागदपत्रे तयार केल्याचा आरोप७ रोजी पर्यंत तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.याबाबत पाच वर्षांपूर्वी न्यायालयात फिर्याद दाखल झाली होती.

कºहाड : ओगले काच कारखान्याच्या चौदा एकर जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करणाºया वकिलास शुक्रवारी कºहाड शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. याबाबत पाच वर्षांपूर्वी न्यायालयात फिर्याद दाखल झाली होती. तेव्हापासून या प्रकरणाचा तपास सुरू होता. तब्बल पाच वर्षानंतर वकिलास अटक झाल्याने खळबळ उडाली आहे.

अ‍ॅड. विजय भगवान पाटील (रा. मंगळवार पेठ, कºहाड) असे अटक केलेल्या वकिलाचे नाव आहे. दरम्यान, या प्रकरणात औंध संस्थानच्या प्रमुख गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्यासह अनेकांचे जबाब यापूर्वीच घेण्यात आले आहेत. या जबाबातून संबंधित जमिनीत गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले. तपासात तांत्रिक बाबी समोर आल्यानंतर शुक्रवारी पोलिसांनी थेट अ‍ॅड. विजय पाटील यांनाच अटक केली. हजारमाचीचे पोलिस पाटील व ओगले काच कारखान्याचे संचालक मुकुंद नामदेव कदम यांनी सुमारे पाच वर्षांपूर्वी फिर्याद दिली होती.

पोलिसाच्या माहितीनुसार, ओगलेवाडी येथील ओगले काच कारखान्याला औंध संस्थानने ९९ वर्षांच्या कराराने १९२३ साली चौदा एकर १९ गुंठे जमीन नाममात्र भाडेतत्त्वाने दिली होती. ओगले काच कारखान्याच्या विसर्जनानंतर त्या जमिनीबाबत काही व्यवहार झाले. ते व्यवहार बनावट असल्याची फिर्याद मुकुंद नामदेव कदम यांनी न्यायालयात ७ जुलै २०१२ रोजी दाखल केली. न्यायालयाने त्याच्या सखोल पोलिस तपासाचे आदेश दिले. ओगले काच कारखान्याची सिटी सर्व्हे नं. ४४, ४८, ४९, ५०, ५१ याचे व्यवहार झाले आहेत. ते व्यवहार भूमी अभिलेख कार्यालयातील तत्कालीन अधिकारी विक्रम सोनवणे यांच्याशी संगनमत करून झाले असल्याचा आरोप आहे.

सोनवणे यांनी याप्रकरणी त्याचवेळी अटकपूर्व जामिन घेतला आहे.अ‍ॅड. विजय पाटील यांनी केलेल्या व्यवहारामध्ये ओगले काच कारखान्याची या जागेवरची नोंद बनावट कागदपत्राद्वारे रद्द केली असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. त्याप्रकरणात आमणे नावाच्या व्यक्तीची कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत. ती बाबही पोलिस तपासात समोर आली आहे. गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांची बनावट सही व नाव या व्यवहारासाठी वापरण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले होते. त्यानुसार या प्रकरणात गायत्रीदेवी यांचा जबाब नोंदविण्यात आला आहे.

कोणत्याही प्रकारची सही अथवा खरेदीपत्राला परवानगी दिली नसल्याचे गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी दिलेल्या जबाबात म्हटले आहे. त्यामुळे गायत्रीदेवी यांचीही फसवणूक झाल्याचे पोलिस तपासात पुढे आले. पोलिसांकडून गत पाच वर्षांपासून या प्रकरणाचा तपास करण्यात येत होता.दरम्यान अ‍ॅड. पाटील यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिन अर्ज केला. मात्र, तोही नामंजूर झाला. या प्रकरणात आणखी तांत्रिक माहिती आल्यानंतर पोलिसांनी शुक्रवारी अ‍ॅड. विजय पाटील यांना अटक केली.तीन दिवसांची पोलिस कोठडीअ‍ॅड. विजय पाटील यांना ताब्यात घेऊन अटक केल्यानंतर सायंकाळी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्या. एस. एम. पाडोळीकर यांनी त्यांना दि. ७ रोजी पर्यंत तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. अ‍ॅड. विजय पाटील यांच्या विरोधात बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक, विश्वासघात केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.