शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन'
2
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
3
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
4
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
5
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
7
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
8
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
9
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
10
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
11
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
12
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
13
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
14
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
15
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
16
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
17
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
18
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
19
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
20
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...

ऊसकामगारांचा वाहतूकदारांना लाखोंचा गंडा

By admin | Updated: January 12, 2015 00:36 IST

कारवाईची गरज : शिरोळ-हातकणंगले तालुक्यातील अनेकांना फटका

दानोळी : शिरोळ-हातकणंगले तालुक्यांच्या परीक्षेत्रातील साखर कारखान्यांच्या चारशे ते पाचशे ऊस वाहतूकदारांची ऊसतोडणी कामगारांनी फसवणूक करून कोट्यवधी रुपये बुडविले आहेत. दरवर्षी होणाऱ्या अशा फसवणुकीला आळा घालण्यासाठी कारखानदारांनी व शासनाने दखल घेण्याची गरज आहे, अन्यथा भविष्यात वाहतूकदारांच्या व्यवसायास मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.तालुक्यांतील प्रत्येक कारखान्याच्या पन्नास ते सव्वाशे ऊसतोडणी कामगारांच्या टोळ्यांनी वाहतूकदारांची फसवणूक केली आहे. प्रत्येक टोळीस किमान सात लाख रुपये अ‍ॅडव्हान्स याप्रमाणे न आलेल्या टोळींचा उचलीचा आकडा कोट्यवधी रुपयांवर जातो. या फसवणुकीचा फटका वाहतूकदारांसह कारखान्याच्या यंत्रणेलाही बसला असून यावर्षीचा हंगाम संथगतीने सुरू आहे.अनेक वर्षांपासून ऊसतोडणी कामगार व वाहतूकदार यांच्यातील व्यवहार हा एकमेकांवरील विश्वासावर अवलंबून आहे; परंतु वाढत्या फसवणुकीच्या प्रकारामुळे या विश्वासाला तडा जात आहे. असा प्रकार नवीन नसून दरवर्षी घडत असल्यामुळे यापुढे व्यवहार कसा करायचा व त्यांच्यावर कितपत भरोसा ठेवायचा हा प्रश्न पडला आहे.आतापर्यंत अनेकवेळा फसवणुकीचा प्रकार घडून देखील वाहतूकदार नव्या जोमाने, नवी दुसरी टोळी तयार करून आपला व्यवसाय करत आहेत. पण ऐनवेळी कामगार मिळणे शक्य नसल्यामुळे त्यांची वहाने बसून आहेत. दिलेला अ‍ॅडव्हान्स मिळेल की नाही याबाबत शंका आहे. शिवाय चालू हंगामातील व्यवसायही बुडाला, असा दुहेरी आर्थिक फटका वाहतूकदारांना बसला आहे.कारखानदारी ही वाहतूकदार, ऊसतोडणी कामगार व ऊस उत्पादक अशा एकमेकांवर अवलंबून आहे; परंतु कारखानदार हे फक्त वाहतूकदारांना करारबद्ध करतात. मात्र, वाहतूकदारांच्या अडचणी व संकटांशी कारखानदार काहीच देणंघेणं ठेवत नाहीत. अशाप्रकाराबाबत कायद्याच्या चौकटीत निर्णायक तोडगा काढण्याची गरज आहे. ( प्रतिनिधी )