शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

महापुरात ३ लाख शेतकऱ्यांचे १३०० कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2019 00:40 IST

राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात महापुराने ७८ हजार हेक्टरवरील पिके बाधित झाली असून, तीन ...

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात महापुराने ७८ हजार हेक्टरवरील पिके बाधित झाली असून, तीन लाख सात हजार शेतकऱ्यांचे १२९९ कोटी ६५ लाखांचे नुकसान झाल्याचा अहवाल सरकारकडे पाठविण्यात आला आहे. या शेतकºयांना राज्य आपत्ती निवारण मदत निधीतून ६३० कोटी २० लाख, तर केंद्रीय आपत्ती निवारण मदत निधीतून १०५ कोटी ४४ लाख रुपये मिळणार आहेत.आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात अतिवृष्टी व महापुराने जनजीवन अक्षरश: उद्ध्वस्त केले. महापुराच्या पाण्याने नदी, ओढ्याच्या काठावरील पिके पाण्याखाली गेली. अतिवृष्टीने बांधफुटी होऊन उर्वरित पिके गाढली गेली. प्रलयकारी महापुराच्या पाण्यात आठ-१0 दिवस ऊस व भात पिके राहिल्याने कुजली. पिकांच्या नुकसानीचा अंदाज राज्य सरकारने मागविला होता. त्यावेळी एक लाख पाच हजार हेक्टरवरील पिके बाधित असल्याचा अंदाज वर्तविला होता. यामध्ये सर्वाधिक ७५ हजार हेक्टरवरील ऊस पिकांचा समावेश होता. पावसाने उघडीप दिल्यानंतर महसूल, कृषीसह इतर विभागांच्या अधिकाºयांनी पंचनामे सुरू केले. पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेले असेल, तरच संबंधित शेतकºयांचा पंचनामा केला. तलाठी, ग्रामसेवक, कृषी अधिकाºयांनी थेट बांधावर जाऊन पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण केली. दोन दिवसांपूर्वी पंचनाम्याचे काम पूर्ण झाले असून, यामध्ये ७८ हजार १०२ हेक्टरवरील पिके बाधित झाल्याचा अहवाल राज्य सरकारकडे पाठविला आहे.यामध्ये ६१ हजार ९९९ हेक्टर उसाच्या क्षेत्राचे नुकसान झाले आहे. भाताचे ८४६६ हेक्टर, तर सोयाबीनचे २६७२ हेक्टरमधील पिके बाधित झाल्याचे निदर्शनास आली आहेत. एकूण तीन लाख सात हजार ७१८ शेतकºयांची ७८ हजार १०२ हेक्टरमधील पिके बाधित झाली असून, त्यांचे १२९९ कोटी ६५ लाखांचे नुकसान झाल्याचा अहवाल सरकारकडे पाठविण्यात आला आहे.शेतकºयांना केंद्रीय आपत्ती निवारण मदत निधीतून १०५ कोटी ४४ लाख, तर राज्य आपत्ती निवारण मदत निधीतून ६३० कोटी २० लाख असे ७३५ कोटी ६४ लाखांची मदत मिळणार आहे. सरकारकडे अहवाल गेला असला, तरी शेतकºयांच्या हातात पैसे पडण्यास किमान एक महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.उसाला हेक्टरी १.१३ लाखाची मदतउसाला राज्य आपत्ती मदत निधीतून हेक्टरी एक लाख, तर केंद्रीय आपत्ती निधीतून १३ हजार ५०० रुपये असे एक लाख १३ हजार ५०० रुपयांची मदत मिळणार आहे. भाताला राज्याकडून हेक्टरी ६८०३ रुपये, तर केंद्राकडून १३ हजार ५०० असे २० हजार, तर सोयाबीन व भुईमुगाला तेवढीच मदत मिळणार आहे.पीकनिहाय झालेले नुकसान हेक्टरमध्ये असे-पीक अतिवृष्टी महापूर एकूणऊस ३५७५ ५८४२३ ६१९९९भात १७६० ६७०६ ८४६६सोयाबीन ६५८ २०१४ २६७२भुईमूग ५१४ १७४८ २२६२भाजीपाला २६२ ६२३ ८८५फुले ६ ६४ ७०फळे ५२ ५१ १०३