शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

महापुरात ३ लाख शेतकऱ्यांचे १३०० कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2019 00:40 IST

राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात महापुराने ७८ हजार हेक्टरवरील पिके बाधित झाली असून, तीन ...

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात महापुराने ७८ हजार हेक्टरवरील पिके बाधित झाली असून, तीन लाख सात हजार शेतकऱ्यांचे १२९९ कोटी ६५ लाखांचे नुकसान झाल्याचा अहवाल सरकारकडे पाठविण्यात आला आहे. या शेतकºयांना राज्य आपत्ती निवारण मदत निधीतून ६३० कोटी २० लाख, तर केंद्रीय आपत्ती निवारण मदत निधीतून १०५ कोटी ४४ लाख रुपये मिळणार आहेत.आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात अतिवृष्टी व महापुराने जनजीवन अक्षरश: उद्ध्वस्त केले. महापुराच्या पाण्याने नदी, ओढ्याच्या काठावरील पिके पाण्याखाली गेली. अतिवृष्टीने बांधफुटी होऊन उर्वरित पिके गाढली गेली. प्रलयकारी महापुराच्या पाण्यात आठ-१0 दिवस ऊस व भात पिके राहिल्याने कुजली. पिकांच्या नुकसानीचा अंदाज राज्य सरकारने मागविला होता. त्यावेळी एक लाख पाच हजार हेक्टरवरील पिके बाधित असल्याचा अंदाज वर्तविला होता. यामध्ये सर्वाधिक ७५ हजार हेक्टरवरील ऊस पिकांचा समावेश होता. पावसाने उघडीप दिल्यानंतर महसूल, कृषीसह इतर विभागांच्या अधिकाºयांनी पंचनामे सुरू केले. पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेले असेल, तरच संबंधित शेतकºयांचा पंचनामा केला. तलाठी, ग्रामसेवक, कृषी अधिकाºयांनी थेट बांधावर जाऊन पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण केली. दोन दिवसांपूर्वी पंचनाम्याचे काम पूर्ण झाले असून, यामध्ये ७८ हजार १०२ हेक्टरवरील पिके बाधित झाल्याचा अहवाल राज्य सरकारकडे पाठविला आहे.यामध्ये ६१ हजार ९९९ हेक्टर उसाच्या क्षेत्राचे नुकसान झाले आहे. भाताचे ८४६६ हेक्टर, तर सोयाबीनचे २६७२ हेक्टरमधील पिके बाधित झाल्याचे निदर्शनास आली आहेत. एकूण तीन लाख सात हजार ७१८ शेतकºयांची ७८ हजार १०२ हेक्टरमधील पिके बाधित झाली असून, त्यांचे १२९९ कोटी ६५ लाखांचे नुकसान झाल्याचा अहवाल सरकारकडे पाठविण्यात आला आहे.शेतकºयांना केंद्रीय आपत्ती निवारण मदत निधीतून १०५ कोटी ४४ लाख, तर राज्य आपत्ती निवारण मदत निधीतून ६३० कोटी २० लाख असे ७३५ कोटी ६४ लाखांची मदत मिळणार आहे. सरकारकडे अहवाल गेला असला, तरी शेतकºयांच्या हातात पैसे पडण्यास किमान एक महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.उसाला हेक्टरी १.१३ लाखाची मदतउसाला राज्य आपत्ती मदत निधीतून हेक्टरी एक लाख, तर केंद्रीय आपत्ती निधीतून १३ हजार ५०० रुपये असे एक लाख १३ हजार ५०० रुपयांची मदत मिळणार आहे. भाताला राज्याकडून हेक्टरी ६८०३ रुपये, तर केंद्राकडून १३ हजार ५०० असे २० हजार, तर सोयाबीन व भुईमुगाला तेवढीच मदत मिळणार आहे.पीकनिहाय झालेले नुकसान हेक्टरमध्ये असे-पीक अतिवृष्टी महापूर एकूणऊस ३५७५ ५८४२३ ६१९९९भात १७६० ६७०६ ८४६६सोयाबीन ६५८ २०१४ २६७२भुईमूग ५१४ १७४८ २२६२भाजीपाला २६२ ६२३ ८८५फुले ६ ६४ ७०फळे ५२ ५१ १०३