शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

‘जलयुक्त’मधून चार तलावांचा बदलला ‘लूक’

By admin | Updated: August 18, 2015 00:45 IST

जिल्ह्यातील १६ कामे : टंचाईग्रस्त गावांचा सहभाग नसल्याच्या तक्रारी

भीमगोंडा देसाई / कोल्हापूर पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘जलयुक्त शिवार अभियाना’तून जिल्ह्यातील चार गावतलावांचा लुक बदलला आहे. गाळ आणि जलपर्णीने भरलेल्या तलावांनी मोकळा श्वास घेतला आहे. आठ विंधन विहिरींचे पुनर्भरण करण्यात आले आहे. अभियानातून आतापर्यंत ४० लाखांची कामे झाली आहेत. झालेल्या कामांचे बिल देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडे ४३ लाख १३ हजार रुपयांचा निधी वर्ग केला आहे. जलसंधारणावर कोट्यवधी रुपयांचा निधी आतापर्यंत खर्च झाला असला तरी अपेक्षित क्षेत्र पाण्याखाली आलेले नाही. सर्व गावे टंचाईमुक्त झालेली नाहीत. त्यामुळे प्रत्येक वर्षी उन्हाळा सुरू झाल्यानंतर पाण्यासाठी भटकंती करावी लागते. अपुऱ्या आणि अनियमित पावसामुळे पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका कृषिक्षेत्राला बसत आहे. निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून असणाऱ्या शेतीचे चित्र बदलण्यासाठी सर्व विभागांच्या समन्वयाने जलयुक्त शिवार अभियान प्रत्येक जिल्ह्यात राबविले जात आहे. पावसाचा प्रत्येक थेंब जिरवणे, अडविण्याची कामे यातून प्राधान्याने हाती घेतली जात आहेत. जिल्ह्यात कृषी आणि जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या यंत्रणेकडून कामे सुरू आहेत. बारा गावांतील २१ कामांची निवड करण्यात आली. दरम्यान, निवडलेल्या बहुतांश गावांत मुबलक पाणी आहे. भीषण पाणीटंचाईच्या गावांची निवड झालेली नाही. गावांची निवड करताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतलेले नाही, अधिकाऱ्यांनी कार्यालयात बसूनच गावांची निवड केली आहे, अशा तक्रारी आहेत. तरीही यंत्रणा निवडलेल्या गावांत काम करीतच राहिली. मे महिन्यात कामाला सुरुवात केली. या अभियानातून गडहिंग्लज तालुक्यातील महागाव गावतलावात अनेक वर्षांपासून साचलेला गाळ काढला आहे. तलाव स्वच्छ करण्यात आला आहे. नूल गावतलाव गाळाने भरला होता. जलपर्णीमुळे दुर्गंधी सुटत होती. या तलावातील गाळ काढून तो स्वच्छ करण्यात आला आहे. लिंगनूर, नेसरी, हेब्बाळ, कसबा नूल येथील गावतलावांतील गाळही काढण्यात आला आहे. राधानगरी तालुक्यातील पिंपळवाडी, बेरकळवाडी, तळगाव या गावांत विहीर पुनर्भरणाची कामे झाली आहेत. कोळगाव, टेकोली येथे पिण्याच्या पाणी योजनेच्या विहिरीपर्यंत नदीचे पाणी पोहोचविण्यासाठी (ट्रेंच गॅलरी) चरखुदाईचे काम घेण्यात आले आहे. मोरेवाडी (ता. भुदरगड), बावेली (ता. गगनबावड) येथे विंधन विहीर पुनर्भरणाचे काम करण्यात येणार आहे. कामांना ब्रेक पूर्वीच्या झालेल्या कामांना निधी न मिळणे, पावसाळा यामुळे जलयुक्त शिवार अभियानातील कामांना ब्रेक लागला आहे. आतापर्यंत पावसाची वक्रदृष्टी राहिल्याने जलयुक्त शिवारची उर्वरित कामे कधी सुरू होणार, याची प्रतीक्षा लागून राहिली आहे.