शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

‘जलयुक्त’मधून चार तलावांचा बदलला ‘लूक’

By admin | Updated: August 18, 2015 00:45 IST

जिल्ह्यातील १६ कामे : टंचाईग्रस्त गावांचा सहभाग नसल्याच्या तक्रारी

भीमगोंडा देसाई / कोल्हापूर पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘जलयुक्त शिवार अभियाना’तून जिल्ह्यातील चार गावतलावांचा लुक बदलला आहे. गाळ आणि जलपर्णीने भरलेल्या तलावांनी मोकळा श्वास घेतला आहे. आठ विंधन विहिरींचे पुनर्भरण करण्यात आले आहे. अभियानातून आतापर्यंत ४० लाखांची कामे झाली आहेत. झालेल्या कामांचे बिल देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडे ४३ लाख १३ हजार रुपयांचा निधी वर्ग केला आहे. जलसंधारणावर कोट्यवधी रुपयांचा निधी आतापर्यंत खर्च झाला असला तरी अपेक्षित क्षेत्र पाण्याखाली आलेले नाही. सर्व गावे टंचाईमुक्त झालेली नाहीत. त्यामुळे प्रत्येक वर्षी उन्हाळा सुरू झाल्यानंतर पाण्यासाठी भटकंती करावी लागते. अपुऱ्या आणि अनियमित पावसामुळे पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका कृषिक्षेत्राला बसत आहे. निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून असणाऱ्या शेतीचे चित्र बदलण्यासाठी सर्व विभागांच्या समन्वयाने जलयुक्त शिवार अभियान प्रत्येक जिल्ह्यात राबविले जात आहे. पावसाचा प्रत्येक थेंब जिरवणे, अडविण्याची कामे यातून प्राधान्याने हाती घेतली जात आहेत. जिल्ह्यात कृषी आणि जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या यंत्रणेकडून कामे सुरू आहेत. बारा गावांतील २१ कामांची निवड करण्यात आली. दरम्यान, निवडलेल्या बहुतांश गावांत मुबलक पाणी आहे. भीषण पाणीटंचाईच्या गावांची निवड झालेली नाही. गावांची निवड करताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतलेले नाही, अधिकाऱ्यांनी कार्यालयात बसूनच गावांची निवड केली आहे, अशा तक्रारी आहेत. तरीही यंत्रणा निवडलेल्या गावांत काम करीतच राहिली. मे महिन्यात कामाला सुरुवात केली. या अभियानातून गडहिंग्लज तालुक्यातील महागाव गावतलावात अनेक वर्षांपासून साचलेला गाळ काढला आहे. तलाव स्वच्छ करण्यात आला आहे. नूल गावतलाव गाळाने भरला होता. जलपर्णीमुळे दुर्गंधी सुटत होती. या तलावातील गाळ काढून तो स्वच्छ करण्यात आला आहे. लिंगनूर, नेसरी, हेब्बाळ, कसबा नूल येथील गावतलावांतील गाळही काढण्यात आला आहे. राधानगरी तालुक्यातील पिंपळवाडी, बेरकळवाडी, तळगाव या गावांत विहीर पुनर्भरणाची कामे झाली आहेत. कोळगाव, टेकोली येथे पिण्याच्या पाणी योजनेच्या विहिरीपर्यंत नदीचे पाणी पोहोचविण्यासाठी (ट्रेंच गॅलरी) चरखुदाईचे काम घेण्यात आले आहे. मोरेवाडी (ता. भुदरगड), बावेली (ता. गगनबावड) येथे विंधन विहीर पुनर्भरणाचे काम करण्यात येणार आहे. कामांना ब्रेक पूर्वीच्या झालेल्या कामांना निधी न मिळणे, पावसाळा यामुळे जलयुक्त शिवार अभियानातील कामांना ब्रेक लागला आहे. आतापर्यंत पावसाची वक्रदृष्टी राहिल्याने जलयुक्त शिवारची उर्वरित कामे कधी सुरू होणार, याची प्रतीक्षा लागून राहिली आहे.