शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
5
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
6
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
7
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
8
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
9
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
10
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
11
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
12
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
13
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
14
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
15
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
16
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
17
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
18
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
19
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
20
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘जलयुक्त’मधून चार तलावांचा बदलला ‘लूक’

By admin | Updated: August 18, 2015 00:45 IST

जिल्ह्यातील १६ कामे : टंचाईग्रस्त गावांचा सहभाग नसल्याच्या तक्रारी

भीमगोंडा देसाई / कोल्हापूर पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘जलयुक्त शिवार अभियाना’तून जिल्ह्यातील चार गावतलावांचा लुक बदलला आहे. गाळ आणि जलपर्णीने भरलेल्या तलावांनी मोकळा श्वास घेतला आहे. आठ विंधन विहिरींचे पुनर्भरण करण्यात आले आहे. अभियानातून आतापर्यंत ४० लाखांची कामे झाली आहेत. झालेल्या कामांचे बिल देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडे ४३ लाख १३ हजार रुपयांचा निधी वर्ग केला आहे. जलसंधारणावर कोट्यवधी रुपयांचा निधी आतापर्यंत खर्च झाला असला तरी अपेक्षित क्षेत्र पाण्याखाली आलेले नाही. सर्व गावे टंचाईमुक्त झालेली नाहीत. त्यामुळे प्रत्येक वर्षी उन्हाळा सुरू झाल्यानंतर पाण्यासाठी भटकंती करावी लागते. अपुऱ्या आणि अनियमित पावसामुळे पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका कृषिक्षेत्राला बसत आहे. निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून असणाऱ्या शेतीचे चित्र बदलण्यासाठी सर्व विभागांच्या समन्वयाने जलयुक्त शिवार अभियान प्रत्येक जिल्ह्यात राबविले जात आहे. पावसाचा प्रत्येक थेंब जिरवणे, अडविण्याची कामे यातून प्राधान्याने हाती घेतली जात आहेत. जिल्ह्यात कृषी आणि जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या यंत्रणेकडून कामे सुरू आहेत. बारा गावांतील २१ कामांची निवड करण्यात आली. दरम्यान, निवडलेल्या बहुतांश गावांत मुबलक पाणी आहे. भीषण पाणीटंचाईच्या गावांची निवड झालेली नाही. गावांची निवड करताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतलेले नाही, अधिकाऱ्यांनी कार्यालयात बसूनच गावांची निवड केली आहे, अशा तक्रारी आहेत. तरीही यंत्रणा निवडलेल्या गावांत काम करीतच राहिली. मे महिन्यात कामाला सुरुवात केली. या अभियानातून गडहिंग्लज तालुक्यातील महागाव गावतलावात अनेक वर्षांपासून साचलेला गाळ काढला आहे. तलाव स्वच्छ करण्यात आला आहे. नूल गावतलाव गाळाने भरला होता. जलपर्णीमुळे दुर्गंधी सुटत होती. या तलावातील गाळ काढून तो स्वच्छ करण्यात आला आहे. लिंगनूर, नेसरी, हेब्बाळ, कसबा नूल येथील गावतलावांतील गाळही काढण्यात आला आहे. राधानगरी तालुक्यातील पिंपळवाडी, बेरकळवाडी, तळगाव या गावांत विहीर पुनर्भरणाची कामे झाली आहेत. कोळगाव, टेकोली येथे पिण्याच्या पाणी योजनेच्या विहिरीपर्यंत नदीचे पाणी पोहोचविण्यासाठी (ट्रेंच गॅलरी) चरखुदाईचे काम घेण्यात आले आहे. मोरेवाडी (ता. भुदरगड), बावेली (ता. गगनबावड) येथे विंधन विहीर पुनर्भरणाचे काम करण्यात येणार आहे. कामांना ब्रेक पूर्वीच्या झालेल्या कामांना निधी न मिळणे, पावसाळा यामुळे जलयुक्त शिवार अभियानातील कामांना ब्रेक लागला आहे. आतापर्यंत पावसाची वक्रदृष्टी राहिल्याने जलयुक्त शिवारची उर्वरित कामे कधी सुरू होणार, याची प्रतीक्षा लागून राहिली आहे.