शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

जिल्ह्यात कमी लसीकरण हे तीनही मंत्र्यांचे अपयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:16 IST

कोल्हापूर : जिल्ह्यात लसीकरणासाठी नागरिक फेऱ्या मारत आहेत. परंतु लस कमी येत ...

कोल्हापूर : जिल्ह्यात लसीकरणासाठी नागरिक फेऱ्या मारत आहेत. परंतु लस कमी येत आहे. वजनदार मंत्री आपल्या जिल्ह्याला जादा लस नेत असताना कोल्हापुरात लस मिळत नाही हे तीनही मंत्र्यांचे अपयश असल्याची टीका भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. मुबलक प्रमाणात लस मिळाली नाही तर या मंत्र्यांच्या घरासमोर जनतेतर्फे आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.

प्रामुख्याने कोल्हापूर शहरातील लसीकरणाची आकडेवारी मांडत भाजपने मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये तीनही मंत्र्यांना लक्ष्य करण्यात आले. देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी म्हणाले, हसन मुश्रीफ कोल्हापुरात १०० किलो वजन असल्यासारखे दाखवतात. मात्र वरती त्यांचे पावशेरही वजन नाही हे यातून सिद्ध होते. मुंबई आणि पुण्याची लोकसंख्या कितीतरी पट जास्त असताना तेथे २०० आणि ४०० नागरिक पॉझिटिव्ह येत आहेत. तर कोल्हापुरात हाच आकडा दोन हजारावर जात आहे. हे मंत्र्यांचे, प्रशासनाचे अपयश आहे.

महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकाेडे म्हणाले, याच गतीने लसीकरण झाल्यास जिल्ह्याचे लसीकरण व्हायला दोन वर्षे लागतील. अशोक देसाई म्हणाले, २३ जूनला जिल्हाधिकाऱ्यांनी रोज ५० हजार डोसची मागणी केली होती. मग ती पूर्ण का होत नाही. अजित ठाणेकर म्हणाले, कोल्हापुरातील पहिला डोस घेतलेले ५० हजार नागरिक दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत आहेत. विजय जाधव, दिलीप मैत्राणी, हेमंत आराध्ये यावेळी उपस्थित होते.