शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
2
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
3
जिथे INS विक्रांतचा तळ, जवळच अणुकेंद्र, तिथे उडत उडत पोहोचला चिनी हेर, असा सापडला जाळ्यात
4
SMAT 2025 Final Live Streaming : पुण्याच्या मैदानात रंगणार फायनलचा थरार! ईशान किशन कॅप्टन्सीत इतिहास रचणार?
5
पोर्टफोलिओ करा स्ट्रॉन्ग! ऑटोपासून हेल्थकेअरपर्यंत 'हे' ५ शेअर्स देणार बंपर परतावा; पाहा सविस्तर विश्लेषण
6
"युती झाली नसती तर शिंदेसेनेत..."; मंत्री प्रताप सरनाईक यांचं भाजपा महायुतीबाबत मोठं विधान
7
अति घाई, संकटात नेई! स्कूटी-कारची जोरदार धडक; Video पाहून तुम्हीच सांगा चूक नेमकी कोणाची?
8
'ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेशी युती नको'; भाजप पदाधिकाऱ्यांचा एकत्र लढण्याला विरोध, जिल्हाध्यक्षांना पत्र
9
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली! जाणून घ्या, योजनेसंदर्भात सविस्तर
10
७.५ कोटी प्रवाशांना लाभ, १६४ सेवा, भारतीयांसाठी ‘वंदे भारत’ वरदान; मेक इन इंडियाचा चमत्कार!
11
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
12
मनगटावर 'कोटींची' माया! श्रीमंतांमध्ये का वाढतेय 'रिचर्ड मिल'ची क्रेझ? वाचा, ११ कोटींच्या घड्याळाचे गुपित
13
इन्स्टाग्रामवर मुलींशी मैत्री! तीन मैत्रिणींना घेऊन जात असताना शिर्डीत नीरजवर चॉपरने जीवघेणा हल्ला
14
Gold Silver Price Today: चांदीचा नवा विक्रम, सोन्याचे दरही गगनाला भिडले; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट किंमत
15
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
16
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
17
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
18
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
19
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
20
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
Daily Top 2Weekly Top 5

पदांच्या लाचारांनी आंबेडकरी मंचावरील अधिकार गमावला

By admin | Updated: April 4, 2016 00:59 IST

भारत पाटणकर यांची नामोल्लेख टाळून रामदास आठवलेंवर टीका

कोल्हापूर : समाजातील जातिव्यवस्था कायम राहावी असा प्रयत्न करणाऱ्यांशी संगत करत मंत्रिपद, महामंडळ अध्यक्ष या पदांसाठी लाचार झालेल्यांनी आंबेडकरी विचाराच्या व्यासपीठावर बसण्याचा अधिकार गमावला आहे, अशी टीका रामदास आठवले यांचा नामोल्लेख टाळून श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी रविवारी केली. आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ क्रियाशील कार्यकर्ते व नेते अ‍ॅड. पंडितराव सडोलीकर यांच्या जाहीर सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सामाजिक विचारवंत डॉ. बाबूराव गुरव यांची प्रमुख उपस्थिती होती. येथील शाहू स्मारक भवनात हा कार्यक्रम झाला. डॉ. पाटणकर म्हणाले, रोहित वेमुलाची विनागोळीची हत्या करणारी सध्याची राजकीय परिस्थिती आहे. घटनेत बदल करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. वंदे मातरम् व राष्ट्रगीतासंबंधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील नेते जाणीवपूर्वक वाद निर्माण करत आहेत. भांडवलशाही व जातीयवादी यांचे संबंध घट्ट झाले आहेत. अशावेळी घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची चळवळ व्यापकपणे गतिमान करण्याची गरज आहे. त्यासाठी त्यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त १५ एप्रिलला सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांतील आंबेडकरी विचारांच्या लोकांचा मेळावा भरवूया. या मेळाव्यात डॉ. आंबेडकर यांनी सांगितलेल्या मुक्तीचा एल्गार करूया. गुरव म्हणाले, कोणाही शहाणी व्यक्ती अस्वस्थ होईल, असे वातावरण आहे. म्हणून आता डॉ. आंबेडकर यांच्या विचाराचे पारायण होणे गरजेचे आहे. सडोलीकर म्हणाले, शालेय जीवनापासूनच डॉ. आंबेडकरी विचाराचा प्रभाव पडला. त्यातून चळवळीत सक्रिय झालो. वकिली करत समाजाच्यासाठी रस्त्यावरील लढाई लढत आहे. यावेळी अ‍ॅड. सडोलीकर, पत्नी भारती, आई हिराबाई, वडील तुकाराम यांचा सन्मानचिन्ह, चळवळीतील पुस्तके देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. डॉ. आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते अरुण कडाळे, जानबा कांबळे, कुमार दाभाडे, मलाप्पा कांबळे, नामदेव कांबळे यांचाही सत्कार झाला. डॉ. ज. रा. दाभोळे यांनी स्वागत केले. अनिल म्हमाणे, नंदकुमार गोंधळी, अस्मिता दिघे यांची भाषणे झाली. कडोली व कसबा आळते वाचनालयास पुस्तके देण्यात आली. ‘महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळ’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. डॉ. सुनील पाटील, संदीप संकपाळ, मच्छिंद्र कांबळे यांनी सूत्रसंचालन, तर मैत्रेयी कमल यांनी आभार मानले. (प्रतिनिधी) भागवत यांच्याशी वैर नाही वैऱ्याने वैर संपवता येत नाही. अवैऱ्यानेच संपवणे गरजेचे आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, भैया जोशी यांच्याशी आमचे वैर नाही. ते आमच्याकडे वैरत्वाने पाहत असतील, पण आम्ही अहिंसेचे राज्य निर्माण व्हावे, यासाठी विहार करत आहोत, असे डॉ. पाटणकर यांनी सांगितले.