शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

धोरणाअभावी सेवा संस्था थकीतच्या रडारवर

By admin | Updated: October 13, 2015 23:48 IST

ऊस दराचे धोरण स्पष्ट नसल्याने सेवा संस्था राहणार थकीत : सरकारने हंगामपूर्व सहकार्याची भूमिका घ्यावी

आयुब मुल्ला - खोची---येणाऱ्या ऊस हंगामात ‘एफआरपी’प्रमाणे उसाला दर द्यावा, अशा सूचना सरकारने केल्या आहेत. तर वार्षिक सर्वसाधारण सभेत अनेक कारखानदारांनी ‘एफआरपी’ टप्प्यांनी द्यावी, असा ठराव मंजूर करून घेतला आहे. याउलट स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एफआरपीची रक्कम तुकडे न करता द्यावी, ही भूमिक ा ठेवली आहे. यासाठी ५० हजार शेतकऱ्यांच्या सह्या संकलित करण्याची मोहीम त्यांनी हाती घेतली आहे. तिन्ही महत्त्वपूर्ण घटकांनी आपल्या वेगवेगळ्या भूमिका मांडल्या आहेत. सरकार तर या बाबतीत संवेदनशीलच नाही, असे दिसत आहे. त्यामुळे बाजारपेठेतील साखरेचे दर पाहता कारखान्याकडून एकाच स्वरूपात एफआरपी पूर्णपणे देता येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची सेवा संस्थेची कर्जेसुद्धा भागणार नाहीत. सेवा संस्था थकबाकीने अडचणीत येणार, हे स्पष्ट आहे. साखर हंगाम सुरू होण्यासाठी काही दिवसांचा कालावधी उरला आहे. कारखान्यांचे बॉयलर प्रदीपन सुरू झाले आहेत. कारखाने सुरू करण्यासंदर्भात धोरण स्पष्ट नसताना घाई सुरू आहे. ऊसतोड मजुरांनी दरवाढीची मागणी केली आहे. त्यासंदर्भातही शासनदरबारी ठोस निर्णय झालेला नाही. संघटना वगळता सर्वच घटकांनी सावध भूमिका घेत गप्प राहणे पसंत केले आहे. अशा पार्श्वभूमीवर शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे. पावसाच्या हुलकावणीने ऊस पिके खुंटली आहेत. यामुळे उत्पादनात घट होणार आहे. अशा स्थितीत उसाला पैसे किती मिळणार? यापासून ते किती वेळेत जाणार, अशा चिंतेत तो आहे. कारण उसाची पक्वता पाहता उत्पादनाची सरासरी वाढेल, असे नाही. प्रती गुंठा एक टन तरी मिळेल का, या विचारात शेतकरी आहे.ऊसतोडणी मजुरांनी तोडणी मजुरीत २० टक्के वाढीसाठी मागणी केली आहे. ती प्रतिटन ३०० रुपये होते, अशी सगळी आर्थिक गणिते आहेत. ती सरकारनेच सोडवली तरच हंगाम वेळेत सुरू होईल. सर्वांनाच हातभार लागेल; पण गत हंगामासारखी चालढकलीची भूमिका घेतली तर एफआरपीची संपूर्ण रक्कम एका वेळेस मिळणार नाही. दोन-तीन टप्प्यांत मिळाली तर सेवा संस्थांची कर्जेसुद्धा भागत नाहीत. एफआरपी : कारखानदारांना कर्ज नको, अनुदान हवेसेवा सोसायटीकडून एकरी ३५ हजारांपर्यंत कर्ज घेतले आहे. त्याची परतफेड उसातून होते. यासाठी उसाचा पहिला हप्ता कर्ज भागण्यापुरता सुद्धा येणार नाही, अशी स्थिती आहे. कारण बाजारात साखरेचे दर सध्या दोनशे रुपयांनी वाढून ते २६००-२७०० पर्यंत गेले आहेत. दिवाळीपर्यंत दर वाढत जाऊन त्यामध्ये सातत्य राहिले तर ‘एफआरपी’च्या आसपास दर देण्यासारखी परिस्थिती राहील. परंतु, तो जर तीन हजारांपर्यंत राहिला तर त्यातून ऊस तोडणी खर्च वजा जाता २७५० रुपये देता येईल, अशी स्थिती राहते. त्या रकमेवर आधारित बँका ८० टक्के कर्ज देतात. म्हणजे २२०० वर आकडा येतो. यातून उत्पादन खर्च वजा जाता दोन हजार रुपये देण्यासारखी परिस्थिती येईल. मग ‘एफआरपी’चे काय, असा प्रश्न येतो. यासाठी कारखानदारांनी उर्वरित कमी पडत असलेल्या रकमेसाठी कर्ज न देता अनुदान द्यावे, अशी मागणी केली आहे. गेल्या तीन महिन्यांत पावसाने दडी मारल्याने उसाची वाढ खुंटल्याने उत्पादनात घट होणार आहे. एकरी ३० ते ३५ टन उत्पादन मिळेल, असे चित्र आहे. त्यामुळे एकरी ४० हजारांचे पीक कर्ज भागण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे सेवा संस्थेकडे थकबाकी राहण्याची शक्यता आहे.- बाबासो श्रीपती पाटील, लाटवडे, शेतकरी.