शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
4
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
5
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
6
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
7
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
8
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
9
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
10
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
11
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
12
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
13
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
14
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
15
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
16
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
17
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
18
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
19
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
20
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय

स्वच्छतेचा अभाव, डासांचा प्रादुर्भाव

By admin | Updated: April 16, 2015 00:00 IST

सम्राट नगर, मालती अपार्टमेंट परिसर : कचराकुंड्या भरलेल्या, ‘केएमटी’चेदुर्लक्ष; काही भागात रस्त्यांची दुरवस्था

इंदुमती गणेश/सचिन भोसले - कोल्हापूर शहरातील मध्यमवर्गीय व उच्च मध्यमवर्गीय नागरिकांची वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सम्राट नगर येथील मालती अपार्टमेंट परिसरात गटारींची अस्वच्छता, कचऱ्याच्या उठावाचा अभाव, त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव अशा समस्या भेडसावत आहेत. शिवाय परिसरात ‘केएमटी’ची पुरेशी सोय नाही... या सर्व प्रश्नांची सोडवणूक व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांनी ‘लोकमत’पुढे व्यक्त केली. ‘लोकमत आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत ‘लोकमत’च्या प्रतिनिधींनी बुधवारी मालती अपार्टमेंट परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी रहिवाशांनी मोकळेपणाने आपल्या समस्या मांडल्या व त्यांच्या सोडवणुकीची अपेक्षा व्यक्त केली. गेल्या काही वर्षांत झपाट्याने विकास झालेल्या आणि टोलेजंग इमारती उभ्या राहिलेल्या या परिसरात गटारी तुंबण्याचा मोठा प्रश्न आहे. मुख्य रस्त्यालगत मोठमोठ्या गटारी करण्यात आल्या आहेत. मात्र, तेथे कचरा साठत असल्याने गटारी वारंवार तुंबतात; त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव आहे. परिसरात एक सार्वजनिक स्वच्छतागृह आहे. त्याच्या दुर्गंधीने नागरिक त्रस्त असून, ते परिसरातून हटविण्यात यावे, अशी त्यांची मागणी आहे. कचरा उठाव वेळेवर होत नाही, घंटागाडी येत नाही; त्यामुळे कचराकुंड्या भरून वाहतात; पण वारंवार सांगूनही त्याकडे लक्ष दिले जात नाही. रस्त्यांची झाडलोट होत नाही; पण याकडे सफाई कामगार गांभीर्याने कधीच पाहत नाहीत, असे एका नागरिकाने सांगितले. भागात काही ठिकाणी पाण्याची वानवा आहे. शिवाय गढूळ पाणी येत असल्याने ते पिण्यायोग्य नसते, अशी व्यथा एका महिलेने मांडली. नागरिकांना प्रवास करण्यासाठी केएमटी बसेस वाढविण्यात याव्यात, अशी मागणी आहे. भागात रस्त्यांची कामे बऱ्यापैकी झाली आहेत. काही ठिकाणी मात्र अजून काम बाकी आहे. परिसरातील उद्यान विकसित होणे गरजेचे आहे.पावसाचे पाणी थेट घरातगटारी व्यवस्थित न बांधल्यामुळे मोठ्या पावसात पाणी रस्त्यावरून थेट घरांत शिरते. त्याचबरोबर गटारी वेळोवेळी साफ न केल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. - सुजाता पाटील, पायमल वसाहतबसच्या फेऱ्या वाढवाके.एम.टी. प्रशासन दोन तासांनी या परिसरातून बस देत आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होते. याचबरोबर रस्त्यावरील ड्रेनेजचे पाणी पावसाळ्यात संपूर्ण रस्त्यावर येते. - दीपक पाटील, जागृतीनगररस्ते व्यवस्थित नाहीतपायमल वसाहत, सम्राटनगरकडे जाणारे अंतर्गत रस्ते अजूनही खराब अवस्थेत आहेत. त्यामुळे धड चालतही जाता येत नाही. गटारी वेळेवर स्वच्छ न केल्याने त्या तुंबण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. - दिगंबर कुलकर्णी, प्रतिभानगर, निधीची कमतरतापायमल वसाहत, मालती अपार्टमेंट परिसरात महापालिकेच्या अर्थसंकल्पामधून निधीच कमी आल्याने अनेक कामे अपुरी राहिली आहेत. येत्या काही दिवसांत अपुरा निधी जर मिळाला तर अपुऱ्या कामांना न्याय देता येईल.- राजू हुंबे, नगरसेवकमोकाट जनावरांचा त्रासपरिसरात मोकाट श्वानांची संख्या वाढली आहे. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना त्यांच्यापासून धोका निर्माण झाला आहे. . - उज्ज्वला मिस्किन, राधाकृष्ण संकुलपरिसरातून बसेस सोडाशिवाजी विद्यापीठाकडे जाणाऱ्या बसेस कमी सोडण्यात येत आहेत. त्यामुळे नागरी वस्ती मोठ्या प्रमाणात असूनही नागरिकांना तासन्तास बसची वाट पाहावी लागते. - राजाराम पाटील, कचरा उठाव कराजागृतीनगरातील कचरा उठाव वेळोवेळी केला जात नाही. त्यामुळे परिसरात सायंकाळी डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. महापालिकेने डास प्रतिबंधक औषधे फवारणी केली पाहिजे. - राजश्री पाटील, पायमल वसाहतरस्ता व्हावागायत्री एंटरप्राईज ते पद्मालय बंगला या मार्गावरील रस्ता गेली कित्येक वर्षे केलेला नाही. त्यामुळे हा रस्ता नव्याने होणे गरजेचा आहे. - केसरीमल ओसवाल, प्रतिभानगरसफाई कामगारांची वानवाअनेकदा सफाई कर्मचाऱ्यांना सांगूनही ते या भागातील कचरा उठाव करीत नाहीत. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. - पारस जाधव, सम्राटनगरनालेसफाई व्हावीमालती अपार्टमेंटसमोरील नालेसफार्ई वेळेवर होत नाही. त्यामुळे सायंकाळी डासांचेच साम्राज्य असते. पाणीपुरवठाही वेळेवर होत नाही. - मधुकर चौगुलेस्वच्छतागृह अन्यत्र हलवापायमल वसाहतीमध्ये असणाऱ्या सार्वजनिक शौचालयाचा परिसरातील नागरिकांना दुर्गंधीमुळे त्रास होत आहे. तरी ही स्वच्छतागृहे नवीन तरी बांधावीत अन्यथा तेथून हलवावीत.- सोनम भादवणकरपुलाचे बांधकाम निकृष्टमालती अपार्टमेंट रोडवरून शिवाजी विद्यापीठाकडे जाणाऱ्या रस्त्यावर बांधण्यात आलेल्या पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. त्या पुलाच्या कॉँक्रीटमधील लोखंडी सळ्या बाहेर आल्या आहेत. - रफिक मुल्ला