शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
3
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
4
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
5
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
6
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
8
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
9
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
10
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
11
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
12
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
13
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
14
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
15
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
16
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
17
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
18
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
19
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
20
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  

घोटाळे होऊनही घरफाळा विभागात शिस्तीचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:10 IST

कोल्हापूर : महानगरपालिकेतील घरफाळा विभागात अनेक घोटाळे झाले, पण या घोटाळ्यांची चौकशीचे काम पूर्ण करण्याचे सोडाच आता तर या ...

कोल्हापूर : महानगरपालिकेतील घरफाळा विभागात अनेक घोटाळे झाले, पण या घोटाळ्यांची चौकशीचे काम पूर्ण करण्याचे सोडाच आता तर या विभागाकडेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे. उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत असलेल्या विभागाकडे इतके दुर्लक्ष करणे म्हणजे सुरू असलेल्या घोटाळेबाजांना पाठिशी घालण्याचा प्रकार असल्याची चर्चा होत आहे.

कोल्हापूर महानगरपालिकेतील घरफाळा विभाग म्हणजे अनेकांचे कल्याण करणारा विभाग अशीच गेल्या काही वर्षांपासूनची ओळख आहे. त्यामुळेच तर येथे अनेक वर्षांपासून ठरावीक कर्मचारी चिकटून राहिले आहेत आणि सर्वांची एक घट्ट साखळी निर्माण झाली आहे. ‘एकमेका करू सहाय, अवघे होऊ श्रीमंत’ अशीच मानसिकता येथील कर्मचाऱ्यांची असून अनेक अधिकारीही त्यात सहभागी असल्याची बाब समोर आली आहे.

गेल्या काही महिन्यात अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या चौकशीत सात आठ मुद्दे प्रकर्षाने पुढे आले. पण या मुद्यावर चौकशी झालेली नाही. घोटाळ्यातील चार प्रकरणात कर निर्धारकासह दोन अधीक्षक, एक क्लार्क अशा चौघांना जबाबदार धरून त्यांच्यावर फौजदारी कारवाई झाली. पण अजूनही अनेक जण कारवाईच्या कचाट्यात सापडल्यानंतर चौकशीचे काम थांबले. त्यांच्यावर कधी कारवाई होणार हा प्रश्न आहे.

महापालिकेचे सन २०२१-२०२२ सालाचे नवीन आर्थिक वर्ष दि. १ एप्रिल रोजी सुुरू झाले. मागच्या वर्षाचा सगळा हिशोब अद्याप अपूर्ण आहे. आता नवीन हिशोब करताना जुन्या चुकांची दुरुस्ती करणे किंवा अशा चुका पुन्हा होऊ नयेत म्हणून खबरदारी घेणे आवश्यक आहे. पण नेमके याच गोष्टीकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे.

१. झिरो बिलांचा विषय-

सन २०११-१२ सालापासून शहरात ७ ते ८ हजार झिरो बिले निघाली आहेत. म्हणजे तेवढ्या ग्राहकांनी घरफाळाच भरलेला नाही. झिरो बिले का निघाली, कोणी काढली आणि त्यात दुरुस्ती का झाली नाही, या प्रश्नांचे उत्तर अधिकाऱ्यांनी शोधले पाहिजे.

२. इनव्हॅलिड बिलांचा विषय -

सुमारे साडेतीन हजार इनव्हॅलिड बिले असून त्याची तपासणी झालेली नाही. सिस्टीमवर बिले जनरेट होतात, पण अपात्र म्हणूनच होतात. आता या बिलांवरील पत्त्यावर जाऊन मिळकतधारक आहे की नाही याचा शोध अधिकाऱ्यांनी घेतला पाहिजे.

३. भोगवटादार बिलांचा विषय -

सन २०१८ ते २०१९ या आर्थिक वर्षपासून भोगवटादारांची बिले निघालेली नाहीत. फेब्रुवारी २०२१ मध्ये ही बाब निदर्शनास आली. बिले अचानक बंद होण्याचा प्रकारसुद्धा बऱ्याच प्रमाणात आहे. सन २०११-२०१२ पर्यंत ज्यांचा बिले आली, ती आता दिसत नाहीत. त्यांना घरफाळा माफ केला का या प्रश्नाचे उत्तर शोधले पाहिजे.

४. न्यायालयीन प्रकरणांचा विषय-

घरफाळ्याशी संबंधित १५० हून अधिक प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत. त्याद्वारे सुमारे १५ ते २० कोटींची येणे बाकी आहे. न्यायालयात जाऊन सुनावणीसाठी प्रयत्न करणे, प्रकरणे निकाली काढणे आणि पालिकेचे उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न होत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून ही प्रकरणे प्रलंबित आहेत.

५. शासकीय संस्थांच्या बिलांचा विषय -

शहरात १०० च्या आसपास शासकीय कार्यालये असल्याची नोंद संगणकावर आहे. प्रत्यक्षात त्यापेक्षा अधिक कार्यालये आहेत पण त्यांची नोंद नाही. सर्वेक्षणदेखील झालेले नाही. त्यांना घरफाळा आकारण्याची जबाबदारी कोणाची?