शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

कर्जमाफीचा सावळागोंधळ ?

By admin | Updated: July 4, 2017 00:16 IST

कर्जमाफीचा सावळागोंधळ ?

लोकमत न्यूज नेटवर्ककोपार्डे : गेले दोन महिने कर्जमाफीची चर्चा व त्या अनुषंगाने होणाऱ्या निर्णयाकडे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले असताना या कर्जमाफी संदर्भातील जसजसे निकष समोर येत आहेत, तसतसे या कर्जमाफीचा लाभ मिळणार का असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहे. यामुळे दिवसेंदिवस या कर्जमाफीचा सावळागोंधळ वाढत चालला आहे.राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, या मागणीसाठी गेले तीन चार महिने सत्तेवर असणाऱ्या भाजप सरकारला सर्व पक्षांनी एकत्र येऊन कोंडीत पकडण्यासाठी जिवाचे रान केले होते. याला सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेना व मित्र पक्षांनीही साथ दिली आहे. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीचा बिगुल वाजविला पण निकषांचा फासा टाकून कर्जमाफीच्या चक्रव्युहात अडकण्याचे काम केले आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्जमाफीतून काढायचेच, अशी खेळी केली आहे. राज्य सरकारने घोषणा केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान शेतकरी कर्जमाफीसाठी निकष जाहीर केले आणि सरसकट व थकीत कर्जदारालाच कर्जमाफीच्या सवलत योजनेचा चांगला लाभ होईल, ही आशाच फोल ठरलीकर्जमाफीचे सर्व निकष जाहीर झाल्यानंतर यात एक कुटुंब पकडताना पतीपत्नी व १८ वर्षांखालील मुले अशी व्याख्या करण्यात आली आहे. यात पती व पत्नी अशी दोघांच्या नावावर खाती असली तरी त्याचा स्वतंत्र कर्जमाफीचा फायदा एकाच खातेदाराला मिळणार आहे. यासह अत्यंत खोचक निकष लावताना एकीकडे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तिचा विचार केला जाणार नाही, असे म्हणताना स्त्रीला प्राधान्य दिले जाईल व नंतर पुरुषाला असेही सूचित केल्याने नेमकी कुणाला माफी देणार याबाबत संभ्रम निर्माण केला जात आहे. गावागावातील सेवासंस्थातील पदाधिकारी सचिव व खातेदार यांच्यामध्ये निकष व त्यातून आपल्याला कर्जमाफी मिळणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.कर्जमाफीत बुडव्यांनाच फायदा होतोय, असे प्रथमदर्शर्नी दिसून येते. मात्र, यासाठी जाहीर केलेले निकष पाहता आता या माफीतून केवळ सहा ते सात टक्के शेतकऱ्यांनाच लाभ मिळण्याची शक्यता आहे. कर्जमाफी द्यावयाची असल्यास सरसकट कर्जमाफी करून शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्याची पुण्याई मिळवावी.विठ्ठल पाटील, सचिव, हनुमान सेवा संस्था, पाटपन्हाळा.सरकारचा कर्जमाफीचा हेतू शुद्ध नाही. कर्जमाफीचा ३४ हजार कोटींचा आकडा आणि महाराष्ट्राची लोकसंख्या पाहता प्रतिव्यक्ती दीड लाख वाटले तरी १६ हजार कोटींवर रक्कम जात नाही, असा दावा केला.संजय पाटील,शेतकरी, वाकरे, ता. करवीर