शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
5
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
6
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
7
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
8
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
9
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
10
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
11
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
12
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
13
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
14
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
15
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
16
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
17
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
18
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
19
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा

कर्जमाफीचा जिल्हा बँकेला झटका

By admin | Updated: July 4, 2017 01:28 IST

कर्जमाफीचा जिल्हा बँकेला झटका

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : गेली सहा महिने कर्जमाफीचे नगारे साऱ्या राज्यात वाजल्याने त्याचा थेट झटका जिल्हा बँकेच्या वसुलीला बसला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत तब्बल १३७ कोटींची वसुलीत घट झाली असून ३० जूनअखेर कशीबशी ८० टक्के वसुलीच बँकेला करता आली आहे. त्यामुळे आगामी काळात बँकेसमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्णाचा विचार केल्यास डिसेंबरपासून विकास संस्थांच्या पातळीवर पीककर्जाची वसुलीस सुरुवात होते; पण या कालावधीतच कर्जमाफीच्या चर्चेने वेग घेतला आणि मार्चच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी देण्याचे सूतोवाच केले. त्यामुळे ऐन वसुलीच्या काळात विकास संस्था व बँकेसमोरील अडचणी वाढत गेल्या आहेत. जूनअखेर शंभर टक्के वसुली करणाऱ्या विकास संस्थांची संख्याही काही कमी नाही. शेतकरी इकडून-तिकडून पैसे गोळा करून ३० जूनला कर्जाची परतफेड करतात. कर्ज खाते नवे झाली की पुन्हा कर्जाची उचल करतात; पण राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केल्याने परतफेडीचा वेग मंदावला. शेवटपर्यंत कालमर्यादेचा घोळ सुरू राहिल्याने शेतकऱ्यांनी सावध भूमिका घेत परतफेडीकडे पाठ फिरविली. जिल्हा बँकेचे यावर्षी मध्यम मुदत व पीक कर्जाची १४०९ कोटी १७ लाखांची वसूल पात्र रक्कम होती. त्यापैकी ११२३ कोटी ८१ लाख रुपये वसूल झाले म्हणजे केवळ ७९ टक्के वसुली झाली आहे.