शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

कुरुंदवाडची पाणी योजना मार्गी लागणार

By admin | Updated: November 20, 2015 00:17 IST

मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदील : चौदा कोटी ९२ लाखांच्या योजनेला तत्त्वत: मंजुरी

कुरुंदवाड : शहराच्या सुधारित नळपाणी पुरवठा योजनेला अखेर तत्त्वत: मंजुरी मिळाली आहे. सुमारे चौदा कोटी ९२ लाख ६८ हजार रुपये खर्चाच्या या योजनेमुळे शहरवासीयांना शुद्ध व मुबलक पाणी मिळणार असल्याने शहरवासीयांतून समाधान व्यक्त होत आहे.शहराला सध्या संस्थानकालीन नळपाणी पुरवठा योजना आहे. मात्र, गेल्या ५० वर्षांत शहराची लोकसंख्या वाढल्याने व योजनाही कालबाह्य झाल्याने अपुरा व अनियमित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींना नागरिकांच्या पाणीप्रश्नाला तोंड द्यावे लागत आहे. अपुऱ्या व अनियमित पाण्यामुळे नळ कनेक्शन संख्याही घटल्याने पालिकेच्या उत्पन्नात कमालीची घट आली आहे. शिवाय योजना संस्थानकालीन असल्याने वारंवार लागणाऱ्या गळतीतून पालिका प्रशासनाला आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याने महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत चौदा कोटी ९२ लाख ६८ हजार रुपये खर्चाच्या नवीन पाणी योजनेचा प्रस्ताव करण्यात आला होता.या योजनेला तत्त्वत: मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती. नगराध्यक्षा मनीषा डांगे, ज्येष्ठ नगरसेवक रामचंद्र डांगे, उपनगराध्यक्ष वैभव उगळे, बांधकाम सभापती सुरेश कडाळे यांच्यासह मुख्याधिकारी अतुल पाटील या योजनेचा पाठपुरावा करीत आहेत. योजनेच्या मंजुरीसाठी आमदार उल्हास पाटील यांनी शहरवासीयांना शब्द दिल्याने पालिकेचे शिष्टमंडळ घेऊन आमदार पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून या योजनेला तत्त्वत: मंजुरी मिळवली. त्यामुळे योजना मार्गी लागण्यातील अडसर दूर झाला आहे. (वार्ताहर)औरवाड पुलाजवळ इंटक सध्या शहराला कृष्णा घाट येथील संगमाजवळून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, पंचगंगेच्या दूषित पाण्याचा प्रवाहही या पात्रात मिसळत असल्याने शहरालाही दूषित पाणीच मिळत आहे. नव्या योजनेमुळे पालिकेने याची दखल घेऊन, नृसिंहवाडी-औरवाड पुलापासून सुमारे पाचशे मीटर अंतरावर पाणी उपसा टाकी उभारण्यात येणार असल्याने भविष्यात पंचगंगा नदी प्रदूषणाचा काहीही परिणाम होणार नाही.मुख्यमंत्र्यांची मान्यता : उल्हास पाटीलकुरुंदवाडला शुद्ध आणि मुबलक पाणी कायमस्वरूपी मिळावे, यासाठी केलेल्या प्रयत्नाला यश आले आहे. योजनेचा सत्वर अहवाल सादर करावा, असा आदेश देऊन या योजनेस तत्त्वत: मान्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. यामुळे कुरुंदवाडकरांना स्वच्छ आणि निर्मळ पाणी मिळणार आहे, अशी माहिती आमदार उल्हास पाटील यांनी दिली.