शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कुरुंदवाडची पाणी योजना मार्गी लागणार

By admin | Updated: November 20, 2015 00:17 IST

मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदील : चौदा कोटी ९२ लाखांच्या योजनेला तत्त्वत: मंजुरी

कुरुंदवाड : शहराच्या सुधारित नळपाणी पुरवठा योजनेला अखेर तत्त्वत: मंजुरी मिळाली आहे. सुमारे चौदा कोटी ९२ लाख ६८ हजार रुपये खर्चाच्या या योजनेमुळे शहरवासीयांना शुद्ध व मुबलक पाणी मिळणार असल्याने शहरवासीयांतून समाधान व्यक्त होत आहे.शहराला सध्या संस्थानकालीन नळपाणी पुरवठा योजना आहे. मात्र, गेल्या ५० वर्षांत शहराची लोकसंख्या वाढल्याने व योजनाही कालबाह्य झाल्याने अपुरा व अनियमित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींना नागरिकांच्या पाणीप्रश्नाला तोंड द्यावे लागत आहे. अपुऱ्या व अनियमित पाण्यामुळे नळ कनेक्शन संख्याही घटल्याने पालिकेच्या उत्पन्नात कमालीची घट आली आहे. शिवाय योजना संस्थानकालीन असल्याने वारंवार लागणाऱ्या गळतीतून पालिका प्रशासनाला आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याने महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत चौदा कोटी ९२ लाख ६८ हजार रुपये खर्चाच्या नवीन पाणी योजनेचा प्रस्ताव करण्यात आला होता.या योजनेला तत्त्वत: मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती. नगराध्यक्षा मनीषा डांगे, ज्येष्ठ नगरसेवक रामचंद्र डांगे, उपनगराध्यक्ष वैभव उगळे, बांधकाम सभापती सुरेश कडाळे यांच्यासह मुख्याधिकारी अतुल पाटील या योजनेचा पाठपुरावा करीत आहेत. योजनेच्या मंजुरीसाठी आमदार उल्हास पाटील यांनी शहरवासीयांना शब्द दिल्याने पालिकेचे शिष्टमंडळ घेऊन आमदार पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून या योजनेला तत्त्वत: मंजुरी मिळवली. त्यामुळे योजना मार्गी लागण्यातील अडसर दूर झाला आहे. (वार्ताहर)औरवाड पुलाजवळ इंटक सध्या शहराला कृष्णा घाट येथील संगमाजवळून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, पंचगंगेच्या दूषित पाण्याचा प्रवाहही या पात्रात मिसळत असल्याने शहरालाही दूषित पाणीच मिळत आहे. नव्या योजनेमुळे पालिकेने याची दखल घेऊन, नृसिंहवाडी-औरवाड पुलापासून सुमारे पाचशे मीटर अंतरावर पाणी उपसा टाकी उभारण्यात येणार असल्याने भविष्यात पंचगंगा नदी प्रदूषणाचा काहीही परिणाम होणार नाही.मुख्यमंत्र्यांची मान्यता : उल्हास पाटीलकुरुंदवाडला शुद्ध आणि मुबलक पाणी कायमस्वरूपी मिळावे, यासाठी केलेल्या प्रयत्नाला यश आले आहे. योजनेचा सत्वर अहवाल सादर करावा, असा आदेश देऊन या योजनेस तत्त्वत: मान्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. यामुळे कुरुंदवाडकरांना स्वच्छ आणि निर्मळ पाणी मिळणार आहे, अशी माहिती आमदार उल्हास पाटील यांनी दिली.