शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कुरुंदवाडमध्ये प्रशासन, आंदोलकांमध्ये समझोता गरजेचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:50 IST

* अन्यथा शहराचे नुकसान अटळ गणपती कोळी : कुरुंदवाड शहरातील विविध प्रश्नांच्या आंदोलनातून शहर बचाव कृती समिती ...

* अन्यथा शहराचे नुकसान अटळ

गणपती कोळी : कुरुंदवाड

शहरातील विविध प्रश्नांच्या आंदोलनातून शहर बचाव कृती समिती आणि पालिका मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्यात तेढ निर्माण झाला आहे. शहराचा विकास साधण्याचा प्रशासन आणि आंदोलक दोघांचाही उद्देश एकच आहे. मात्र एकमेकांबाबत गैरसमज, स्वाभिमान आणि हटवादी भूमिका यामुळे दोघांमधील ताणलेले संबंध शहराच्या दृष्टीने हितावह नाहीत. त्यामुळे दोघांनाही दोन पावले मागे घेऊन प्रश्नांची चर्चेने सोडवणूक करणे गरजेचे आहे. अन्यथा वैयक्तिक राग, द्वेशामुळे वैयक्तिकतेबरोबर शहराचे नुकसान अटळ आहे.

शहरातील अनेक वर्षे दुर्लक्षित राहिलेला रस्त्यांचा प्रश्न, रखडलेली नळ पाणीपुरवठा योजना, अतिक्रमण नियमितीकरण यासह नागरी सुविधांच्या प्रश्नावरून कृती समिती आंदोलन करत आहेत.

लोकशाहीत आंदोलन करण्याचा प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. त्यामुळे प्रशासनाने आंदोलकांचा आदर राखत चर्चेद्वारे प्रश्न समजून घेण्याची तसेच प्रश्नाबाबत कोणती कार्यवाही केली, हे सांगण्याची जबाबदारी मुख्याधिकारी यांची आहे. याउलट वारंवार आंदोलन होत असल्याचे कारण दाखवत आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याने त्यातच जमावबंदी आदेश मोडल्याचे कारण सांगत आंदोलकांवर गुन्हे दाखल केल्याने वाद अधिक निर्माण झाला आहे. तर आंदोलकांनी मुख्याधिकारी यांच्या निषेधार्थ गाव बंद आंदोलन यशस्वी केल्याने तात्त्विक मतभेदाचे रूपांतर वैयक्तिक दोषावर गेले आहे. त्यामुळे वाद चिघळत आहे.

प्रशासनाच्या नैतिक जबाबदारीबरोबर आंदोलकांनीही अधिकाऱ्यांचा सन्मान राखत त्यांना प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी वेळ आणि सहकार्य करण्याची गरज असते. मात्र शहरात दोन्ही बाजूकडून नेमका याच गोष्टीचा अभाव असल्याने व स्वाभिमान जागृत झाल्याने मुख्याधिकारी आणि आंदोलक दोघांनीही प्रतिष्ठा केल्याने दोहोमधील संवाद संपून संबंध ताणले गेले आहेत. दोघांनीही एकमेकांचा वैयक्तिक राग, द्वेश करत टोकाची भूमिका घेतली आहे. यातून काहीअंशी वैयक्तिक जीवनात नुकसान तर होऊ शकतेच शिवाय शहरासाठीही घातक ठरू शकते. त्यामुळे दोघांनाही एकमेकांतील मतभेद, राग, द्वेष संपवून दुरावलेले संबंध आणि संवाद सुरू करण्याची गरज आहे.