शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

कुरुंदवाडमध्ये प्रशासन, आंदोलकांमध्ये समझोता गरजेचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:50 IST

* अन्यथा शहराचे नुकसान अटळ गणपती कोळी : कुरुंदवाड शहरातील विविध प्रश्नांच्या आंदोलनातून शहर बचाव कृती समिती ...

* अन्यथा शहराचे नुकसान अटळ

गणपती कोळी : कुरुंदवाड

शहरातील विविध प्रश्नांच्या आंदोलनातून शहर बचाव कृती समिती आणि पालिका मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्यात तेढ निर्माण झाला आहे. शहराचा विकास साधण्याचा प्रशासन आणि आंदोलक दोघांचाही उद्देश एकच आहे. मात्र एकमेकांबाबत गैरसमज, स्वाभिमान आणि हटवादी भूमिका यामुळे दोघांमधील ताणलेले संबंध शहराच्या दृष्टीने हितावह नाहीत. त्यामुळे दोघांनाही दोन पावले मागे घेऊन प्रश्नांची चर्चेने सोडवणूक करणे गरजेचे आहे. अन्यथा वैयक्तिक राग, द्वेशामुळे वैयक्तिकतेबरोबर शहराचे नुकसान अटळ आहे.

शहरातील अनेक वर्षे दुर्लक्षित राहिलेला रस्त्यांचा प्रश्न, रखडलेली नळ पाणीपुरवठा योजना, अतिक्रमण नियमितीकरण यासह नागरी सुविधांच्या प्रश्नावरून कृती समिती आंदोलन करत आहेत.

लोकशाहीत आंदोलन करण्याचा प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. त्यामुळे प्रशासनाने आंदोलकांचा आदर राखत चर्चेद्वारे प्रश्न समजून घेण्याची तसेच प्रश्नाबाबत कोणती कार्यवाही केली, हे सांगण्याची जबाबदारी मुख्याधिकारी यांची आहे. याउलट वारंवार आंदोलन होत असल्याचे कारण दाखवत आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याने त्यातच जमावबंदी आदेश मोडल्याचे कारण सांगत आंदोलकांवर गुन्हे दाखल केल्याने वाद अधिक निर्माण झाला आहे. तर आंदोलकांनी मुख्याधिकारी यांच्या निषेधार्थ गाव बंद आंदोलन यशस्वी केल्याने तात्त्विक मतभेदाचे रूपांतर वैयक्तिक दोषावर गेले आहे. त्यामुळे वाद चिघळत आहे.

प्रशासनाच्या नैतिक जबाबदारीबरोबर आंदोलकांनीही अधिकाऱ्यांचा सन्मान राखत त्यांना प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी वेळ आणि सहकार्य करण्याची गरज असते. मात्र शहरात दोन्ही बाजूकडून नेमका याच गोष्टीचा अभाव असल्याने व स्वाभिमान जागृत झाल्याने मुख्याधिकारी आणि आंदोलक दोघांनीही प्रतिष्ठा केल्याने दोहोमधील संवाद संपून संबंध ताणले गेले आहेत. दोघांनीही एकमेकांचा वैयक्तिक राग, द्वेश करत टोकाची भूमिका घेतली आहे. यातून काहीअंशी वैयक्तिक जीवनात नुकसान तर होऊ शकतेच शिवाय शहरासाठीही घातक ठरू शकते. त्यामुळे दोघांनाही एकमेकांतील मतभेद, राग, द्वेष संपवून दुरावलेले संबंध आणि संवाद सुरू करण्याची गरज आहे.