शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांची वसंतदादा शुगरच्या बैठकीला दांडी! पुण्यात राजकीय खलबतं; निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे काकांनी बोलावलेली बैठक चुकवली?
2
“मुंबईसाठी अदानी अन् आमची नैतिक लढाई सुरूच राहणार, ती थांबवणार नाही”: संजय राऊत
3
मीरारोडमध्ये भाजपाकडून हळदीकुंकूच्या आड भेटवस्तूंचे वाटप; काँग्रेसची गुन्हा दाखल करण्याची मागणी 
4
आता PF च्या कामासाठी कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज नाही; 'पासपोर्ट केंद्रां'प्रमाणे मिळणार सेवा
5
कुलदीप सेंगर पुन्हा तुरुंगात जाणार? स्थगित शिक्षेविरुद्धच्या याचिकेवर सुनावणी करणार सर्वोच्च न्यायालय
6
'ऑपरेशन सिंदूर'यशस्वी! पाकिस्तानने सात महिन्यानंतर कबूल केले; ब्रह्मोसचा जबरदस्त निशाणा, नूर खान एअरबेसवर विध्वंस
7
सावधान! मोबाईलवर येणारा एक मेसेज तुमचं बँक खातं रिकामं करू शकतो; काय आहे हा नवा 'SIM Box Scam'?
8
राज-उद्धव एकत्र; भाजप-शिंदेसेना तह आणि युद्ध..!
9
'मला वाटलं पुढचा स्टीव्ह जॉब्स मीच आहे..;' सर्गेई ब्रिन यांनी गुगलच्या 'या' अपयशाबद्दल व्यक्त केली खंत
10
"त्यांनी कधीच मला सुनेसारखं वागवलं नाही...", सासूबाईंच्या निधनानंतर अमृता देशमुखची डोळ्यांत पाणी आणणारी पोस्ट
11
निसर्गाचा अजब चमत्कार! पृथ्वीवर एक असे ठिकाण जिथे कधीच पडत नाही थंडी; शास्त्रज्ञही थक्क
12
"ते हात मिळवणार नसतील, तर आम्हालाही गरज नाही!" पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी ओकले भारताविरुद्ध विष
13
BMC Election 2026: नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर, सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी; वॉर्डही ठरले, एबी फॉर्मचे वाटप सुरू
14
टॅरिफ लादणाऱ्या ट्रम्पना धक्का! भारताची निर्यात विक्रमी शिखरावर! २०२६ मध्येही निर्यातीचा 'वारू' सुसाट राहणार
15
५०० वर्षांनी ५ दुर्मिळ योगात २०२६ प्रारंभ: ८ राशींना लक्षणीय लाभ, अकल्पनीय पद-पैसा; शुभ घडेल!
16
Akola Municipal Election 2026: इच्छुकांची धाकधूक वाढली, भाजपची यादी शेवटच्या क्षणी; कारण...
17
सलमानच्या 'बॅटल ऑफ गलवान' अन् आलियाचा 'अल्फा' यांच्यात क्लॅश! 'हा' सिनेमा होणार पोस्टपोन?
18
"जयपूरमध्ये बॉम्बस्फोट होणार!", मध्यरात्री फोन करून धमकी दिली; पोलिसांनी पकडल्यावर वेटर जे म्हणाला... 
19
ठाण्यात शिंदेसेनेपुढे भाजपने नांगी टाकली? शिंदेसेना ८१ ऐवजी ९१ जागा लढणार
20
Astro Tips: तुमच्या हाताच्या मधल्या बोटात लोखंडी अंगठी आहे का? नसेल तर 'हे' नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कुरुंदवाडमध्ये प्रशासन, आंदोलकांमध्ये समझोता गरजेचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:50 IST

* अन्यथा शहराचे नुकसान अटळ गणपती कोळी : कुरुंदवाड शहरातील विविध प्रश्नांच्या आंदोलनातून शहर बचाव कृती समिती ...

* अन्यथा शहराचे नुकसान अटळ

गणपती कोळी : कुरुंदवाड

शहरातील विविध प्रश्नांच्या आंदोलनातून शहर बचाव कृती समिती आणि पालिका मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्यात तेढ निर्माण झाला आहे. शहराचा विकास साधण्याचा प्रशासन आणि आंदोलक दोघांचाही उद्देश एकच आहे. मात्र एकमेकांबाबत गैरसमज, स्वाभिमान आणि हटवादी भूमिका यामुळे दोघांमधील ताणलेले संबंध शहराच्या दृष्टीने हितावह नाहीत. त्यामुळे दोघांनाही दोन पावले मागे घेऊन प्रश्नांची चर्चेने सोडवणूक करणे गरजेचे आहे. अन्यथा वैयक्तिक राग, द्वेशामुळे वैयक्तिकतेबरोबर शहराचे नुकसान अटळ आहे.

शहरातील अनेक वर्षे दुर्लक्षित राहिलेला रस्त्यांचा प्रश्न, रखडलेली नळ पाणीपुरवठा योजना, अतिक्रमण नियमितीकरण यासह नागरी सुविधांच्या प्रश्नावरून कृती समिती आंदोलन करत आहेत.

लोकशाहीत आंदोलन करण्याचा प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. त्यामुळे प्रशासनाने आंदोलकांचा आदर राखत चर्चेद्वारे प्रश्न समजून घेण्याची तसेच प्रश्नाबाबत कोणती कार्यवाही केली, हे सांगण्याची जबाबदारी मुख्याधिकारी यांची आहे. याउलट वारंवार आंदोलन होत असल्याचे कारण दाखवत आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याने त्यातच जमावबंदी आदेश मोडल्याचे कारण सांगत आंदोलकांवर गुन्हे दाखल केल्याने वाद अधिक निर्माण झाला आहे. तर आंदोलकांनी मुख्याधिकारी यांच्या निषेधार्थ गाव बंद आंदोलन यशस्वी केल्याने तात्त्विक मतभेदाचे रूपांतर वैयक्तिक दोषावर गेले आहे. त्यामुळे वाद चिघळत आहे.

प्रशासनाच्या नैतिक जबाबदारीबरोबर आंदोलकांनीही अधिकाऱ्यांचा सन्मान राखत त्यांना प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी वेळ आणि सहकार्य करण्याची गरज असते. मात्र शहरात दोन्ही बाजूकडून नेमका याच गोष्टीचा अभाव असल्याने व स्वाभिमान जागृत झाल्याने मुख्याधिकारी आणि आंदोलक दोघांनीही प्रतिष्ठा केल्याने दोहोमधील संवाद संपून संबंध ताणले गेले आहेत. दोघांनीही एकमेकांचा वैयक्तिक राग, द्वेश करत टोकाची भूमिका घेतली आहे. यातून काहीअंशी वैयक्तिक जीवनात नुकसान तर होऊ शकतेच शिवाय शहरासाठीही घातक ठरू शकते. त्यामुळे दोघांनाही एकमेकांतील मतभेद, राग, द्वेष संपवून दुरावलेले संबंध आणि संवाद सुरू करण्याची गरज आहे.