शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

करूंगळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा डेंग्यूने मृत्यू

By admin | Updated: April 17, 2016 00:42 IST

गावात मोठी साथ : आरोग्य प्रशासनाच्या गलथानपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप

आंबा/मलकापूर : करुंगळे येथील ग्रामपंचायत कर्मचारी आकाराम तुकाराम वारंग (वय ५०) यांचा डेंग्यूने शुक्रवारी मध्यरात्री मृत्यू झाला. आरोग्य प्रशासनाच्या गलथानपणाचा हा बळी ठरल्याचा संताप ग्रामस्थ व लोकप्रतिनिधीतून व्यक्त करण्यात आला. मात्र त्यांचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. डेंग्यू व अन्य तापाच्या साथीमुळे गेले तीन आठवडे ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत. शनिवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत एकवीस रुग्णांना डेंग्यूची लागण झाली असून, त्यांना शासकीय व खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. यामध्ये दोन बालके, सहा शाळकरी मुले, पाच पुरुष व आठ महिलांचा समावेश आहे. बाधित असणाऱ्यांची नावे : सुवर्णा पांडुरंग वारंग (वय ४०), मंदा अरुण कांबळे (२५), प्रगती संजय वारंग (२५), सविता केशव वारंग (३०), मानूबाई यशवंत कदम (६२), वंदना कृष्णा कदम (४५), राजश्री रविंद्र घाटगे (३५), वैशाली केरबा वारंग (२८), साहील रविंद्र चाळके (२२), तानाजी नामदेव वारंग (२७), लक्ष्मण शंकर वारंग (४०), केशव आण्णा वारंग (३५), संजय शामराव वारंग (३२), पूनम लक्ष्मण वारंग (२५), असंतोष अरुण कांबळे (१४), स्वप्नील प्रकाश पाटील (१३), रवी पांडुरंग वारंग (१२), करण शिवाजी वारंग (८), साहील केशव वारंग (७), सोहम केशव वारंग (५), स्वरा संजय वारंग (३). याबाबत ‘लोकमत’ने आवाज उठविला होता. वृत्तानंतर परळेनिनाईचे आरोग्य पथक कार्यरत होते. तरीही वस्तीत डेंग्यूची साथ राहिली. आतापर्यंत पंधरा रुग्ण उपचार करून घरी परतले. एकवीसजणांवर उपचार चालू आहेत. शनिवारी आकाराम वारंग या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याने तालुका अधिकारी, आमदार, जिल्हा परिषद सदस्यांनी धाव घेऊन येथील साथीवर धोरणात्मक उपाय व प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याचे आदेश आमदार सत्यजित पाटील यांनी दुपारी झालेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत दिले. यामध्ये तहसीलदार ऋषीकेत शेळके व गटविकास अधिकारी डॉ. उदय पाटील यांनी ग्रामसेवक व आरोग्य कर्मचाऱ्याचे तीस जणांचे पथक स्थापन करून, उद्याचा ड्राय डे गावात राबवून सर्व घरांतील पाण्याची भांडी मोकळी करून, कोरडी केली जातील. सांडपाण्याचे साठे मुजवून डास निर्मुलनाची मोहीम होईल. प्रत्यक्ष कुटुंबाची भेट घेऊन सर्व्हे होईल, असे ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. दरम्यान, बैठक घेऊन स्वच्छता मोहीम राबविण्याचे ठरवण्यात आले. घरात सोडल्यानंतर मृत्यू आकाराम वारंग या कर्मचाऱ्याला चार दिवसांपासून ताप येत होता. शनिवारी दिवसभर आकारामने गावच्या योजनेचे पाणी गावाला सोडले आणि सायंकाळी त्यांचा ताप वाढल्याने सहा वाजता उपचारास दवाखान्यात गेले. चार तासांच्या उपचार दरम्यान त्यांना उलट्या झाल्या. ते गंभीर झाल्याने त्यांना आरोग्य पथकाने रात्री साडेदहाला घरी सोडले आणि तासाभरात त्यांचा मृत्यू झाला. सीपीआरमधील बेदखल... गावातून सीपीआरमध्ये गेलेल्या डेंग्यू तापाच्या रुग्णांना अपघात विभागात बसा, नंतर बघू अशी वागणूक दिली जात असल्याने अनेक रुग्ण खासगी दवाखान्याकडे वळल्याचे नांदगावकर यांनी सांगून आतापर्यंत तीन लाखापर्यंत खर्च रुग्णांना झाल्याचे बैठकीत स्पष्ट केले. आमदारांनी फोन केल्यानंतर रुग्णाला सीपीआरचा उपचार मिळत नसेल, तर सामान्यांचे काय हाल राहतील, अशी पोटतिडीक आनंद वारंग यांनी मांडली.