शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

क्षारपडमुक्ती योजना शेतकऱ्यांना ठरली संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:59 IST

भालचंद्र नांद्रेकर दानोळी : गेली पंचवीस वर्षे शेती फक्त सात-बारावर नावालाच होती. क्षारपडीमुळे नापीक बनली होती. भविष्यात अशी शेती ...

भालचंद्र नांद्रेकर

दानोळी

: गेली पंचवीस वर्षे शेती फक्त सात-बारावर नावालाच होती. क्षारपडीमुळे नापीक बनली होती. भविष्यात अशी शेती पिकू शकेल, याची आशाही सोडली होती. उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या पुढाकाराने क्षारपडमुक्त योजना अशा जमिनीला संजीवनी ठरली आणि कवठेसार (ता. शिरोळ) येथील पूर्णत: क्षारपड व निमक्षारपड अशी चारशेहून अधिक एकर क्षेत्रातील जमीन पिकविण्यायोग्य झाली.

जमिनीत क्षाराचे प्रमाण हळूहळू वाढून शेती पूर्णत: नापीक बनली. कोणतेही पीक किंवा गवतही उगवत नव्हते. काटेरी झाडाझुडपांमध्ये शेत हरवले होते. क्षारपड म्हणजे कधीही न पिकणारी शेती, असा जणू शिक्काच पडला. अशा शेतीवर उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती कोलमडून गेली तर अनेकांनी गरजेपोटी कवडीमोल किमतीत शेत विकले. क्षारपड जमिनीत चर काढून सच्छिद्र पाइपचे जाळे टाकून सायपन पद्धतीने क्षारयुक्त पाणी काढले जाते. हे पाणी प्रत्येक शेतकऱ्याने वैयक्तिकपणे पाइपलाइनद्वारे नदी, ओढ्यात सोडणे खर्चीक आहे यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन मोठ्या पाइपचा वापर करून पाणी बाहेर काढल्याने मोठा खर्चही वाचला आहे. सुरुवातीला अनेक शेतकऱ्यांनी असा उपक्रम यशस्वी होतो का, तसेच असे यशस्वी झालेले उपक्रम यशस्वी झाल्याची खात्री करून आपणहून सहभागी झाले.

सध्या या योजनेतून व खासगी योजनेतून पाचशेहून अधिक एकर शेती पिकाऊ झाली असून, शेतकरी उसासह गहू, हरभरा, शाळू अशी पिके घेत आहेत. अनेक गावांत क्षारपड शेतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असून, शासनाने योजना राबविल्यास याचा शेतकऱ्यांना मोठा लाभ होईल.

चौकट -

क्षारपडमुक्त शेतीचा फायदा कोणाला!

शेतकऱ्यांना आपली पूर्वीसारखी शेतजमीन परत मिळाली, साखर कारखान्यास ऊस वाढला, बँकांना कर्जदार मिळाले, शेतमजुरांना रोजगार मिळाला, ट्रॅक्टरधारकांना मशागतीचे काम मिळाले, तसेच शासनाचा महसूलही वाढणार.

कोट -

२५ वर्षांपासून आमचे शेत क्षारपड होते. गेल्या वर्षी सच्छिद्र पाइप टाकून क्षारयुक्त पाणी बाहेर काढले. यावर्षी लागणीचा ऊस जाऊन ३८ गुंठ्यात ५३ टन ऊस निघाला.

- राजाराम गाडवे, शेतकरी कवठेसार फोटो - ०३०२२०२१-जेएवाय-०१

फोटो ओळ - कवठेसार (ता. शिरोळ) येथील काशीम मुलाणी यांनी आपल्या क्षारमुक्त शेतात पहिले गव्हाचे यशस्वी पीक घेतले आहे.