शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

कृष्णा काठच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात

By admin | Updated: January 25, 2016 01:01 IST

जलपर्णीचा विळखा : नदीत काळसर, हिरवट पाण्याचा उग्र वास; साथीच्या आजारांचा फैलाव

जयसिंगपूर : गेल्या काही दिवसांपासून कृष्णा नदीचे पाणी प्रदूषित होत आहे. नदीला काळेकुट्ट रसायनयुक्त पाणी आल्याने जलचर प्राणी मृत पावत आहेत, तसेच मोठ्या प्रमाणात जलपर्णीचा विळखा पडल्याने पाण्यातील आॅक्सिजनचे प्रमाण कमी होऊन पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. यामुळे जयसिंगपूरसह कृष्णा नदीकाठच्या गावांत आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. सांगली-कोल्हापूर जिल्ह्याचा हद्द असलेली व शिरोळ तालुक्याची जीवनदायी असणारी कृष्णा नदी गेल्या काही दिवसांपासून दूषित पाण्याच्या विळख्यात सापडली आहे. गेला पावसाळा कोरडा गेल्याने नदी पात्रात अल्पसा पाणीसाठा असून पाण्याचा प्रवाह मंदावला आहे. सांगली जिल्ह्यातील दूषित पाणी थेट कृष्णा नदीत मिसळत असल्यामुळे शिरोळ तालुक्यातील गावांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे सांगली विभागाच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने दुर्लक्ष केले आहे. शिरोळ तालुक्यातील सामाजिक संघटनांनी अनेकवेळा आंदोलने करूनही त्याकडे गांभीर्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी न पाहिल्यामुळे नदी प्रदूषित करणाऱ्या घटकांना चालना मिळत आहे. गेल्या आठवड्याभरापासून नदी प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. नदीत मोठ्या प्रमाणात जलपर्णी आल्यामुळे नदीतील पाणी हिरवट व काळसर झाले आहे. त्यामुळे पाण्याचा उग्र वास येत असून नदीतील जलचर प्राणी मृत होत आहेत. यामुळेही नदी प्रदूषणात भरच पडत आहे. काही ग्रामपंचायतीकडे जलशुद्धीकरण केंद्र नसल्यामुळे नदीतून थेट पाणी नळास येत असल्याने हे पाणी धोकादायक बनले आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत असूनसाथीच्या आजारांचा फैलाव होत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे वारंवार तक्रार करूनही याकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. चार दिवसांपूर्वी उदगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील दोन्ही विभागाच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना नदी प्रदूषणाबाबत घेराव घालून जाब विचारला होता. प्रदूषण करणाऱ्या घटकावर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिला होता. याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठोस पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.