शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

कोल्हापूरच्या रजतनी ऑटो रिक्षातून केली उत्तर भारताची सफर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क , कोल्हापूर : काहीतरी वेगळं करण्यासाठी आणि त्यातूनही सामाजिक संदेश देण्यात कोल्हापूरकर प्रसिद्ध आहेत. कोल्हापूरचे सुपुत्र ...

लोकमत न्यूज नेटवर्क ,

कोल्हापूर : काहीतरी वेगळं करण्यासाठी आणि त्यातूनही सामाजिक संदेश देण्यात कोल्हापूरकर प्रसिद्ध आहेत. कोल्हापूरचे सुपुत्र रजत ओसवाल यांनी चक्क ऑटो रिक्षातून २७ दिवसांत पाच हजार ६४० किलो मीटरचा टप्पा पार करीत उत्तर भारताची सफर पूर्ण केली. या मोहिमेत त्यांनी पर्यावरण व सामाजिक संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न केला. शनिवारी ते मोहीम पूर्ण करून कोल्हापुरात आले असता त्यांचे स्वागत न्यू पॅलेस येथे शाहू छत्रपती यांनी पुष्पगुच्छ देऊन केले.

हिमालयाच्या पर्वतरांगांनी नटलेला उत्तर भारत हा पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतो. आजवर सायकल, बुलेट आणि चारचाकीमधून अनेकांनी उत्तर भारताचा साहसी प्रवास केला आहे; पण ऑटो रिक्षातून हा साहसी प्रवासाचा पहिलाच प्रयत्न रजतने केला. कोल्हापुरातून २० डिसेंबरला मनाली, ऋषीकेश दौऱ्यासाठी रजत आणि त्यांच्या सहकारी डॉ. नम्रता सिंग रवाना झाल्या. या दरम्यान विविध राज्यांत त्यांना अतिशय चांगले अनुभव आले. प्रवासादरम्यान विविध राज्यांतील पोलिसांनी त्यांना चहा, नाष्टा, जेवण आणि प्रवासात संरक्षण दिलं. वाहन दुरुस्तीसाठी अनेक ट्रकचालकांनी साहाय्य केले. मोहिमेदरम्यान बर्फ पडत होता. त्यामुळे त्यांच्या सहकारी सिंग आजारी पडल्या. त्यामुळे त्यांना मोहिमेतून माघार घ्यावी लागली. गुजरात, राजस्थान, पंजाब, हिमाचल असा पाच हजार ६४० किलोमीटरचा साहसी प्रवास करून रजत शनिवारी कोल्हापुरात दाखल झाले.

या प्रवासादरम्यान त्यांनी गावोगावी जात स्तनाचा कर्करोग आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. दक्षिण भारत आणि कॅनडाचा दौरा करणार असल्याचा संकल्प त्यांनी जाहीर केला. यावेळी जयेश ओसवाल, तेज घाटगे, अभिषेक मोहिते, अस्कीन आजरेकर, योगेश परमार, प्रवीण चव्हाण, दिनेश राठोड, सुमित रायगांधी, प्रतापसिंह घोरपडे, मनोज जाधव, राजेंद्र दळवी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

फोटो : १६०१२०२१-कॉल-रजत

फोटो ओळी : कोल्हापुरातील न्यू पॅलेस येथे रिक्षातून उत्तर भारताची सफर पूर्ण करून दाखल झालेल्या रजत ओसवाल यांचे स्वागत शाहू छत्रपती यांनी पुष्पगुच्छ देऊन केले.

( छाया : आदित्य वेल्हाळ)