शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या रजतनी ऑटो रिक्षातून केली उत्तर भारताची सफर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क , कोल्हापूर : काहीतरी वेगळं करण्यासाठी आणि त्यातूनही सामाजिक संदेश देण्यात कोल्हापूरकर प्रसिद्ध आहेत. कोल्हापूरचे सुपुत्र ...

लोकमत न्यूज नेटवर्क ,

कोल्हापूर : काहीतरी वेगळं करण्यासाठी आणि त्यातूनही सामाजिक संदेश देण्यात कोल्हापूरकर प्रसिद्ध आहेत. कोल्हापूरचे सुपुत्र रजत ओसवाल यांनी चक्क ऑटो रिक्षातून २७ दिवसांत पाच हजार ६४० किलो मीटरचा टप्पा पार करीत उत्तर भारताची सफर पूर्ण केली. या मोहिमेत त्यांनी पर्यावरण व सामाजिक संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न केला. शनिवारी ते मोहीम पूर्ण करून कोल्हापुरात आले असता त्यांचे स्वागत न्यू पॅलेस येथे शाहू छत्रपती यांनी पुष्पगुच्छ देऊन केले.

हिमालयाच्या पर्वतरांगांनी नटलेला उत्तर भारत हा पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतो. आजवर सायकल, बुलेट आणि चारचाकीमधून अनेकांनी उत्तर भारताचा साहसी प्रवास केला आहे; पण ऑटो रिक्षातून हा साहसी प्रवासाचा पहिलाच प्रयत्न रजतने केला. कोल्हापुरातून २० डिसेंबरला मनाली, ऋषीकेश दौऱ्यासाठी रजत आणि त्यांच्या सहकारी डॉ. नम्रता सिंग रवाना झाल्या. या दरम्यान विविध राज्यांत त्यांना अतिशय चांगले अनुभव आले. प्रवासादरम्यान विविध राज्यांतील पोलिसांनी त्यांना चहा, नाष्टा, जेवण आणि प्रवासात संरक्षण दिलं. वाहन दुरुस्तीसाठी अनेक ट्रकचालकांनी साहाय्य केले. मोहिमेदरम्यान बर्फ पडत होता. त्यामुळे त्यांच्या सहकारी सिंग आजारी पडल्या. त्यामुळे त्यांना मोहिमेतून माघार घ्यावी लागली. गुजरात, राजस्थान, पंजाब, हिमाचल असा पाच हजार ६४० किलोमीटरचा साहसी प्रवास करून रजत शनिवारी कोल्हापुरात दाखल झाले.

या प्रवासादरम्यान त्यांनी गावोगावी जात स्तनाचा कर्करोग आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. दक्षिण भारत आणि कॅनडाचा दौरा करणार असल्याचा संकल्प त्यांनी जाहीर केला. यावेळी जयेश ओसवाल, तेज घाटगे, अभिषेक मोहिते, अस्कीन आजरेकर, योगेश परमार, प्रवीण चव्हाण, दिनेश राठोड, सुमित रायगांधी, प्रतापसिंह घोरपडे, मनोज जाधव, राजेंद्र दळवी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

फोटो : १६०१२०२१-कॉल-रजत

फोटो ओळी : कोल्हापुरातील न्यू पॅलेस येथे रिक्षातून उत्तर भारताची सफर पूर्ण करून दाखल झालेल्या रजत ओसवाल यांचे स्वागत शाहू छत्रपती यांनी पुष्पगुच्छ देऊन केले.

( छाया : आदित्य वेल्हाळ)