शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
3
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
4
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
5
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
6
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
7
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
8
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
9
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
10
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
11
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
12
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
13
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
14
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
15
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
16
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
17
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
18
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
19
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
20
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट

इतर जिल्ह्यांतील रुग्णांमुळे वाढला कोल्हापूरचा मृत्युदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:23 IST

कोल्हापूर : कोल्हापूर शहर हे वैद्यकीयदृष्ट्या विकसित झाल्याने कोरोनाचे अनेक जिल्ह्यांतील रुग्ण येथे ...

कोल्हापूर : कोल्हापूर शहर हे वैद्यकीयदृष्ट्या विकसित झाल्याने कोरोनाचे अनेक जिल्ह्यांतील रुग्ण येथे उपचारांसाठी येत आहेत. त्यामुळे मृत्यू पावणाऱ्या कोरोना रुग्णांमध्येही इतर जिल्ह्यांतील रुग्णांचा समावेश आहे. गेल्या २३ दिवसांत कोल्हापूर जिल्ह्यात २३६ मृत्यू झाले. त्यातील ४९ जण (सरासरी २१ टक्के) हे अन्य जिल्ह्यांतील आहेत. अन्य जिल्ह्यांतील रुग्णांच्या मृत्यूमुळे कोल्हापूर जिल्ह्याचा मृत्युदरही वाढत असल्याचे चित्र आहे. कोल्हापूरचा मृत्युदर ३.२ असून, तो राज्य व देशाच्या मृत्युदराच्या दुप्पट आहे. त्यामुळे हा दर एवढा जास्त का आहे याचा शोध ‘लोकमत’ने घेतला.

गेल्यावर्षी कोरोनाचा कहर सुरू झाल्यापासून सुरुवातीला परिस्थिती नियंत्रणामध्ये होती; परंतु जूननंतर कोरोनाचे रुग्ण वाढू लागले. सप्टेंबरमध्ये तर उच्चांकी रुग्णसंख्या नोंदली गेली. आक्टोंबरनंतर पुन्हा कोरोनाचे रुग्ण कमी होऊ लागले. ऑगस्टमध्येही मृतांच्या संख्येत मोठी वाढ झाली होती. २०२० मध्ये सर्वाधिक एका दिवसात ३३ मृतांची संख्या ऑगस्टमध्ये नोंदविण्यात आली होती.

मात्र, १९ एप्रिल २०२१ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील आतापर्यंतची सर्वाधिक म्हणजे ३४ ही मृतांची संख्या नोंदविण्यात आली. जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये मृतांची संख्या तुलनेत नियंत्रणामध्ये होती. एप्रिलच्या १५ तारखेपर्यंतही ती अतिशय कमी होती. मात्र, १६ एप्रिलनंतर ही संख्या वाढत गेल्याचे दिसून येते. या आकडेवारीचा विचार करता अन्य जिल्ह्यांतील मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्याही दखल घेण्याजोगी आहे. २३६ पैकी तब्बल ४९ रुग्ण हे अन्य जिल्ह्यांतील आहेत. जे उपचारांसाठी कोल्हापुरात दाखल झाले होते.

चौकट -

जानेवारीपासूनचे मृत्यू

जानेवारी २०२१ : ११

फेब्रुवारी २०२१ : २२

मार्च २०२१ : २७

२३ एप्रिलपर्यंत : २३६

एकूण २९६

चौकट

सांगलीपासून सिंधुदुर्गपर्यंतचे रुग्ण

एकतर कोल्हापूर हे वैद्यकीयदृष्ट्या पुढारलेले शहर आहे. सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, निपाणी यांचा केंद्रबिंदू मानले जाते. या शहरातील अनेकजण नोकरी, व्यवसायानिमित्त कोल्हापुरात स्थायिक झाले आहेत. त्यामुळे आपले आई, वडील, नातेवाईक यांना उपचारांसाठी कोल्हापुरात आणले जाते. त्यामुळे बाधित रुग्णांच्या संख्येतही अन्य जिल्ह्यांतून आलेल्या रुग्णांची मोठी संख्या आहे. केवळ २३ दिवसांमध्ये अन्य जिल्ह्यांतील ४९ रुग्णांचा समावेश असून, यामध्ये सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांतील रुग्णांची संख्या जास्त आहे.

कोट

कोल्हापूर जिल्ह्यातील मृतांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या जास्त आहे. दुसऱ्या लाटेतील कोरोना व्हायरस हा मल्टिस्टेन आहे. त्याचे स्वरूप तीव्र आहे. अशातच आजार अंगावर काढला जातो. मुळातच ज्येष्ठ नागरिक हे व्याधीग्रस्त असतात. त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली असते. या सगळ्यांचा परिणाम म्हणजे मृतांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या जास्त आहे.

डॉ. योगेश साळे

जिल्हा आरोग्य अधिकरी, कोल्हापूर जिल्हा परिषद

मृत्युदर वाढण्याची कारणे

१.कोरोनाला बळी पडण्यात ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण जास्त

२.उपचारासाठी वेळाने दाखल होणे

३.इतर जिल्ह्यांतील रुग्णांच्या मृत्यूची नोंद कोल्हापूरच्या यादीत

४.व्याधीग्रस्त लोकांची प्रतिकारशक्ती कमी