शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

इतर जिल्ह्यांतील रुग्णांमुळे वाढला कोल्हापूरचा मृत्युदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:23 IST

कोल्हापूर : कोल्हापूर शहर हे वैद्यकीयदृष्ट्या विकसित झाल्याने कोरोनाचे अनेक जिल्ह्यांतील रुग्ण येथे ...

कोल्हापूर : कोल्हापूर शहर हे वैद्यकीयदृष्ट्या विकसित झाल्याने कोरोनाचे अनेक जिल्ह्यांतील रुग्ण येथे उपचारांसाठी येत आहेत. त्यामुळे मृत्यू पावणाऱ्या कोरोना रुग्णांमध्येही इतर जिल्ह्यांतील रुग्णांचा समावेश आहे. गेल्या २३ दिवसांत कोल्हापूर जिल्ह्यात २३६ मृत्यू झाले. त्यातील ४९ जण (सरासरी २१ टक्के) हे अन्य जिल्ह्यांतील आहेत. अन्य जिल्ह्यांतील रुग्णांच्या मृत्यूमुळे कोल्हापूर जिल्ह्याचा मृत्युदरही वाढत असल्याचे चित्र आहे. कोल्हापूरचा मृत्युदर ३.२ असून, तो राज्य व देशाच्या मृत्युदराच्या दुप्पट आहे. त्यामुळे हा दर एवढा जास्त का आहे याचा शोध ‘लोकमत’ने घेतला.

गेल्यावर्षी कोरोनाचा कहर सुरू झाल्यापासून सुरुवातीला परिस्थिती नियंत्रणामध्ये होती; परंतु जूननंतर कोरोनाचे रुग्ण वाढू लागले. सप्टेंबरमध्ये तर उच्चांकी रुग्णसंख्या नोंदली गेली. आक्टोंबरनंतर पुन्हा कोरोनाचे रुग्ण कमी होऊ लागले. ऑगस्टमध्येही मृतांच्या संख्येत मोठी वाढ झाली होती. २०२० मध्ये सर्वाधिक एका दिवसात ३३ मृतांची संख्या ऑगस्टमध्ये नोंदविण्यात आली होती.

मात्र, १९ एप्रिल २०२१ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील आतापर्यंतची सर्वाधिक म्हणजे ३४ ही मृतांची संख्या नोंदविण्यात आली. जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये मृतांची संख्या तुलनेत नियंत्रणामध्ये होती. एप्रिलच्या १५ तारखेपर्यंतही ती अतिशय कमी होती. मात्र, १६ एप्रिलनंतर ही संख्या वाढत गेल्याचे दिसून येते. या आकडेवारीचा विचार करता अन्य जिल्ह्यांतील मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्याही दखल घेण्याजोगी आहे. २३६ पैकी तब्बल ४९ रुग्ण हे अन्य जिल्ह्यांतील आहेत. जे उपचारांसाठी कोल्हापुरात दाखल झाले होते.

चौकट -

जानेवारीपासूनचे मृत्यू

जानेवारी २०२१ : ११

फेब्रुवारी २०२१ : २२

मार्च २०२१ : २७

२३ एप्रिलपर्यंत : २३६

एकूण २९६

चौकट

सांगलीपासून सिंधुदुर्गपर्यंतचे रुग्ण

एकतर कोल्हापूर हे वैद्यकीयदृष्ट्या पुढारलेले शहर आहे. सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, निपाणी यांचा केंद्रबिंदू मानले जाते. या शहरातील अनेकजण नोकरी, व्यवसायानिमित्त कोल्हापुरात स्थायिक झाले आहेत. त्यामुळे आपले आई, वडील, नातेवाईक यांना उपचारांसाठी कोल्हापुरात आणले जाते. त्यामुळे बाधित रुग्णांच्या संख्येतही अन्य जिल्ह्यांतून आलेल्या रुग्णांची मोठी संख्या आहे. केवळ २३ दिवसांमध्ये अन्य जिल्ह्यांतील ४९ रुग्णांचा समावेश असून, यामध्ये सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांतील रुग्णांची संख्या जास्त आहे.

कोट

कोल्हापूर जिल्ह्यातील मृतांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या जास्त आहे. दुसऱ्या लाटेतील कोरोना व्हायरस हा मल्टिस्टेन आहे. त्याचे स्वरूप तीव्र आहे. अशातच आजार अंगावर काढला जातो. मुळातच ज्येष्ठ नागरिक हे व्याधीग्रस्त असतात. त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली असते. या सगळ्यांचा परिणाम म्हणजे मृतांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या जास्त आहे.

डॉ. योगेश साळे

जिल्हा आरोग्य अधिकरी, कोल्हापूर जिल्हा परिषद

मृत्युदर वाढण्याची कारणे

१.कोरोनाला बळी पडण्यात ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण जास्त

२.उपचारासाठी वेळाने दाखल होणे

३.इतर जिल्ह्यांतील रुग्णांच्या मृत्यूची नोंद कोल्हापूरच्या यादीत

४.व्याधीग्रस्त लोकांची प्रतिकारशक्ती कमी