शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

कोल्हापूरचा महापुराचा विळखा सैल, राष्ट्रीय महामार्ग सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:26 IST

कोल्हापूर : पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतल्याने सोमवारी पाणी वेगाने उतरू लागल्याने कोल्हापुरातील महापुराचा विळखाही सैल झाला. राष्ट्रीय महामार्गही वाहतुकीसाठी ...

कोल्हापूर : पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतल्याने सोमवारी पाणी वेगाने उतरू लागल्याने कोल्हापुरातील महापुराचा विळखाही सैल झाला. राष्ट्रीय महामार्गही वाहतुकीसाठी खुला झाला असून सर्व प्रकारची वाहतूक सुरू झाली आहे. रविवारी संध्याकाळी उघडलेले राधानगरी धरणाचे पाचपैकी चार स्वयंचलित दरवाजे बंद झाल्याने विसर्ग कमी झाला आहे. पाऊस थांबून कडक ऊन पडल्याने मदतकार्य वेगावले असून पूर ओसरेल तसा घराघरांत, दुकानात स्वच्छतेची कामेही युद्धपातळीवर सुरू आहेत. दरम्यान, जिल्ह्यात अजूनही पूरग्रस्त भागात एनडीआरएफकडून बचावकार्य सुरू आहे. पाऊस आणि पूर ओसरल्याने ठप्प झालेले जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले असून भाजीपाला, गॅस, पेट्रोलची टंचाई दूर झाली आहे. आज मंगळवारपासून शहरातील पाणीपुरवठा देखील सुरळीत होत आहे.

कोल्हापूर जिल्ह्याला गुरुवारपासून महापुराचा पडलेला विळखा पाऊस कमी झाल्याने रविवारपासूनच सैल होऊ लागला होता, पण रविवारी संध्याकाळपासून मध्यरात्रीपर्यंत जोरदार पाऊस सुरू झाल्याने राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे उघडल्याने भोगावती नदी पात्रातून पंचगंगा खोऱ्यात ८ हजार क्युसेकने विसर्ग सुरू झाल्याने पुन्हा महापुराची धास्ती वाढली होती, पण सोमवारी दिवसभर पाऊस पूर्णपणे उघडल्याने आणि कडकडीत ऊन पडल्याने नद्यांचे पाणी झपाट्याने ओसरु लागले. पाऊस थांबल्याने दुपारी एक ते दोन या तासाभरात काल उघडलेले राधानगरीचे पाचपैकी चारही दरवाजे बंद झाल्याने विसर्ग केवळ २८०० क्युसेकवर आला आहे. विसर्ग कमी झाल्याने पंचगंगेची पाणीपातळी देखील तासाला दोन इंच या प्रमाणे कमी होत ती संध्याकाळपर्यंत ४७ फुटापर्यंत खाली आली आहे. तरीदेखील ती ४३ फूट या धोक्याच्या पातळीवरूनच वाहत असल्याने अजून एकूण पूर बाधितांपैकी निम्मे लोक अजूनही पुरातच अडकलेले आहेत.

दरम्यान, सोमवारी दिवसभर कडकडीत ऊन पडल्याने जनजीवन बऱ्यापैकी पूर्वपदावर आले असून बाजारपेठेतही खरेदीसाठी गर्दी उसळली. शहरातील प्रमुख रस्तेही माणसांच्या गर्दीने फुलले आहेत. महामार्ग बंद असल्याने पेट्रोल, गॅसची टंचाई मोठ्याप्रमाणावर जाणवत होती. सोमवारी दुपारी महामार्ग सुरू झाल्यानंतर हा पुरवठा सुरळीत झाला.

महामार्गावरून वाहतूक सुरू

महापुराचे पाणी रस्त्यावर आल्याने शिरोली, किणी, कागल आयबीपी येथे महामार्ग बंद झाला हाेता. सोमवारी दुपारी बारानंतर या तीनही ठिकाणचे पाणी पूर्णपणे ओसरल्याचे पाहून पोलिसांमार्फत पाहणी झाल्यानंतर महामार्गावरून वाहतूक सुरू केली. यामुळे गेल्या चार दिवसांपासून खोळंबलेली महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली आहे. कोल्हापूर ते पुणे, कोल्हापूर ते बेळगाव वाहतूक सुरू झाली.

पेट्रोल सुरू..पाणीपुरवठा आजपासून शक्य

महापुरात पिण्याचे पाणी व पेट्रोलसाठी लोकांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. महामार्ग बंद राहिल्याने इंधन टँकर शहरात न आल्याने इंधनाची टंचाई होती. महामार्ग सुरू झाल्याने ती दूर झाली. महापालिका जलशुद्धिकरण केंद्राचे वीज पंप पाण्यात बुडाल्याने शहर पाणीपुरवठा खंडित झाला होता तो आजपासून सुरू होण्याची शक्यता आहे.

राधानगरीचा एकच दरवाजा खुला

जिल्ह्यातील राधानगरी धरण ९९ टक्के भरले आहे. चार दरवाजे बंद असून विद्युत विमोचकातून १४००, सिंचन विमोचकातून १४२८ असा एकूण २८२८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. राधानगरी धरणाचा पाच क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा अजून खुला आहे.

प्रमुख बंधाऱ्यावरील पाणीपातळी

राजाराम ४७ फूट, सुर्वे ४५ फूट, रुई ७७ फूट, इचलकरंजी ७५, तेरवाड ७४ फूट, शिरोळ ७४ फूट, तर नृसिंहवाडी बंधाऱ्याची ७४ फूट

७४ बंधारे पारण्याखाली

पंचगंगा नदी- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ. भोगावती नदी- राशिवडे, हळदी, खडक कोगे, सरकारी कोगे, तारळे व शिरगाव.

तुळशी नदी- बीड व आरे, कासारी नदी- यवलूज, ठाणे-आळवे, पुनाळ-तिरपण, बाजार -भोगाव, पेंडाखळे, कांटे, करंजफेण व वालोली.

कुंभी नदी- शेणवडे, कळे, वेतवडे व मांडुकली. धामणी नदी- पनोरे, सुळे व आंबर्डे, वारणा नदी- चिंचोली, माणगाव, कोडोली, शिगांव, मांगलेसावर्डे, तांदुळवाडी, चावरे, खोची व दानोळी.

कडवी नदी- वाळूर, भोसलेवाडी, येलूर, कोपार्डे, शिगांव, सवते सावर्डे व सरुडपाटणे.

दूधगंगा नदी- सिद्धनेर्ली, सुळकुड, बाचणी, दत्तवाड, सुळंबी, व कसबा वाळवे.

वेदगंगा नदी- निळपण, वाघापूर, कुरणी, बस्तवडे, सुरुपली व चिखली.

हिरण्यकेशी नदी- ऐनापूर, निलजी, गिजवणे, खाणदळ, जरळी व हरळी.

घटप्रभा नदी- कानडे सावर्डे, हिंडगाव, तारेवाडी, अडकूर व कानडेवाडी,

ताम्रपर्णी नदी- कोवाड, चंदगड, कुर्तनवाडी, हल्लारवाडी व माणगाव,

जिल्ह्यातील धरणांतील पाणीसाठा (दशलक्ष घनमीटरमध्ये)

तुळशी - ९४.४७

वारणा -८८६.२४

दूधगंगा -५९०.७७

कासारी- ६३.५१

कडवी - ७१.२४

कुंभी - ६८.६०

पाटगाव- ९४.९३

चिकोत्रा-४०.०९

चित्री - ५३.४१

आंबेआहोळ - ३०.९८