शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

कोल्हापूरचा गो‘सेवक’ अवधूत सोळंकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 00:32 IST

 वसू बारस विशेषभरत बुटाले ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ‘इच्छा तेथे भाव आणि मनी तेथे देव’ या म्हणीची प्रचिती देणारे अवलिया अवधूत सोळंकी. दररोज ५० वर गार्इंच्या उदरभरणाचा वसाच या सेवकाने घेतला आहे. गेली दोन वर्षे त्यांचा हा उपक्रम अखंडितपणे सुरू आहे. आज ‘वसू बारस’च्या निमित्ताने त्यांच्या कार्याविषयी घेतलेला आढावा.बीएचएमएस असलेले ...

 

वसू बारस विशेषभरत बुटाले ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ‘इच्छा तेथे भाव आणि मनी तेथे देव’ या म्हणीची प्रचिती देणारे अवलिया अवधूत सोळंकी. दररोज ५० वर गार्इंच्या उदरभरणाचा वसाच या सेवकाने घेतला आहे. गेली दोन वर्षे त्यांचा हा उपक्रम अखंडितपणे सुरू आहे. आज ‘वसू बारस’च्या निमित्ताने त्यांच्या कार्याविषयी घेतलेला आढावा.बीएचएमएस असलेले ३७ वर्षीय अवधूत सोळंकी येथील सागरमाळ परिसरात कुटुंबासह राहतात. या कुटुंबीयांची सकाळ इतरांपेक्षा जरा वेगळीच आहे. सकाळी साडेसहा वाजले की त्यांच्या दारात परिसरातील गाई येण्यास सुरुवात होते. त्याचवेळी अवधूत यांचे काम सुरू होते. प्रथम ते घरात ठेवलेल्या पोत्यातील भुस्सा प्लास्टिकच्या बुट्ट्यांमध्ये काढतात. एक एक करीत तब्बल २२ बुट्ट्या भरल्या जातात. त्या दारात आणूपर्यंत गो‘कुळा’चा गोतावळ्याने अंगण भरून जाते. प्रत्येकीसमोर ते खाद्याची बुट्टी ठेवतात. ‘हरे कृष्ण.. हरे कृष्ण’चा जप करीतच ते गाई-वासरांच्या पाठीवर, मुखावर वात्सल्याचा हात फिरवत गोतावळ्यात रमून जातात. प्रत्येक गाईला व्यवस्थित खाद्य मिळते का, यावरही त्यांची नजर असते. तोपर्यंत त्यांच्या पत्नी लक्ष्मी या दारातील दोन-तीन कुंड्यांमध्ये गार्इंसाठी पाण्याची व्यवस्था करतात.सकाळी साडेसहा ते साधारण दहा-अकरापर्यंत तरी हे कार्य सुरू असते. त्या काळात जितक्या गाई येतील त्यांना खाद्य मिळतेच. गार्इंनाही आपण इथून उपाशी जाणार नाही, अशी हमीच वाटावी इतकी काळजी अवधूत घेतात. त्यानंतर सुरू होते त्यांच्या मुलांचे काम. एकत्र आलेल्या गार्इंमध्ये झुंजी लागतात. त्यामुळे लगेचच मुलगा विपुल आणि मुलगी विनिता या गोतावळ्याला हुसकावून लावतात.त्याही जणू नियमाचे पालन केल्यासारख्या तेथून निघून जातात. एवढ्यावरच हे काम थांबत नाही. दारात तसेच रस्त्यावर पडलेली शेण-घाण अवधूत यांच्या आई जमुना एका महिलेच्या मदतीने खराट्याने काढून टाकतात. एकही दिवस गार्इंना खाद्य चुकू नये म्हणून अवधूत सोळंकी कोल्हापूर सोडून कुठेही वस्तीला रहात नाहीत. निष्काम कर्मयोगाचं हे काम अगदी मनापासून आणि आनंदानं सुरू असतं, ते तिथला एकूणच सेवेचा उपक्रम पाहून नक्कीच अनुभवास येतं.रुग्णांना ‘गीता-माधुर्य’चे वाटपगो‘सेवे’च्या वृतामुळे अवधूत केवळ सायंकाळीच रुग्णांची तपासणी करतात. एखाद्या रुग्णाने स्वत: तणावग्रस्त असल्याचे सांगितले, तर त्याला ते ‘गीता-माधुर्य’ पुस्तक देऊन ते वाचण्यास सांगतात. ते वाचल्यानंतर रुग्णाकडूनच सकारात्मक फरक पडल्याचे ते सांगतात.अशीही काळजीएक दिवस या गोतावळ्यातील वासरू ढकलाढकलीत गटारीत पडून जखमी झाले. अशी घटना पुन्हा घडू नये म्हणून अवधूत यांनी स्वखर्चाने तेथील गटारीवर सिमेंटचे ब्लॉक बसविले. त्यामुळे गार्इंना तेथे थांबणे आणि फिरणेही सोयीस्कर झाले.वडील, आत्या सेवाभावीअवधूत यांचे वडील विजय सोळंकी डॉक्टर असल्यामुळे त्यांनी आपल्या वैद्यकीय सेवेत अनेक गरीब रुग्णांवर मोफत उपचार केले आहेत. त्यांच्या आत्यांनीही अनेक कुत्रे, मांजरांचा अगदी लहान मुलांसारखा सांभाळ केला आहे.बासरी, मृदंग, गिटारचा छंदअवधूत यांना बासरी, मृदंग आणि गिटार वाजविण्याचा छंद आहे. यातून वेळ काढून या वाद्यांचा ते मनमुराद आनंद लुटतात.