शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

कोल्हापूरचे अर्थचक्र सुरू, तीन महिन्यांनी रस्ते बहरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:28 IST

कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे जिल्हा प्रशासनाच्या निर्बंधाने ठप्प झालेले कोल्हापूर शहराचे अर्थचक्र सोमवारी तीन महिन्यांनंतर प्रथमच व्यापक ...

कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे जिल्हा प्रशासनाच्या निर्बंधाने ठप्प झालेले कोल्हापूर शहराचे अर्थचक्र सोमवारी तीन महिन्यांनंतर प्रथमच व्यापक स्वरूपात सुरू झाले. सर्व व्यवहार, व्यापार, बाजारपेठा पूर्ववत खुल्या झाल्या. प्रचंड आर्थिक संकटात असलेल्या व्यापारी वर्गाला त्यामुळे मोठा दिलासा मिळाला. शहरातील सर्वच व्यवहार नियमितपणे सुरू झाल्याने रस्त्यावर, बाजारपेठातून नागरिकांची तसेच वाहनांची मोठी गर्दी उसळली.

राज्य सरकारच्या सूचनेनुसार तब्बल तीन महिन्यांच्या कालखंडानंतर जिल्हा प्रशासनाने कोल्हापूर शहरातील कोरोनाबाबतचे निर्बंध शिथिल करून सरसकट सर्वच दुकाने, व्यवसाय, व्यापार सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंत सुरू करण्यास परवानगी दिली. त्यामुळे ‘पुनश्च हरिओम’ करण्यास आसुसलेल्या व्यापारी, व्यावसायिक, छोटे-मोठे दुकानदार, फेरीवाले यांनी आपापल्या व्यवसायाच्या ठिकाणी जाऊन बंद पडलेला व्यवसाय सुरू केला.

शहरातील अनेक दुकानदार सकाळी आठ वाजताच आपापल्या दुकानात पोहचले. तीन महिने बंद असल्यामुळे प्रथम त्यांनी दुकानांची झाडलोट सुरू केली. देव-देवतांच्या फोटोंची पूजा केली आणि बंद पडलेल्या आपल्या व्यवसायाची पुन्हा एकदा सुरवात केली. शहरात केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकाने कोरोनाच्या काळात सुरू होती. सोमवारपासून मात्र सर्वच दुकाने सुरू झाली. कापड, भांडी, ज्वेलरी, इमिटेशन्स, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल, लॉन्ड्री, स्टेशनरी, झेरॉक्स सेंटर, साड्या व ड्रेस मटेरियल, चपल, मोबाईल शॉपी, गॅसशेगडी, पानपट्टी, चहाच्या गाड्या अशा शेकडो प्रकारची दुकाने व व्यवसाय सोमवारी सुरू झाले. त्यामुळे ग्राहकांच्या गर्दीने ही दुकाने फुलून गेली. लहान-मोठे मॉल, शोरूमही सुरू झाले.

शहरातील मोठी हॉटेल, रेस्टॉरंट, परमिट रूम व बार मात्र सोमवारी सुरू झाले नाहीत. त्यांना पन्नास टक्के आसन क्षमता ठेऊन व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली जाईल, असे अपेक्षित होते. परंतु व्यावसायिकांच्या या अपेक्षेचा भंग झाला. त्यामुळे ती बंदच राहिली. पार्सल सेवा देण्यास मात्र त्यांना परवानगी दिली आहे. मद्याची दुकाने न उघडल्यामुळे सोमवारी सर्वच दुकानाबाहेर ग्राहकांच्या चकरा वाढल्या होत्या. बंद असलेल्या मद्याच्या दुकानातून पार्सल सेवा दिली जात होती.

-नवीन उत्साह, नवीन सुरुवात

गेल्या पंधरा महिन्यांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना संसर्गामुळे नागरिकांना एक प्रकारे नकारात्मक वातावणाने नैराश्य, कामात शिथिलता, आर्थिक टंचाई अशा विचित्र संकटाला सामोरे जावे लागले. सोमवारचा दिवस उत्सुकता आणि नवीन उत्साह घेऊन उजाडला. हा दिवस सर्वांमधील नकारात्मकता, नैराश्य दूर सारणारा ठरला. रविवारी दिवसभर व्यवसाय सुरू होण्यास परवानगी मिळणार की नाही, याचीच चिंता अनेकांना लागून होती; पण सोमवारी सर्वांनाच माहिती कळाल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसले.

-सर्वत्र गर्दीच गर्दी

खूप दिवसांनी शहरातील सर्वच व्यवहार पूर्ववत सुरू झाल्यामुळे व्यापाऱ्यांसह ग्राहक वर्गातही उत्साह दिसून आला. कपड्यांच्या, साड्यांच्या दुकानात ग्राहकांची गर्दी झालेली पहायला मिळाली. घडाळ्याची शोरूम, ज्वेलर्स दुकाने, सराफ बाजारातही ग्राहकांची गर्दी होती. सर्वच दुकानांबाहेर नागरिकांच्या रांगा लागलेल्या होत्या. थोड्या थोड्या नागरिकांना आत सोडले जात होते.

-खाऊगल्यासुद्धा बहरल्या

शहराच्या कानाकोपऱ्यात असलेल्या खाऊगल्ल्यातील खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर खवैय्यांची गर्दी झाली होती. गेल्या काही दिवसांपासून त्यांचे व्यवसाय सुरू असले तरी खवैय्यांनीच पाठ फिरविल्यामुळे खाऊगल्लीत वर्दळ कमी झाली होती. मात्र सोमवार त्याला अपवाद ठरला.

-वर्दळ वाढली, रस्ते फुल्ल

कोरोनाच्या भीतीमुळे शहरातील रस्त्यांवरील वर्दळ फारच कमी होती. दुपारी चार वाजल्यानंतर तर ही वर्दळ बंदच व्हायची. रस्ते ओस पडायचे. सगळीकडे शांतता निर्माण झालेली असायची; पण सोमवारी मात्र सर्वच रस्ते नागरिकांच्या गर्दीने फुलले. वाहनांच्या गर्दीने फुल्ल झाले. सर्वत्र एक प्रकारचे नवचैतन्य निर्माण झालेले पहायला मिळाले.

-बसस्थानके गजबजली

मध्यवर्ती बसस्थानकासह रंकाळवेश, संभजीनगर बसस्थानक तसेच केएमटीचे बस थांबे प्रवाशांच्या लगबगीने गजबजली. बाहेरगावाहून येणारे तसेच शहरातून बाहेर जाणाऱ्यांचीही संख्या काही कमी नव्हती. केएमटी बस गाड्या, ॲटोरिक्षा ही रस्त्यावर धावत होत्या.

कोट- १.

व्यवसाय सुरू झाले, त्यामुळे बाजारपेठेला झळाली आली. आता व्यापारी, दुकानदार यांनी कोरोना संसर्ग वाढणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे. आठ दिवसांसाठी ही परवानगी आहे. जर कोरोना रुग्णांची टक्केवारी वाढली तर निर्बंध पुन्हा लादले जाऊ शकतात, याची जाणीव दुकानदारांनी ठेवावी.

संजय शेटे, अध्यक्ष, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स