शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरचे अर्थचक्र सुरू, तीन महिन्यांनी रस्ते बहरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:28 IST

कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे जिल्हा प्रशासनाच्या निर्बंधाने ठप्प झालेले कोल्हापूर शहराचे अर्थचक्र सोमवारी तीन महिन्यांनंतर प्रथमच व्यापक ...

कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे जिल्हा प्रशासनाच्या निर्बंधाने ठप्प झालेले कोल्हापूर शहराचे अर्थचक्र सोमवारी तीन महिन्यांनंतर प्रथमच व्यापक स्वरूपात सुरू झाले. सर्व व्यवहार, व्यापार, बाजारपेठा पूर्ववत खुल्या झाल्या. प्रचंड आर्थिक संकटात असलेल्या व्यापारी वर्गाला त्यामुळे मोठा दिलासा मिळाला. शहरातील सर्वच व्यवहार नियमितपणे सुरू झाल्याने रस्त्यावर, बाजारपेठातून नागरिकांची तसेच वाहनांची मोठी गर्दी उसळली.

राज्य सरकारच्या सूचनेनुसार तब्बल तीन महिन्यांच्या कालखंडानंतर जिल्हा प्रशासनाने कोल्हापूर शहरातील कोरोनाबाबतचे निर्बंध शिथिल करून सरसकट सर्वच दुकाने, व्यवसाय, व्यापार सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंत सुरू करण्यास परवानगी दिली. त्यामुळे ‘पुनश्च हरिओम’ करण्यास आसुसलेल्या व्यापारी, व्यावसायिक, छोटे-मोठे दुकानदार, फेरीवाले यांनी आपापल्या व्यवसायाच्या ठिकाणी जाऊन बंद पडलेला व्यवसाय सुरू केला.

शहरातील अनेक दुकानदार सकाळी आठ वाजताच आपापल्या दुकानात पोहचले. तीन महिने बंद असल्यामुळे प्रथम त्यांनी दुकानांची झाडलोट सुरू केली. देव-देवतांच्या फोटोंची पूजा केली आणि बंद पडलेल्या आपल्या व्यवसायाची पुन्हा एकदा सुरवात केली. शहरात केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकाने कोरोनाच्या काळात सुरू होती. सोमवारपासून मात्र सर्वच दुकाने सुरू झाली. कापड, भांडी, ज्वेलरी, इमिटेशन्स, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल, लॉन्ड्री, स्टेशनरी, झेरॉक्स सेंटर, साड्या व ड्रेस मटेरियल, चपल, मोबाईल शॉपी, गॅसशेगडी, पानपट्टी, चहाच्या गाड्या अशा शेकडो प्रकारची दुकाने व व्यवसाय सोमवारी सुरू झाले. त्यामुळे ग्राहकांच्या गर्दीने ही दुकाने फुलून गेली. लहान-मोठे मॉल, शोरूमही सुरू झाले.

शहरातील मोठी हॉटेल, रेस्टॉरंट, परमिट रूम व बार मात्र सोमवारी सुरू झाले नाहीत. त्यांना पन्नास टक्के आसन क्षमता ठेऊन व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली जाईल, असे अपेक्षित होते. परंतु व्यावसायिकांच्या या अपेक्षेचा भंग झाला. त्यामुळे ती बंदच राहिली. पार्सल सेवा देण्यास मात्र त्यांना परवानगी दिली आहे. मद्याची दुकाने न उघडल्यामुळे सोमवारी सर्वच दुकानाबाहेर ग्राहकांच्या चकरा वाढल्या होत्या. बंद असलेल्या मद्याच्या दुकानातून पार्सल सेवा दिली जात होती.

-नवीन उत्साह, नवीन सुरुवात

गेल्या पंधरा महिन्यांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना संसर्गामुळे नागरिकांना एक प्रकारे नकारात्मक वातावणाने नैराश्य, कामात शिथिलता, आर्थिक टंचाई अशा विचित्र संकटाला सामोरे जावे लागले. सोमवारचा दिवस उत्सुकता आणि नवीन उत्साह घेऊन उजाडला. हा दिवस सर्वांमधील नकारात्मकता, नैराश्य दूर सारणारा ठरला. रविवारी दिवसभर व्यवसाय सुरू होण्यास परवानगी मिळणार की नाही, याचीच चिंता अनेकांना लागून होती; पण सोमवारी सर्वांनाच माहिती कळाल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसले.

-सर्वत्र गर्दीच गर्दी

खूप दिवसांनी शहरातील सर्वच व्यवहार पूर्ववत सुरू झाल्यामुळे व्यापाऱ्यांसह ग्राहक वर्गातही उत्साह दिसून आला. कपड्यांच्या, साड्यांच्या दुकानात ग्राहकांची गर्दी झालेली पहायला मिळाली. घडाळ्याची शोरूम, ज्वेलर्स दुकाने, सराफ बाजारातही ग्राहकांची गर्दी होती. सर्वच दुकानांबाहेर नागरिकांच्या रांगा लागलेल्या होत्या. थोड्या थोड्या नागरिकांना आत सोडले जात होते.

-खाऊगल्यासुद्धा बहरल्या

शहराच्या कानाकोपऱ्यात असलेल्या खाऊगल्ल्यातील खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर खवैय्यांची गर्दी झाली होती. गेल्या काही दिवसांपासून त्यांचे व्यवसाय सुरू असले तरी खवैय्यांनीच पाठ फिरविल्यामुळे खाऊगल्लीत वर्दळ कमी झाली होती. मात्र सोमवार त्याला अपवाद ठरला.

-वर्दळ वाढली, रस्ते फुल्ल

कोरोनाच्या भीतीमुळे शहरातील रस्त्यांवरील वर्दळ फारच कमी होती. दुपारी चार वाजल्यानंतर तर ही वर्दळ बंदच व्हायची. रस्ते ओस पडायचे. सगळीकडे शांतता निर्माण झालेली असायची; पण सोमवारी मात्र सर्वच रस्ते नागरिकांच्या गर्दीने फुलले. वाहनांच्या गर्दीने फुल्ल झाले. सर्वत्र एक प्रकारचे नवचैतन्य निर्माण झालेले पहायला मिळाले.

-बसस्थानके गजबजली

मध्यवर्ती बसस्थानकासह रंकाळवेश, संभजीनगर बसस्थानक तसेच केएमटीचे बस थांबे प्रवाशांच्या लगबगीने गजबजली. बाहेरगावाहून येणारे तसेच शहरातून बाहेर जाणाऱ्यांचीही संख्या काही कमी नव्हती. केएमटी बस गाड्या, ॲटोरिक्षा ही रस्त्यावर धावत होत्या.

कोट- १.

व्यवसाय सुरू झाले, त्यामुळे बाजारपेठेला झळाली आली. आता व्यापारी, दुकानदार यांनी कोरोना संसर्ग वाढणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे. आठ दिवसांसाठी ही परवानगी आहे. जर कोरोना रुग्णांची टक्केवारी वाढली तर निर्बंध पुन्हा लादले जाऊ शकतात, याची जाणीव दुकानदारांनी ठेवावी.

संजय शेटे, अध्यक्ष, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स