शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊन संपण्याआधीच कोल्हापूरकर मनाने अनलॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:22 IST

कोल्हापूर : निकालाची तारीख जवळ येईल तशी हुरहुर आणि उत्सुकता मनात दाटते अगदी तशीच हुरहुर कोल्हापूरकरांना लागून राहिली आहे. ...

कोल्हापूर : निकालाची तारीख जवळ येईल तशी हुरहुर आणि उत्सुकता मनात दाटते अगदी तशीच हुरहुर कोल्हापूरकरांना लागून राहिली आहे. कोरोनाचे आकडे कितीही भयावह वाटत असले तरी कधी एकदा बाहेर पडू आणि लागेल ते खरेदी करू अशीच भावना प्रत्येकाच्या मनात आहे. त्यामुळे आज लाॅकडाऊनबाबत प्रशासन काय निर्णय घेईल तो घेईल, लोक मनातून आधीच अनलॉक झाले आहेत.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात १५ मेच्या मध्यरात्रीपासून शंभर टक्के कडक लॉकडाऊन पाळण्यात आला आहे. प्रशासनाने जाहीर केलेल्या मुदतीनुसार तो आज रविवारी रात्री १२ वाजता संपणार आहे. तत्पूर्वी लॉकडाऊन वाढणार की संपणार यावरून शनिवारी दिवसभर तर्क-वितर्कांना उधाण आले होते. जिल्ह्याचा लॉकडाऊन संपला तरी राज्याचा लॉकडाऊन ३१ मेपर्यंत सुरूच राहणार आहे. त्यामुळे प्रशासनाने शंभर टक्के लॉकडाऊन मागे घेतले तरी संचारबंदी कायम राहणार आहे. सकाळी ७ ते ११ याच वेळेतच व्यवहाराची मुभा राहणार आहे. असे असले तरी थोडे निर्बंध असू देत; पण आता कडक लॉकडाऊन नको असाच कोल्हापूरकरांचा कल आहे.

कडक लॉकडाऊन सुरू झाल्यापासून रुग्ण वाढीच्या वेगावर मर्यादा आल्या आहेत. मागील सात दिवसांत रुग्णसंख्येचा वेग लॉकडाऊन जाहीर झाल्याच्या पहिल्या दोन दिवसांचा अपवाद वगळता स्थिर राहिला आहे. मृत्यूतही चढउतार दिसत आहे. आजची परिस्थिती पाहिली तर आणखी थोडे दिवस निर्बंध पाळले तर दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी करता येऊ शकते; पण एकूणच कोल्हापूरकरांची विशेषत: व्यापारी, उद्योजकांची मानसिकता पाहिली तर लॉकडाऊन नको अशीच आहे.

घराघरातील बाजार संपला

लॉकडाऊनच्या भीतीने आठ दिवसांची बेगमी करण्यात आली होती, ती आता बऱ्यापैकी संपली आहे. त्यामुळे कधी एकदा दुकाने उघडतात आणि बाजार भरतोय अशी परिस्थिती घराघरात दिसत आहे. भाजीमंडई बंद असल्याने सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेत भाजी विक्रेते दारोदार फिरून भाजीपाला विक्री करत आहेत; पण दरात प्रचंड वाढ केल्याने सर्वसामान्य ग्राहक घायकुतीला आला आहे. कोणतीही भाजी ७० ते ८० रुपये किलोच्या खाली नाही. पालेभाज्या व कोंथिबिरीची जुडी देखील २० ते ३० रुपयांना एक, अशी विकली जात आहे. कांदा, बटाटेदेखील ५० रुपये किलोने विकले जात आहेत.

शहर अजूनही चिडिचूपच

लॉकडाऊनची शासकीय मुदत संपण्याच्या आदल्या दिवशी दुपारी शहरात फेरफटका मारला तर अजूनही सामसूम दिसत आहे. मुख्य रस्त्यांवर अत्यावश्यक सेवेतील वाहने, पोलीस, ॲम्ब्युलन्स वगळता कोणीही दिसत नाही. शहर अजूनही चिडिचूपच आहे, गल्लीतील क्रिकेट हाच काय तो रस्त्यांवरचा आनंदाचा क्षण ठरत आहे.

मागच्या दाराने विक्री

कोल्हापूरकर आणि मांसाहार याचे अतूट नाते आहे. आठ दिवस दुकाने बंद असल्याने कडधान्यावर वेळ मारून न्यावी लागल्याने वैतागलेल्या नागरिकांनी यातूनही पळवाट काढली आहे. शटर बंद करून दुकानदारही हळूच माल आणून देत आहेत. शहरात जागोजागी असे चित्र शनिवारी दृष्टीस पडले.