शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

कोल्हापूरात एस. टी. वर्कशॉपला ठोकले टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 18:28 IST

कोल्हापूर : ताराबाई पार्क येथील एस. टी. वर्र्कशॉपमधील गेल्या अनेक वर्षांपासून जमा झालेले भंगार आणि कचºयाचा उठाव न झाल्याने दुर्गंधी, डास आणि कचºयाचे साम्राज्य निर्माण झाले. याबाबत वारंवार तक्रार करूनही येथील अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याने संतप्त शिवसैनिकांनी मंगळवारी वर्कशॉपला ‘टाळे ठोक’ आंदोलन केले. प्रशासनाच्यावतीने पंधरा दिवसांत साहित्य हलविण्याची लेखी हमी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. 

ठळक मुद्देशिवसैनिकांचे आंदोलन; भंगार उचलण्याची मागणी

कोल्हापूर : ताराबाई पार्क येथील एस. टी. वर्र्कशॉपमधील गेल्या अनेक वर्षांपासून जमा झालेले भंगार आणि कचºयाचा उठाव न झाल्याने दुर्गंधी, डास आणि कचºयाचे साम्राज्य निर्माण झाले. याबाबत वारंवार तक्रार करूनही येथील अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याने संतप्त शिवसैनिकांनी मंगळवारी वर्कशॉपला ‘टाळे ठोक’ आंदोलन केले. प्रशासनाच्यावतीने पंधरा दिवसांत साहित्य हलविण्याची लेखी हमी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. 

एस. टी. महामंडळाच्या ताराबाई पार्क येथील वर्कशॉपमध्ये जिल्ह्यात बारा आगारांमधील जुन्या एस. टी., बस टायर, लोखंडी साहित्य, जळक्या आॅईलची बॅरेल असे साहित्य या ठिकाणी ठेवले जाते. दरवर्षी त्याचा लिलाव करून साहित्य भंगारात काढले जाते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून साठलेल्या साहित्याचा लिलाव करण्यात आलेला नाही. त्यामुळे वर्कशॉपमध्ये ठिकठिकाणी भंगाराचा ढीग पडला आहे. जुन्या टायरमध्ये पाणी साचून राहिल्याने या परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे येथील परिसरातील नागरिक व कर्मचाºयांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे तसेच येथील साहित्य गोकुळ शिरगांवमधील एस. टी. महामंडळाच्या जागेत हलवावे, अशी मागणी यावेळी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली.

   संतप्त शिवसैनिकांनी जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली ठिकाणी आंदोलन करत वर्कशॉपच्या गेटला टाळे ठोकले. त्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला होता. शिवसैनिकांनी वर्कशॉपमध्ये फिरून पाहणीसुद्धा यावेळी केली. आंदोलनात शशिकांत बिडकर, रवी चौगुले, राजू यादव, राजेंद्र जाधव, संदीप कारंडे, विनोद खोत, राजेंद्र पाटील, रणजित आयरेकर, सुनील पोवार, शुभांगी पोवार, दीपाली शिंदे, कोमल पाटील, जयश्री खोत आदी उपस्थित होते.