शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
4
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
5
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
6
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
7
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
8
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
9
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
10
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
11
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
12
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
13
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
14
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
15
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
16
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
17
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
18
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
19
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले

पुरस्कारात कोल्हापूर जिल्हा परिषदेने मारली ‘हॅट्ट्रिक’

By admin | Updated: April 29, 2015 01:03 IST

‘ग्रामविकास’तर्फे पुरस्कार जाहीर : ई-पंचायतमध्येही राज्यात ‘लय भारी’; पालकमंत्र्यांच्या हस्ते १ मे रोजी वितरण, सातारा, रत्नागिरी, हिंगोली जि. प.ही उत्कृष्ट

भीमगोंडा देसाई- कोल्हापूर --ग्रामपंचायतीचे कामकाज आॅनलाईन व पारदर्शी करण्यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेल्या ई-पंचायतमध्येही (संग्राम) कोल्हापूर जिल्हा परिषद राज्यात ‘लय भारी’ ठरल्याचे ग्रामविकास विभागाचे उपसचिव वैभव राजेघाटगे यांनी २४ एप्रिल रोजी जाहीर केले आहे. राज्य आणि केंद्र पातळीवरील पुरस्कारानंतर ई-पंचायतमध्येही उत्कृष्ट ठरत पुरस्कारात जिल्हा परिषदेने हॅट्ट्रिक मारली आहे. एका वर्षात सलग तीन पुरस्कार मिळविण्याची दुर्मीळ संधी या जिल्हा परिषदेला मिळाली आहे. उल्लेखनीय कामगिरीबद्दल यशवंत पंचायत राज अभियान तथा पंचायत सबलीकरण व उत्तरदायित्व प्रोत्साहन योजनेंतर्गत ‘अत्युत्कृष्ट’ म्हणून कोल्हापूर जिल्हा परिषदेने राज्यात प्रथम क्रमाकांचे २५ लाखांचे बक्षीस मिळविले. त्यानंतर केंद्र सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाच्या राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण योजनेंतर्गत उत्कृष्ट ठरल्यामुळे ३० लाखांचे बक्षीस मिळविले. ई-पंचायतमध्येही राज्यात उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे १ मे रोजी पालकमंत्र्यांच्या हस्ते एक लाखाचे बक्षीस मिळणार आहे. सन २०११ पासून संग्राम (संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र)अंतर्गत ई-पंचायत प्रियासॉफ्ट संगणक प्रणालीतून कार्यान्वित केली. त्याअंतर्गत सर्व ग्रामपंचायतींमध्ये ‘संग्राम कक्ष’ स्थापन केले आहेत. या कक्षांतून ग्रामस्तरावरील दैनंदिन खर्च, ग्रामपंचायतीच्या मालकीची मालमत्तेची माहिती अद्ययावत करणे, विविध आॅनलाईन दाखले देश-विदेश किंवा कोठूनही कधीही मिळण्याची व्यवस्था केली आहे. या प्रणालीमुळे ग्रामपंचायतीच्या पातळीवर पारदर्शकता येण्यात मदत झाली आहे. सर्व माहिती संगणकचालकांकडून भरून ग्रामसेवकाकडून प्रमाणित केली जात आहे.ई-पंचायत प्रणालीमुळे ग्रामपंचायत स्तरावर चालणारे सर्व कामकाज आॅनलाईन पाहता येते. वेगवेगळ्या योजनांवर केलेला खर्च, गावात मिळणाऱ्या सुविधा, गावातील करमागणीची बिलेही ‘संग्राम.महाआॅनलाईन.गो.इन’ या वेबसाईटवर एका क्लिकवर समजू शकते. टप्प्याटप्प्याने कक्षात ग्रामस्थांची बँक खाती उघडणे, पैसे भरणे, पैसे काढणे, कर्जे व इतर सुविधा दिल्या जात आहेत.या प्रणालीत पहिल्यापासून कोल्हापूर जिल्हा परिषद आघाडीवर राहिले आहे. कोल्हापूरसह चंद्रपूर, सातारा, रत्नागिरी, हिंगोली जिल्हा परिषदांनी उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे सन २०११ मध्ये देशात ई-पंचायतमध्ये महाराष्ट्राने प्रथम क्रमांक मिळविला. यामुळे कोल्हापूरसह या चार जिल्हा परिषदांनाही उत्कृष्ट म्हणून एक लाखाचे बक्षीस मिळणार आहे. प्रियासॉफ्ट संगणक प्रणालीतून राज्यात ई-पंचायतीअंतर्गत (संग्राम कक्ष) उत्कृष्ट कामगिरीमुळे एक लाखाचे बक्षीस जाहीर झाले आहे. केंद्र आणि राज्य पातळ्यांवरचे तीन पुरस्कार एका वर्षात मिळविण्याचा दुर्मीळ मान कोल्हापूर जिल्हा परिषदेला मिळाला आहे. यामध्ये पदाधिकारी, कर्मचारी यांचे योगदान आहे. - अविनाश सुभेदार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जाहीर करण्यास विलंबई-प्रणालीत सन २०११-१२ मध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्यांचा पुरस्कार तब्बल वर्षभरानंतर जाहीर करण्याचा मुहूर्त ग्रामविकास विभागाने साधला आहे. इतक्या विलंबाने पुरस्कार जाहीर करण्यामागचे नेमके कारण स्थानिक पातळीवरील प्रशासकीय यंत्रणेलाही कळलेले नाही.