शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

ऊस उत्पादनात ‘कोल्हापूर’ राहणार राज्यात भारी

By admin | Updated: January 22, 2017 23:59 IST

१ कोटी १७ लाख टन गाळप : पुणे विभाग मागे पडणार

कोल्हापूर : राज्यात यंदा उसाची टंचाई असल्याने बहुतांश कारखान्यांना आपले गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करता येणार नाही. आतापर्यंत झालेल्या गाळपात कोल्हापूर विभाग आघाडीवर राहिला आहे. दरवर्षी पुणे विभाग पुढे असायचा; पण सोलापूर जिल्ह्यातील कारखाने उसाअभावी बंद राहिल्याने त्याचा फटका या विभागास बसला आहे. कोल्हापूर विभागाचे आतापर्यंत १ कोटी १७ लाख टन गाळप झाले असून, गाळपाबरोबर उताऱ्यातही विभाग राज्यात भारी ठरणार आहे. गतवर्षी राज्यात पडलेल्या दुष्काळाचा फटका यंदाच्या उसाच्या हंगामावर दिसत आहे. दुष्काळ व त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे उसाच्या उत्पादनात घट झाली आहे. अडीच महिने पूर्ण होण्याअगोदरच निम्म्याहून अधिक कारखाने बंद झाले आहेत. पुणे विभागात पुण्यासह सातारा व सोलापूर जिल्ह्यांचा समावेश आहे. या तिन्ही जिल्ह्यांत उसाचे उत्पादन व कारखान्यांची संख्या अधिक असल्याने पुणे विभाग राज्यात गाळपात आघाडीवर असतो; पण यंदा सोलापूर जिल्ह्याला दुष्काळाचा मोठा फटका बसल्याने सुरुवातीपासूनच विभागातील कारखाने अडखळत सुरू झाले. गेल्या हंगामात सुमारे २ कोटी ३१ लाख टनांचे गाळप झाले होेते. यंदा आतापर्यंत १ कोटी १६ लाखांचे गाळप झाले आणि ५२ पैकी तब्बल २७ कारखाने बंद झाले आहेत. कोल्हापूर विभागात ४० कारखाने आहेत. त्यांतील चार कारखाने बंद झाले असून आतापर्यंत १ कोटी १७ लाख टनांचे गाळप झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ‘जवाहर’, व ‘दत्त-शिरोळ’ कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात अजून ऊस आहे. त्यामुळे हे कारखाने मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत चालणार आहेत. उर्वरित कारखाने आणखी महिनाभर म्हणजेच फेबु्रवारीअखेर चालतील, असा साखर विभागाचा अंदाज आहे. गतवर्षी कोल्हापूर विभागात २ कोटी २७ लाख टन उसाचे गाळप झाले होते. यंदा तेवढे होणार नसले तरी किमान ते १ कोटी ६० लाखांपर्यंत जाईल, असा अंदाज आहे. त्यामुळे यंदा राज्यात ऊस गाळपात कोल्हापूर विभाग आघाडीवर राहणार, हे निश्चित आहे. गेल्या हंगामात राज्यात ४ कोटी ३९ लाख टनांचे गाळप झाले होते. यंदा आतापर्यंत ३ कोटी ७ लाखांपर्यंतच हंगाम आहे. त्यामुळे गतवर्षीपेक्षा किमान ८० लाख टनांनी गाळप कमी होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. (प्रतिनिधी)विभागनिहाय झालेले गाळप विभागकारखानेगाळपसाखर उत्पादनउताराहंगाम बंद संख्याटनांतक्विंटलटक्के कारखान्यांची संख्याकोल्हापूर४०१ कोटी १७ लाख१ कोटी ३९ लाख११.८८४पुणे५२१ कोटी १६ लाख१ कोटी २५ लाख१०.७३२७अहमदनगर२३३७ लाख ३ हजार३५ लाख ६५ हजार९.६३१४औरंगाबाद १७१८ लाख २८ हजार८ लाख ८७ हजार८.८७१३नांदेड१११० लाख २५ हजार९ लाख ८२ हजार९.८२८अमरावती३२ लाख ४३ हजार२ लाख ३७ हजार९.७२३नागपूर४३ लाख १३ हजार३ लाख ६ हजार९.७९-एकूण१७५३ कोटी ७ लाख ३ कोटी ३४ लाख १०.८६ ६९८८ हजार४३ हजार