शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

ऊस उत्पादनात ‘कोल्हापूर’ राहणार राज्यात भारी

By admin | Updated: January 22, 2017 23:59 IST

१ कोटी १७ लाख टन गाळप : पुणे विभाग मागे पडणार

कोल्हापूर : राज्यात यंदा उसाची टंचाई असल्याने बहुतांश कारखान्यांना आपले गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करता येणार नाही. आतापर्यंत झालेल्या गाळपात कोल्हापूर विभाग आघाडीवर राहिला आहे. दरवर्षी पुणे विभाग पुढे असायचा; पण सोलापूर जिल्ह्यातील कारखाने उसाअभावी बंद राहिल्याने त्याचा फटका या विभागास बसला आहे. कोल्हापूर विभागाचे आतापर्यंत १ कोटी १७ लाख टन गाळप झाले असून, गाळपाबरोबर उताऱ्यातही विभाग राज्यात भारी ठरणार आहे. गतवर्षी राज्यात पडलेल्या दुष्काळाचा फटका यंदाच्या उसाच्या हंगामावर दिसत आहे. दुष्काळ व त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे उसाच्या उत्पादनात घट झाली आहे. अडीच महिने पूर्ण होण्याअगोदरच निम्म्याहून अधिक कारखाने बंद झाले आहेत. पुणे विभागात पुण्यासह सातारा व सोलापूर जिल्ह्यांचा समावेश आहे. या तिन्ही जिल्ह्यांत उसाचे उत्पादन व कारखान्यांची संख्या अधिक असल्याने पुणे विभाग राज्यात गाळपात आघाडीवर असतो; पण यंदा सोलापूर जिल्ह्याला दुष्काळाचा मोठा फटका बसल्याने सुरुवातीपासूनच विभागातील कारखाने अडखळत सुरू झाले. गेल्या हंगामात सुमारे २ कोटी ३१ लाख टनांचे गाळप झाले होेते. यंदा आतापर्यंत १ कोटी १६ लाखांचे गाळप झाले आणि ५२ पैकी तब्बल २७ कारखाने बंद झाले आहेत. कोल्हापूर विभागात ४० कारखाने आहेत. त्यांतील चार कारखाने बंद झाले असून आतापर्यंत १ कोटी १७ लाख टनांचे गाळप झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ‘जवाहर’, व ‘दत्त-शिरोळ’ कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात अजून ऊस आहे. त्यामुळे हे कारखाने मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत चालणार आहेत. उर्वरित कारखाने आणखी महिनाभर म्हणजेच फेबु्रवारीअखेर चालतील, असा साखर विभागाचा अंदाज आहे. गतवर्षी कोल्हापूर विभागात २ कोटी २७ लाख टन उसाचे गाळप झाले होते. यंदा तेवढे होणार नसले तरी किमान ते १ कोटी ६० लाखांपर्यंत जाईल, असा अंदाज आहे. त्यामुळे यंदा राज्यात ऊस गाळपात कोल्हापूर विभाग आघाडीवर राहणार, हे निश्चित आहे. गेल्या हंगामात राज्यात ४ कोटी ३९ लाख टनांचे गाळप झाले होते. यंदा आतापर्यंत ३ कोटी ७ लाखांपर्यंतच हंगाम आहे. त्यामुळे गतवर्षीपेक्षा किमान ८० लाख टनांनी गाळप कमी होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. (प्रतिनिधी)विभागनिहाय झालेले गाळप विभागकारखानेगाळपसाखर उत्पादनउताराहंगाम बंद संख्याटनांतक्विंटलटक्के कारखान्यांची संख्याकोल्हापूर४०१ कोटी १७ लाख१ कोटी ३९ लाख११.८८४पुणे५२१ कोटी १६ लाख१ कोटी २५ लाख१०.७३२७अहमदनगर२३३७ लाख ३ हजार३५ लाख ६५ हजार९.६३१४औरंगाबाद १७१८ लाख २८ हजार८ लाख ८७ हजार८.८७१३नांदेड१११० लाख २५ हजार९ लाख ८२ हजार९.८२८अमरावती३२ लाख ४३ हजार२ लाख ३७ हजार९.७२३नागपूर४३ लाख १३ हजार३ लाख ६ हजार९.७९-एकूण१७५३ कोटी ७ लाख ३ कोटी ३४ लाख १०.८६ ६९८८ हजार४३ हजार