शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

कोल्हापूरच्या पर्यटनवृद्धीसाठी विविध योजना राबविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2017 18:43 IST

‘केएसबीपी’चे सुजय पित्रे यांची माहिती

आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. 0७ : कोल्हापूरच्या पर्यटनवृद्धीसाठी येत्या काही वर्षांत विविध योजना आणि उपक्रम राबविणार असल्याची माहिती कोल्हापूर रस्ते सौंदर्यीकरण प्रकल्पाचे (केएसबीपी) प्रमुख सुजय पित्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पित्रे म्हणाले, १६ जून २०१६ रोजी ‘केएसबी’ची स्थापना झाली. त्याआधी आम्ही आयआरबीने कंत्राट सोडल्यानंतर शहरातील दुभाजक आणि आयलंडची काय अवस्था झाली याचे सर्वेक्षण केले होते म्हणूनच पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिनाचे औचित्य साधून आम्ही दुभाजक आयलंड सुधारण्याची मोहीम हाती घेतली. त्यानुसार ११ चौक आणि २ मोठी उद्याने आम्ही विकसित केली.

महाराष्ट्र शासनाचे पर्यटन धोरण जाहीर झाले असून २०२५ साली त्यासाठी ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. पर्यटनासाठी आवश्यक असणारा समुद्रकिनारा सोडून सर्व काही एका कोल्हापूर जिल्ह्यात आहे म्हणूनचा पर्यटनासाठी पूरक वातावरण आणि मूलभूत आवश्यक बाबी कोल्हापुरात उभारल्या जाव्यात यासाठी आम्ही पुढाकार घेतला आहे. आमच्या अनेक प्रकल्पांपैकी ‘केएसबीपी’ हा एक प्रकल्प आहे.

आता कोल्हापूर पर्यटन विकास केंद्राच्या माध्यमातून पर्यटनविषयक वाढीसाठीचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील कुणीही तज्ज्ञ, नागरिक सहभागी होऊन आपली मांडणी करतील. त्यांना सहकार्य केंद्राच्यावतीने केले जाईल. कचरा निर्मूलन आणि त्यावरील प्रक्रिया याबाबतीतही काम केले जाणार आहे. कोणत्याही व्यक्ती अथवा पक्षासाठी हे काम सुरू नसून कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी हे प्रकल्प सुरू आहेत.

कोल्हापूरचा तिरंगा नेहमी फडकत राहील

काही दिवसांपूर्वी मोठ्या वादळामुळे ३०३ फूट उंचीचा ध्वज काही वेळासाठी आम्हाला उतरावा लागला. देशातील सर्वांत उंच असलेला वाघा सीमेवरील तिरंगा प्रचंड वाऱ्यामुळे नेहमी उतरून ठेवला जातो. रांची येथील ध्वजही उतरलेला आहे. पुण्यातील ध्वजही गेले चार दिवस उतरलेला आहे. मात्र, आम्ही वाऱ्याच्या वेगाचा अभ्यास करून कोल्हापूरचा झेंडा नेहमी फडकत राहील याची दक्षता घेतली आहे तसेच १०० फुटांपेक्षा उंच असणाऱ्या ध्वजाला खाली गेले किंवा पुन्हा फडकवणे यासाठी आचारसंहिता नसल्याचे यावेळी सांगण्यात आले.

उद्यानात शाहू महाराज, महाराणी ताराराणींची प्रतिमा

पोलिस उद्यानामध्ये छत्रपती शाहू महाराज, महाराणी ताराराणी आणि आद्य क्रांतिकारक चिमाजी अप्पा यांच्या प्रतिमा लावण्यात आल्या आहेत. छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतिदिनी या प्रतिमा लावून अभिवादन करण्यात आल्याचे पित्रे यांनी सांगितले.