शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

कोल्हापूर :‘कोरी पाटी’मधून उलगडणार विद्यापीठ हायस्कूलचे विश्र्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 12:09 IST

राजर्षी शाहू महाराजांच्या प्रेरणेने साकारलेल्या भक्तिसेवा विद्यापीठ शाळेचा शंभर वर्षांचा उज्ज्वल इतिहास ‘कोरी पाटी’ या माहितीपटातून उलगडणार आहे.

ठळक मुद्दे‘कोरी पाटी’मधून उलगडणार विद्यापीठ हायस्कूलचे विश्र्वसागर तळाशीकर यांची माहिती : सोमवारी माहितीपटाचे प्रदर्शन

कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांच्या प्रेरणेने साकारलेल्या भक्तिसेवा विद्यापीठ शाळेचा शंभर वर्षांचा उज्ज्वल इतिहास ‘कोरी पाटी’ या माहितीपटातून उलगडणार आहे.

शताब्दी वर्षानिमित्ताने शाळेच्या १९८२-८३ बॅचच्या विद्यार्थ्यांनी या माहिती पटाची निर्मिती केली असून त्याचे प्रदर्शन सोमवारी (दि. ३) होणार आहे, अशी माहिती लेखक, दिग्दर्शक, अभिनेते व माजी विद्यार्थी सागर तळाशीकर व ‘आसमा’चे अध्यक्ष संजय रणदिवे,यांनी दिली.

केशवराव भोसले नाट्यगृहात दुपारी चार वाजता शाहू छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी शाळेच्या माजी वयोवृद्ध शिक्षकांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.तळाशीकर म्हणाले,‘ राजर्षी शाहू महाराजांनी तोफखाने गुरुजी आणि दीक्षित गुरुजी यांच्याकडे शाळेची जबाबदारी सोपविली होती. शिक्षणासोबत अनौपचारिक गोष्टींमधून जगणं शिकविण्याची शिक्षणपद्धती ही विद्यापीठ हायस्कूलची ओळख आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळात या शाळेच्या चौकात स्वातंत्र्यसंग्रामाची भाषणे घुमली आहेत. कस्तुरबा गांधींनी येथे १९२५ साली महिलांची सभा घेऊन मुलांना शाळेत पाठविण्याबाबत जागृती केली. मुलांसोबत मुलींना पोहण्याचे प्रशिक्षण देणे, महात्मा गांधीजींच्या हस्ते चरखा आश्रम, मुलांना औद्योगिक प्रशिक्षण, सहशिक्षण, बालविवाह रोखण्यासाठी मुलांना २१ वर्षापर्यंत ब्रह्मचर्याची शपथ देणे, स्वातंत्र्यसंग्रामातील लढवय्यांसोबत विद्यार्थ्यांना संवाद साधता यावा यासाठी तपोवनच्या माळावर कार्यक्रम घेणे, पर्यावरणाचे महत्त्व जाणून प्रत्येकाने एक रोप लावण्याचा नियम अशा अनेक क्रांतिकारी व पुरोगामी विचारांची बीजे येथे रोवली गेली.

साथीच्या रोगात शाहू महाराजांनी पुरविलेली औषधे गावागावांत पोहोचविण्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांनी सारा जिल्हा पिंजून काढला होता. विद्यापीठ हायस्कूलचा हा इतिहास नव्या पिढीपुढे यावा यासाठी १९८२-८३ च्या बॅचमधील कलासक्त विद्यार्थ्यांनी एकत्र येत माहितीपट बनवण्याची संकल्पना मांडली. त्यावर गेल्या दोन वर्षांपासून काम सुरू होते.

या माहितीपटासाठी जुने दस्तऐवज, फोटो संकलित करून त्यातून संहिता लिहिण्यात आली. तसेच शाळेतील जुने शिक्षक, पदाधिकारी यांच्याशी संवाद साधण्यात आला. जवळपास ४७ तासांच्या चित्रीकरणातून ७५ मिनिटांचा हा माहितीपट बनला आहे.

यासाठी संशोधन, लेखन, दिग्दर्शन यांची जबाबदारी सागर तळाशीकर यांनी पेलली आहे; तर माजी विद्यार्थी हरीश कुलकर्णी यांनी कॅमेरा; शेखर गुरव यांनी संकलन, ऐश्वर्य मालगावे यांनी संगीत, गायत्री पंडितराव यांनी संगीत संयोजन, सचिन जगताप यांनी बासरीवादन, केदार गुळवणी यांनी व्हायोलिनवादन, देवी लव्हेकर यांनी गायन; तर आदिती कुलकर्णी यांनी चित्ररेखाटन ही जबाबदारी पार पाडली आहे.