शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

निधी खर्च करण्यात ‘कोल्हापूर राज्यात पहिले’

By admin | Updated: August 27, 2016 00:48 IST

शासनाच्या कल्याणकारी योजना तळागाळांपर्यंत पोहोचविण्यासाठी पुढाकार घ्यावा,

कोल्हापूर : जिल्हा नियोजन समितीला प्राप्त झालेल्या निधीपैकी जुलैअखेर २९.७४ टक्के इतका निधी खर्च करून ‘कोल्हापूर जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांका’वर आला आहे. कार्यान्वयीन यंत्रणांनी निधी खर्च करण्यासाठी आवश्यक मान्यता मिळण्यासाठी व्यक्तिश: पाठपुरावा करावा तसेच लोकप्रतिनिधींही शासनाच्या कल्याणकारी योजना तळागाळांपर्यंत पोहोचविण्यासाठी पुढाकार घ्यावा, त्यासाठी त्यांचे स्वत:चे केडर असावे, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी येथे केले.जिल्हा नियोजन समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महाराणी ताराबाई सभागृहात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विमल पाटील, आमदार सर्वश्री चंद्रदीप नरके, सुरेश हाळवणकर, सतेज पाटील, सुजित मिणचेकर, संध्यादेवी कुपेकर, उल्हास पाटील, प्रकाश आबिटकर, सत्यजित पाटील-सरूडकर यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, आदी उपस्थित होते.बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री पाटील म्हणाले, जिल्हा वार्षिक योजना २०१६-१७साठी सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना आणि ‘ओटीएसपी’च्या ३२९ कोटी ११ लाख रुपयांच्या आराखड्यामध्ये सर्वसाधारण योजनेसाठी २२६ कोटी ५० लाख, अनुसूचित जाती उपाययोजनेसाठी १०० कोटी ८१ लाख आणि ‘ओटीएसपी’साठी १ कोटी ८० लाखांचा अर्थसंकल्पीय निधी आहे. त्यामध्ये शासनाकडून सर्वसाधारण योजनेसाठी २२६ कोटी ५० लाख रुपये, विशेष घटक योजनेमध्ये २५ कोटी २७ लाख ९४ हजार, ‘ओटीएसपी’अंतर्गत १ कोटी ४५ लाख ६८ हजारांचा निधी प्राप्त झाला आहे. जिल्ह्यात जुलैअखेर सर्वसाधारण योजनेमध्ये ६७ कोटी ३४ लाख व विशेष घटक योजनेत १८ कोटी ७८ लाख रुपये खर्च झाला आहे. अर्थसंकल्पीय निधीच्या खर्चाची टक्केवारी अनुक्रमे २९.७४ आणि १८.६३ टक्के आहे. बीडीएसनुसार जिल्हा सर्वसाधारण योजनेमध्ये २९.७४., विशेष घटक योजनेत १८.६३ टक्के, तर ओटीएसपी योजनेत ३.३२ टक्के खर्च करून कोल्हापूर जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आला आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी कार्यान्वयीन यंत्रणांनी निधी खर्च करण्यासाठी सूक्ष्म नियोजन केले आहे. निधी खर्च करण्यासाठी मार्च महिन्याची वाट न पाहता सुरुवातीपासूनच त्याचे नियोजन करावे व निधी खर्च करावा, असे निर्देश दिले होते. त्यानुसार सर्व यंत्रणांनी खर्चाचे नियोजन केले आहे.जनतेला विश्वासात घेऊन शिवार अभियान राबवायावर्र्षी जलयुक्त शिवार अभियान जिल्ह्यात २० गावांमध्ये हाती घेण्यात आली. याशिवाय ज्या गावांत हे अभियान राबविण्याची आवश्यकता आणि लोकांची इच्छा आहे, तेथे मागणीनुसार सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री पाटील यांनी दिली. त्यासाठी विविध कंपन्यांची मदत घेतली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. महाअवयवदान अभियानात सहभागी व्हा डोळे, त्वचा, यकृत, हृदय, मूत्रपिंड, प्लिहा यांसारख्या अवयवांची निसर्गाने आपल्याला अमूल्य भेट दिली आहे. आपल्या मृत्यूनंतर हे अवयव इतर रुग्णांना जीवदान देऊ शकतात. यासाठी राज्य शासनानेही ३० आॅगस्ट व १ सप्टेंबर या दिवशी महाअवयवदान अभियान राबविण्याचे ठरविले आहे. त्यामध्ये जनतेने मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री पाटील यांनी केले आहे. समर्पित निधी अन्य कामांवर खर्च होणारकृषी, आयटीआय, जिल्हा ग्रंथालय, कौशल्य विकास, सीपीआर आणि प्री- आयएएस ट्रेनिंग सेंटर, आदींनी त्यांच्याकडील निधी विविध कारणांनी समर्पित केल्याने सुमारे ५ कोटी ८१ लाख रुपयांचे पुनर्नियोजन करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. तर ८३ कोटी ५८ लाख ९० हजार रुपयांच्या निधीची विविध विकासकामांसाठी जादा मागणी प्राप्त झाल्याचे बैठकीत सांगण्यात आले.