शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
2
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
3
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
4
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
5
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
6
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
7
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
8
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
9
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
10
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
11
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
12
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
13
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
14
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
15
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
16
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
17
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
18
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
19
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
20
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक

कोल्हापूर सलाईनवर!

By admin | Updated: June 2, 2016 01:36 IST

कुंभी, तुळशीचा दिलासा : काळम्मावाडी, राधानगरीतून पुरवठा बंद

कोल्हापूर : ‘आधीच कमी त्यात पुन्हा उशीर’अशी गत झालेल्या पावसाने आता मात्र कोल्हापूरकरांच्या तोंडचे पाणी पळविले आहे. जिल्ह्यातील काळम्मावाडी आणि राधानगरी या महत्वाच्या धरणातील पाणी साठी अगदी कमी झाल्यामुळे लोकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करुन देताना जलसंपदा विभागाला चांगलीच कसरत करावी लागत आहे. गेल्या कित्त्येक वर्षांनी राधानगरी धरणातील पाणी कोल्हापूर शहरवासियांना मिळणे आता बंद झाल्याने चिंतेत अधिक भर पडली आहे. शहरातील लोकांच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी दोन दिवसापासून तुळशी व कुंभी धरणातील पाणी भोगावती नदीत सोडण्यात आले आहे. हे पाणी पुढे पंचगंगा नदीवरील शिंगणापूर बंधाऱ्यावर बुधवारी पोहचले. त्यामुळे पाण्याची पातळी योग्य प्रमाणात राखली गेली. जलसंपदा विभागाने नियोजनपूर्वक तुळशीचे पाणी नदी पात्रात सोडल्यामुळे शहरातील पाणी पुरवठ्यावर फारसा परिणाम अजून तरी झालेला नाही. आता पावसाळा सुरु होऊन धरणक्षेत्रात पाणी साठा होईपर्यंत कोल्हापूरकरांना तुळशी व कुंभी या दोन धरणावरच अवलंबून रहावे लागणार आहे. शहरात सध्या एक दिवस आड पाणी पुरवढा करण्यात येत असून त्यामध्ये बदल करण्यात आलेला नाही. आणखी पंधरा दिवस तरी शहरवासियांना सध्याच्या नियोजनाप्रमाणे पाणी दिले जाईल, असे मनपा जलअभियंता मनिष पवार यांनी सांगितले. सध्याच्या पाणी पुरवठ्यात कपात करण्याबाबात अद्याप जलसंपदा विभागाकडून सुचना आलेली नाही, त्यामुळे दररोज ८० ते ८५ एमएलडी पाणी उपसा केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले. एक दिवस आड आणि तेही पूरेशा प्रमाणात पाणी मिळत असल्याने शहरात कोठे टॅँकर फिरतानाही दिसत नाहीत. मात्र पाऊस जर लांबला तर परिस्थिती बिकट होऊ शकते. (प्रतिनिधी)