शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
4
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
5
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
6
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
7
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
8
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
9
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
10
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
11
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
12
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
13
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
14
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
15
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
16
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

कोल्हापूर सलाईनवर!

By admin | Updated: June 2, 2016 01:36 IST

कुंभी, तुळशीचा दिलासा : काळम्मावाडी, राधानगरीतून पुरवठा बंद

कोल्हापूर : ‘आधीच कमी त्यात पुन्हा उशीर’अशी गत झालेल्या पावसाने आता मात्र कोल्हापूरकरांच्या तोंडचे पाणी पळविले आहे. जिल्ह्यातील काळम्मावाडी आणि राधानगरी या महत्वाच्या धरणातील पाणी साठी अगदी कमी झाल्यामुळे लोकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करुन देताना जलसंपदा विभागाला चांगलीच कसरत करावी लागत आहे. गेल्या कित्त्येक वर्षांनी राधानगरी धरणातील पाणी कोल्हापूर शहरवासियांना मिळणे आता बंद झाल्याने चिंतेत अधिक भर पडली आहे. शहरातील लोकांच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी दोन दिवसापासून तुळशी व कुंभी धरणातील पाणी भोगावती नदीत सोडण्यात आले आहे. हे पाणी पुढे पंचगंगा नदीवरील शिंगणापूर बंधाऱ्यावर बुधवारी पोहचले. त्यामुळे पाण्याची पातळी योग्य प्रमाणात राखली गेली. जलसंपदा विभागाने नियोजनपूर्वक तुळशीचे पाणी नदी पात्रात सोडल्यामुळे शहरातील पाणी पुरवठ्यावर फारसा परिणाम अजून तरी झालेला नाही. आता पावसाळा सुरु होऊन धरणक्षेत्रात पाणी साठा होईपर्यंत कोल्हापूरकरांना तुळशी व कुंभी या दोन धरणावरच अवलंबून रहावे लागणार आहे. शहरात सध्या एक दिवस आड पाणी पुरवढा करण्यात येत असून त्यामध्ये बदल करण्यात आलेला नाही. आणखी पंधरा दिवस तरी शहरवासियांना सध्याच्या नियोजनाप्रमाणे पाणी दिले जाईल, असे मनपा जलअभियंता मनिष पवार यांनी सांगितले. सध्याच्या पाणी पुरवठ्यात कपात करण्याबाबात अद्याप जलसंपदा विभागाकडून सुचना आलेली नाही, त्यामुळे दररोज ८० ते ८५ एमएलडी पाणी उपसा केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले. एक दिवस आड आणि तेही पूरेशा प्रमाणात पाणी मिळत असल्याने शहरात कोठे टॅँकर फिरतानाही दिसत नाहीत. मात्र पाऊस जर लांबला तर परिस्थिती बिकट होऊ शकते. (प्रतिनिधी)