शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल
3
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली
4
जॉन क्लार्क, मिशेल एच. डेवोरेट आणि जॉन एम. मार्टिनिस यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर
5
न्यायाधीशाची न्यायालयातच गोळ्या घालून हत्या; पिता-पुत्रही जखमी, सुनावणी सुरू असताना घडली घटना
6
Chaitanyananda Saraswati : स्वयंघोषित बाबाचं 'फाईव्ह स्टार' सीक्रेट; डीनने मुलींना दिली हॉटेलमध्ये रात्र घालवण्याची धमकी
7
VIDEO: वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात राडा! खूपच संतापला, भरमैदानात पंचांशी वाद घातला...
8
लोनवर Hero Splendor खरेदी करण्यासाठी किती डाउन पेमेंट करावं लागेल? किती लागेल मंथली EMI, जाणून घ्या
9
"सरकारने आज घोषित केलेली मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा, शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी देणार?’’, काँग्रेसचा सवाल   
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये चार नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
11
"शेतकऱ्यांना पंजाबपेक्षा जास्त मदत दिली, तुलना करण्यापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावलं
12
इतक्या कोटींची मालकीण आहे २५ वर्षीय मैथिली ठाकूर! एका शोचे मानधन किती? बिहार निवडणुकीमुळे चर्चेत
13
“STला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे गरजेचे, कामगारांच्या मागण्यांवर शासन सकारात्मक”: सरनाईक
14
२ वर्षांच्या मुलीवर माकडांचा हल्ला; वडिलांसमोर छतावरुन खाली पडली, धडकी भरवणारा Video
15
“शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार, पण आज थेट मदतीची जास्त गरज”: CM देवेंद्र फडणवीस
16
शबरीमला मंदिरातील सोन्याच्या मुलाम्यात घोटाळा? न्यायालयात मोठा खुलासा, देवस्वम बोर्डाने आरोप फेटाळले
17
१४ वर्षांच्या उच्चांकी स्तराच्या जवळ 'या' सरकारी बँकेचे शेअर्स; रेखा झुनझुनवालांनी खरेदी केले आणखी शेअर्स
18
Y Puran Kumar: वाद आणि संघर्षांनी भरलेली कारकीर्द; कोण होते वरिष्ठ आयपीएस अधिकारी वाय. पूरन?
19
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
20
UPI व्यवहारांच्या नियमामध्ये होणार बदल, ८ ऑक्टोबरपासून अशा प्रकारे करू शकाल पेमेंट

कोल्हापूर सलाईनवर!

By admin | Updated: June 2, 2016 01:36 IST

कुंभी, तुळशीचा दिलासा : काळम्मावाडी, राधानगरीतून पुरवठा बंद

कोल्हापूर : ‘आधीच कमी त्यात पुन्हा उशीर’अशी गत झालेल्या पावसाने आता मात्र कोल्हापूरकरांच्या तोंडचे पाणी पळविले आहे. जिल्ह्यातील काळम्मावाडी आणि राधानगरी या महत्वाच्या धरणातील पाणी साठी अगदी कमी झाल्यामुळे लोकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करुन देताना जलसंपदा विभागाला चांगलीच कसरत करावी लागत आहे. गेल्या कित्त्येक वर्षांनी राधानगरी धरणातील पाणी कोल्हापूर शहरवासियांना मिळणे आता बंद झाल्याने चिंतेत अधिक भर पडली आहे. शहरातील लोकांच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी दोन दिवसापासून तुळशी व कुंभी धरणातील पाणी भोगावती नदीत सोडण्यात आले आहे. हे पाणी पुढे पंचगंगा नदीवरील शिंगणापूर बंधाऱ्यावर बुधवारी पोहचले. त्यामुळे पाण्याची पातळी योग्य प्रमाणात राखली गेली. जलसंपदा विभागाने नियोजनपूर्वक तुळशीचे पाणी नदी पात्रात सोडल्यामुळे शहरातील पाणी पुरवठ्यावर फारसा परिणाम अजून तरी झालेला नाही. आता पावसाळा सुरु होऊन धरणक्षेत्रात पाणी साठा होईपर्यंत कोल्हापूरकरांना तुळशी व कुंभी या दोन धरणावरच अवलंबून रहावे लागणार आहे. शहरात सध्या एक दिवस आड पाणी पुरवढा करण्यात येत असून त्यामध्ये बदल करण्यात आलेला नाही. आणखी पंधरा दिवस तरी शहरवासियांना सध्याच्या नियोजनाप्रमाणे पाणी दिले जाईल, असे मनपा जलअभियंता मनिष पवार यांनी सांगितले. सध्याच्या पाणी पुरवठ्यात कपात करण्याबाबात अद्याप जलसंपदा विभागाकडून सुचना आलेली नाही, त्यामुळे दररोज ८० ते ८५ एमएलडी पाणी उपसा केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले. एक दिवस आड आणि तेही पूरेशा प्रमाणात पाणी मिळत असल्याने शहरात कोठे टॅँकर फिरतानाही दिसत नाहीत. मात्र पाऊस जर लांबला तर परिस्थिती बिकट होऊ शकते. (प्रतिनिधी)