शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

कोल्हापूर-रत्नागिरी मार्गास गती मिळेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 00:35 IST

तानाजी पोवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूृर : कोल्हापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या रत्नागिरी-सोलापूर ते नागपूर या राष्टÑीय महामार्गाची आखणी यापूर्वीच पूर्ण झाली असतानाही भूसंपादनाची प्रक्रिया अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे.मार्चमध्ये होणाºया भूसंपादनासाठी जुलै महिना उजाडला. आता कुठे या भूसंपादनाच्या नोटिसा बजावण्यात राष्टÑीय महामार्ग विभागाचे अधिकारी व्यस्त आहेत. या १६६ नंबरच्या रस्त्याचे संपूर्ण काँक्रीटीकरण ...

तानाजी पोवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूृर : कोल्हापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या रत्नागिरी-सोलापूर ते नागपूर या राष्टÑीय महामार्गाची आखणी यापूर्वीच पूर्ण झाली असतानाही भूसंपादनाची प्रक्रिया अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे.मार्चमध्ये होणाºया भूसंपादनासाठी जुलै महिना उजाडला. आता कुठे या भूसंपादनाच्या नोटिसा बजावण्यात राष्टÑीय महामार्ग विभागाचे अधिकारी व्यस्त आहेत. या १६६ नंबरच्या रस्त्याचे संपूर्ण काँक्रीटीकरण करण्यात येणार असून कोल्हापूर जिल्ह्यातून जाणाºया या सुमारे ७० किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या भूसंपादनासाठी पहिल्या टप्प्यात शाहूवाडी व पन्हाळा तालुक्यांतील सुमारे १७ गावांतील ३२५ जणांना नोटिसा बजावल्याने शेतकºयांत खळबळ माजली आहे.या राष्टÑीय महामार्गामुळे कोकण आता सोलापूरसारख्या दुष्काळी भागाच्या टप्प्यात येणार आहे. रत्नागिरी ते कोल्हापूर, मिरज, सांगोला ते सोलापूर असे सुमारे ३७० किलोमीटर सुमारे तीन हजार कोटी रुपये या मार्गासाठी खर्च करण्यात येणार आहेत. गेल्या दहा वर्षांत कोकणाशी दळणवळण वाढल्याने या मार्गावर प्रचंड वाहतूक वाढली आहे.या राष्टÑीय महामार्गांतर्गत कोल्हापूर ते रत्नागिरी असा चौपदरी रस्ता करण्यात येणार आहे. तो संपूर्णपणे काँक्रीटचा आहे. पहिल्या टप्प्यातील कोल्हापूर जिल्ह्यातून जाणारा रस्ता हा शाहूवाडी, पन्हाळा, हातकणंगले तालुुक्यातून जाणार आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात पन्हाळा आणि शाहूवाडी तालुक्यांतील भूसंपादन करण्यात येणार आहे. या महामार्गाची आखणी पूर्ण झाली असताना भूसंपादनासाठी काही शेतकºयांनी विरोध दर्शविला.जिल्ह्यातून जाणाºया सुमारे ७० किलोमीटर मार्गाच्या भूसंपादनाची प्रक्रिया मार्च महिन्यात सुरू होणे आवश्यक असताना त्याला अपेक्षित गती मिळालेली नाही. त्या प्रक्रियेला आता पुन्हा प्रारंभ झाला असून, पहिल्या टप्प्यातील आंबा ते पैजारवाडी या भूसंपादनामध्ये सुमारे १७ गावांतील ३२६ जणांना धडाधड नोटिसा गेल्याने आता शेतकºयांत खळबळ उडाली आहे.या भूसंपादनास हरकत असणाºयांनी लेखी स्वरूपात तक्रारी पुराव्यांनिशी सक्षम प्राधिकरण अथवा भूसंपादन विभागाच्या उपजिल्हाधिकाºयांकडे द्याव्यात, असे आवाहन केले आहे. त्यानंतर पैजारवाडी (ता. पन्हाळा) ते चोकाक (ता. हातकणंगले) अशा १७ गावांचे भूसंपादन होणार आहे.पहिल्या टप्प्यात या गावांचा समावेशकोल्हापूर जिल्ह्यातील भूसंपादनाची प्रक्रिया किमान चार महिने उशिरा करण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात आंबा ते पैजारवाडी या दरम्यानच्या शाहूवाडी तालुक्यातील चांदोली, गोगवे,करंजोशी, केर्ले (ता. शाहूवाडी), खुटाळवाडी, निळे, ठमकेवाडी, वालूर, येलूर येथील तसेच पन्हाळा तालुक्यातील आवळी, बोरपाडळे, दानेवाडी, देवाळे, नावली, पैजारवाडी, नेबापूर, पिंपळे-सातवे या गावांतील शेतजमिनींचा समावेश आहे.दोन टप्प्यांत भूसंपादनशाहूवाडी तालुक्यातील आंबा ते पैजारवाडी (ता. पन्हाळा) हे भूसंपादन एका टप्प्यात करण्यात येणार आहे. त्यानंतर पन्हाळा ते चोकाक (ता. हातकणंगले) अशी दुसºया टप्प्यातील भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होणार आहे. अशा सुमारे ७० किलोमीटर लांबीच्या रस्त्यामध्ये सुमारे ५० गावांतील भूसंपादन केले जाणार आहे.रत्नागिरी-सोलापूर ते नागपूर या राष्टÑीय महामार्गासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून जाणाºया रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी भूसंपादनाची प्रकिया मार्चमध्ये राबविणे अपेक्षित होते; पण शेतकºयांच्या विरोधामुळे ही प्रक्रिया उशिरा सुरू झाली आहे.- बी. एम. साळुंके, प्रकल्प संचालक, राष्टÑीय महामार्ग