शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते' खासदार कोण? महिला डॉक्टरने दोन पीएंची पोलिसांकडे केलेली लेखी तक्रार; आतेभावाचा मोठा खुलासा
2
महिला डॉक्टरवर अत्याचार करणारा पीएसआय गोपाल बदने फरार; महिला आयोगाने घेतली दखल
3
एका जाहीरातीमुळे ट्रम्प यांची सटकली, थेट ट्रेड डीलवरील चर्चाच रद्द केली, काय होतं त्या जाहीरातीत?
4
सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगरमधील RSS कार्यालयावर वंचितचा जनआक्रोश मोर्चा
5
Womens World Cup 2025 Semi-Final Schedule : टीम इंडियासमोर कोणत्या संघाचं असेल आव्हान?
6
"अशी घाणेरडी, गलिच्छ कृती केल्यास..."; सातारा महिला डॉक्टर प्रकरणात सुप्रिया सुळेंचा संताप
7
स्वतःला संपवू नका गं… तुम्हाला त्रास देणाऱ्या नराधमांना शिक्षा झालीच पाहिजे - चित्रा वाघ
8
Phaltan Crime: संबंधित पोलिसांना निलंबित करा, महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी मुख्यमंत्र्यांचे तातडीचे आदेश
9
Mumbai Crime: लालबागमध्ये थरार! बॉयफ्रेंडपासून वाचण्यासाठी रस्त्यावर धावत सुटली तरुणी; नर्सिंग होममध्ये घुसताच...
10
भारतानेही ट्रम्प यांच्या इशाऱ्यावरून रशियन तेल खरेदी कमी केले; अमेरिकेचा पुन्हा दावा
11
१०१ वर्ष जुनी कंपनी आयपीओ आणणार, १६६७ कोटी रुपये उभारणार; 'या' दिवसापासून करता येणार गुंतवणूक
12
जयंत पाटलांच्या जतच्या राजारामबापू पाटील कारखान्याचं नाव अज्ञातांनी बदललं, पडळकर -पाटील वाद पेटणार?
13
भुजबळांचा जामीन रद्द करुन मंत्रिमंडळातून बाहेर काढा; जरांगे पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
14
बसखाली बाईक अडकली, आग उसळली, दरवाजे उघडेनात... २० प्रवाशांचा जळून मृत्यू! नेमकं काय घडलं?
15
टाटा ट्रस्टमधील वाद लवकरच संपणार? मेहली मिस्त्रींसाठी नवी ऑफर, समूहात वर्चस्व वाढणार
16
IND vs AUS: रोहित शर्मा होणार 'षटकारांचा राजा', आफ्रिदीचा विश्वविक्रम मोडण्यापासून 'इतका' दूर!
17
Satara Crime: "...तोपर्यंत पोलिसी अत्याचाराला आळा बसणार नाही"; विजय वडेट्टीवार यांचे ट्विट
18
'शेतकऱ्यांची कर्जमाफी न करता नेता कसा फिरतो, हेच आता बघतो...', जरांगे पाटलांचा हल्लाबोल
19
PSI सोबतची 'ती' दुसरी व्यक्ती कोण? डॉक्टरने हातावर लिहिलेल्या 'त्या' नावाची ओळख उघड
20
पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी PSI चा दबाव; विरोध केल्याने महिला डॉक्टरचा सुरु होता छळ, शेवटी...

कोल्हापुरात पावसानेच मिळविले गर्दीवर नियंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:31 IST

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना संसर्ग कमी होत नसल्याची बाब राज्य शासनाने गांभीर्याने घेतली असून, जिल्ह्यात निर्बंधांची कडक अंमलबजावणी ...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना संसर्ग कमी होत नसल्याची बाब राज्य शासनाने गांभीर्याने घेतली असून, जिल्ह्यात निर्बंधांची कडक अंमलबजावणी करा, अशा स्पष्ट सूचना सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या असताना मंगळवारी दुपारपर्यंत पुन्हा एकदा शहरातील गर्दीवर कोणाचेही नियंत्रण नसल्याचे पहायला मिळाले. दुपारी तीननंतर मात्र पावसानेच गर्दीवर नियंत्रण मिळविले. गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण कोल्हापूर शहर अत्यावश्यक सेवेत असल्याचा आभास या गर्दीवरून निर्माण झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील संपूर्ण लॉकडाऊननंतर जिल्हा प्रशासनाने निर्बंध काहीसे शिथिल केले. अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी अकराऐवजी दुपारी चार वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली. त्याचा गैरफायदा घेत लोकांची गर्दी दुपारी चारपर्यंत कायम राहत आहे. चार वाजून गेल्यानंतरही नागरिक रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून शहरात असेच गर्दीचे चित्र कायम आहे. सर्व शासकीय कार्यालये, महानगरपालिका, खासगी अस्थापना नियमित सुरू असल्याचे वर्दळ वाढली आहे.

सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोप यांनी जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा आढावा घेतला. जिल्ह्यासह शहरातून सतत वाढत असलेली गर्दी, नागरिकांची बेफिकिरी हीच कारणे असल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी निर्बंध कडक करावेत, अशा स्पष्ट सूचना दिल्या. या सूचना देऊन केवळ चोवीस तास होण्याच्या आतच शहरात पुन्हा गर्दी झाली. भाजी मंडई, दुकानांत नागरिकांची होणाऱ्या या गर्दीवर पोलिसांसह महानगरपालिका पथकांचेही नियंत्रण नव्हते. काही रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती. महापालिकेचे कर्मचारी वाहनातून, रिक्षातून लाऊड स्पिकरद्वारे केवळ आवाहन करताना दिसत होते.

भाजी मंडई, धान्य बाजार, पावसाळी साहित्य खरेदीकरिता नागरिक रस्त्यावर उतरले होते. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन होत नसल्याचे दिसत होते. अत्यावश्यक सेवेत नसलेली; परंतु अन्य व्यवसाय करणारी दुकाने चोरून सुरूच होती. काही दुकानांत तर पाठीमागील बाजूने विक्री सुरू होती. काही दुकानांतून लग्नाची खरेदी सुरू आहे. दुकाने सुरू आहेत, साहित्य मिळतंय म्हटल्यावर नागरिक दुकानासमोर गर्दी करतात. बँकांतील गर्दी मात्र काहीशी ओसरली आहे. बँकांच्या दारात सुरक्षारक्षक प्रत्येकांच्या हातावर सॅनिटायझर फवारतात. नागरिकांना एका रांगेतून आत सोडतात.

मंगळवारी दुपारनंतर शहरात पावसाला सुरवात झाली आणि गर्दीवर नियंत्रण राखण्यात काही प्रमाणात यश आले. पावसामुळे दुचाकी वाहनावरून फिरणाऱ्यांची संख्या कमी झाली. पावसाची एकसारखी रिपरिप सुरू राहिल्याने रस्ते मोकळे झाले.