शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

कोल्हापूर-राधानगरी प्रवाशांना भुर्दंड

By admin | Updated: January 9, 2017 00:21 IST

एसटीचा कारभार : प्रतिप्रवासी ३ रुपये जादा आकारणी; क्रशर मार्गे वाहतूक सुरू असतानाही रिंगरोड मार्गाचे दर

प्रकाश पाटील ल्ल कोपार्डेकोल्हापूर-राधानगरी मार्गाची वाहतूक गेली पाच वर्षे रंकाळा तलाव पूर्वेकडील रस्त्याचे काम सुरू असल्याने, रिंगरोडमार्गे वळविण्यात आली होती. यामुळे एस. टी. महामंडळाने रिंगरोडमार्गे अर्धा स्टेज वाढत असल्याने तिकिटात ३ रुपये वाढ केली होती. मात्र, रिंगरोड मार्गे होणारी वाहतूक आता रस्ता दुरुस्तीनंतर रंकाळा जुना वाशी नाका-क्रशर चौक मार्गे पूर्ववत सुरू केली असली तरी तिकीट दर मात्र कमी केले नसल्याने, दर दिवशी प्रवाशांवर १५ हजार रुपयांचा अधिकचा भार पडत आहे.कोल्हापूर-राधानगरी दरम्यान दिवसभरात एस. टी.च्या १00 फेऱ्या होतात. तसेच राधानगरीच्या पुढे जाणाऱ्या गाड्यांची संख्याही २२ ते २५ च्या दरम्यान आहे. रंकाळा पूर्वेकडील बाजूचा रस्ता खराब झाल्याने या मार्गावरील सर्व वाहतूक गेल्या पाच वर्षांपासून रंकाळा डेपो, रिंग रोडमार्गे वळवून साने गुरुजी वसाहतीतून राधानगरी मार्गावर धावत होत्या. गेली चार ते पाच वर्षे रंकाळ्याच्या पूर्वेकडील रस्त्याच्या मजबुतीकरण व अस्तरीकरणाचे काम रखडल्याने ही वाहतूक रिंगरोड मार्गेच सुरू होती.मात्र, गेल्या एक दीड वर्षापासून रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर एस. टी. चालकांनी रंकाळा, रिंगरोड मार्गे जाण्याऐवजी रंकाळा, राज कपूर पुतळा, जुना वाशी नाका, क्रशर चौक मार्गे गाड्या सुरू केल्या आहेत. हा मार्ग बहुतांश अवजड वाहनांनाही खुला झाल्याने पूर्ववत एस. टी. वाहतूकही सुरू आहे, पण रिंगरोड मार्गे वळविलेल्या वाहतुकीवेळी अंतर वाढल्याने एस. टी. प्रशासनाने अर्ध्या स्टेजची आकारणी वाढल्याने प्रति प्रवासी तीन रुपये केलेली वाढ आता क्रशर चौकमार्गे वाहतूक सुरू असताना कमी करण्यात आलेली नाही.या मार्गावरून रंकाळा ते राधानगरी अशा १00 फेऱ्या आहेत. त्याशिवाय राधानगरीच्या पुढे कोकणात जाणाऱ्या २0 ते २१ व कोकणातून राधानगरीमार्गे कोल्हापूरच्या जाणाऱ्या १५ ते १६ एस. टी. बसेस आहेत. प्रत्येक गाडीमध्ये सरासरी ४० प्रवासी प्रवास करतात, असे गृहीत धरल्यास किमान ४ हजार प्रवासी रंकाळा-राधानगरी दरम्यान प्रवास करतात, तर त्यापुढे जाणाऱ्या गाड्यांचा विचार केल्यास एक हजार ते १५०० प्रवासी प्रवास करत आहेत. प्रत्येक प्रवाशाला आजही रंकाळा रिंग रोडमार्गे जाणाऱ्या मार्गावरील स्टेजप्रमाणे आकारणी होत आहे. ही आकारणी प्रति प्रवासी तीन रुपये जादा होत असून, किमान १३ ते १५ हजार रुपये प्रवाशांच्या खिशातून एस. टी. महामंडळ जादा काढून घेत असल्याने प्रवासीवर्गातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.नवा मार्गच अनधिकृतया मार्गावरून एस. टी.चे चालक एसटी घेऊन जात असले तरी महानगरपालिकेने तीन चारवेळा विनंती पत्र पाठवूनही एस. टी. वाहतुकीस परवानगी दिलेली नाही. पण हा मार्ग पूर्ण झाल्याने एस. टी. चालक रंकाळा पूर्वेकडील बाजूने क्रशर चौक मार्गे गाड्या घेऊन जात आहेत, पण हे अनधिकृत असून जोपर्यंत महानगरपालिका या मार्गावरून वाहतुकीस अधिकृत परवानगी देत नाही तोपर्यंत प्रशासन ही दरवाढ कमी करू शकत नाही, असे आपले नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दुय्यम अधिकाऱ्याने माहिती दिली.दिवसांतून १00 फेऱ्यांमधून ४ हजार प्रवासी प्रवास करतातप्रवासी संख्या पाहता दर दिवशी १३ ते १५ हजार रुपये एस.टी.कडून वसूलखिशातून जादा पैसे काढून घेत असल्याने प्रवासी वर्गातून संताप