शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

‘कोल्हापूर-नागपूर’ रेल्वे १२ मार्चपासून पुन्हा धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:36 IST

कोल्हापूर : कोरोनामुळे गेल्या अकरा महिन्यांपासून बंद असणारी कोल्हापूर-नागपूर रेल्वे दि. १२ मार्चपासून पुन्हा धावणार आहे. आठवड्यातून दोनवेळा ही ...

कोल्हापूर : कोरोनामुळे गेल्या अकरा महिन्यांपासून बंद असणारी कोल्हापूर-नागपूर रेल्वे दि. १२ मार्चपासून पुन्हा धावणार आहे. आठवड्यातून दोनवेळा ही रेल्वे असणार आहे. दर सोमवारी आणि शुक्रवारी कोल्हापुरातून, तर नागपूरमधून दर मंगळवारी, शनिवारी ही रेल्वे सुटणार आहे. त्यामुळे प्रवाशांची सोय होणार आहे. कोल्हापूर-धनबाद रेल्वेसाठी गांधीनगर, हातकणंगले, जयसिंगपूर येथे थांबा करण्यात यावा, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.

कोल्हापुरातील श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथून दि. १२ मार्च रोजी दुपारी पावणेएक वाजता ही रेल्वे निघणार आहे. नागपूरमधून दि. १३ मार्चला दुपारी सव्वा तीन वाजता कोल्हापूरच्या दिशेनेही रेल्वे निघणार आहे. अकरा महिन्यांनंतर ही रेल्वेसेवा पूर्ववत सुरू होणार आहे. त्यातून प्रवास करण्यासाठी तिकीट आरक्षित करणे आवश्यक आहे. या रेल्वेमुळे नागपूरला कमी वेळेत पोहोचण्यासाठी कोल्हापूर-धनबाद रेल्वेनंतर आणखी एक रेल्वे प्रवाशांना उपलब्ध झाली आहे, अशी माहिती पुणे विभागीय रेल्वे प्रवासी सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी यांनी गुरुवारी दिली. दरम्यान, दर शुक्रवारी कोल्हापूर-धनबाद ही विशेष साप्ताहिक रेल्वे सुरू झाली आहे. मात्र, कोल्हापूरमध्ये श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस वगळता अन्य कोणता थांबा नाही. मात्र, सांगली जिल्ह्यातील ढालगाव, कवठेमहांकाळ येथे थांबा आहेत. कोल्हापूरमधील गांधीनगर, जयसिंगपूर, हातकणंगले याठिकाणी थांबा करावा, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.

चौकट

चांगला प्रतिसाद मिळेल

कोल्हापूर-धनबाद रेल्वेच्या थांब्यासाठी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी कोणता निकष लावला आहे, ते समजत नाही. गांधीनगर, हातकणंगले, जयसिंगपूर येथे थांबा केल्यास त्याला चांगला प्रतिसाद मिळू शकतो. त्याबाबत लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन संबंधित ठिकाणी थांबा मंजूर करण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी हातकणंगले येथील प्रशांत चव्हाण यांनी केली आहे.

कोल्हापूर-नागपूर रेल्वेची वेळ

दर सोमवारी, शुक्रवारी कोल्हापूरहून निघणार : दुपारी पावणेएक वाजता.

मंगळवारी, शनिवारी नागपूरला पोहोचणार : दुपारी १२ वाजता.

नागपूरहून दर मंगळवारी, शनिवारी सुटणार : दुपारी ३.१५ वाजता.

बुधवारी, रविवारी कोल्हापूरला पोहोचणार : दुपारी २ वाजता.