शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
3
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
5
२ हेल्थ इन्शुन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
6
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार
7
मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
8
मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
9
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
10
व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव
11
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
12
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
13
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
14
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
15
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
16
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी
17
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
18
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
19
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
20
गावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी

कोल्हापूर : पहिल्या पत्नीच्या खूनातून निर्दोष सुटलेल्याने केला पत्नीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 14:27 IST

चारित्र्याच्या संशयाचे पिशाच मानगुटीवर बसलेल्या पतीने बुधवारी पहाटे दुसऱ्या पत्नीचाही गळा दाबून खून केला. उचगाव येथील जानकीनगर येथे हा प्रकार घडला. खूनानंतर पतीने स्वत: विळीने स्वत:च्या गळ्यावर वार करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. शिवाजी प्रभाकर ठोंबरे (वय ४0, रा. ) असे आरोपीचे नाव आहे. विशेष म्हणजे शिवाजी पहिल्या पत्नीच्या खूनाच्या आरोपातून निर्दोष सुटला होता.

ठळक मुद्देपहिल्या पत्नीच्या खूनातून निर्दोष सुटलेल्याने केला पत्नीचा खूनचारित्र्याचाच संशय : आत्महत्येचा केला प्रयत्न

कोल्हापूर : चारित्र्याच्या संशयाचे पिशाच मानगुटीवर बसलेल्या पतीने बुधवारी पहाटे दुसऱ्या पत्नीचा गळा दाबून खून केला. उचगाव येथील जानकीनगर येथे हा प्रकार घडला. खूनानंतर पतीने स्वत: विळीने स्वत:च्या गळ्यावर वार करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. शिवाजी प्रभाकर ठोंबरे (वय ४0, रा. ) असे आरोपीचे नाव आहे. विशेष म्हणजे शिवाजी पहिल्या पत्नीच्या खूनाच्या आरोपातून निर्दोष सुटला होता.

आरोपी शिवाजी ठोंबरे

मिळालेल्या माहितीनुसार शिवाजी ठोंबरे हा उचगाव येथील जानकीनगर येथे रहात होता. त्याचा पाच महिन्यापूर्वीच कुर्डूवाडी, जि. सोलापूर येथील विद्या धायगुडे (वय २२) हिच्याशी दुसरा विवाह झाला होता. मात्र, विवाहानंतर तो पत्नीवर वारंवार चारित्र्याचा संशय घेत होता, तसेच तिला मारहाणही करीत असल्यामुळे विद्याने माहेरी कळविले होते. त्यानुसार विद्याचा भाउ प्रकाश दत्ता धायगुडे हा अहिल्यानगर, कुर्डूवाडी, जि. सोलापूर येथून तिला माहेरी नेण्यासाठी आला होता.

पत्नी माहेरी जाणार यामुळे चिडलेल्या शिवाजीने पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास पत्नीच्या छातीवर बसून तिचा गळा दोन्ही हाताने दाबून तिचा खून केला. त्यानंतर त्याने स्वत: डाव्या हाताने विळीने शिरा कापून घेतल्या आणि गळ्यावर मारुन घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रयत्नात तो गंभीर जखमी झाला असून त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.विद्याचा भाउ प्रकाश धायगुडे याने गांधीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिस अधिक तपास करीत आहेत. घटनास्थळी करवीरचे उपविभागीय पोलिस अधिकारी सूरज गुरव, गांधीनगर पोलिस ठाण्याचे प्रभारी, सहायक पोलिस निरिक्षक सुशांत चव्हाण, पोलिस उपनिरिक्षक एस. एस. पांचाळ यांनी भेट दिली आहे.पहिल्या पत्नीच्या खूनातून निर्दोषआरोपी शिवाजीने यापूर्वी पहिली पत्नी सुलभा हिचा २ जुलै २0१४ मध्ये चारित्र्याच्या संशयावरुनच डोक्यात लोखंडी पार मारुन जखमी केले होते. याप्रकरणी सोलापूर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यानंतर पुन्हा त्याने १0 सप्टेंबर २0१४ रोजी राहत्या घरी चारित्र्याच्या संशय घेउन पत्नी सुलभा झोपली असता तिच्या डोक्यात भरलेले गॅस सिलिंडर मारुन खून केला होता. याबाबत गांधीनगर पोलिस ठाण्यात कलम ३0२ नुसार गुन्हा दाखल होता. मात्र या गुन्ह्यात तो १५ नोव्हेबर २0१७ रोजी निर्दोष सुटला होता.