शहरं
Join us  
Trending Stories
1
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
2
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
3
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
4
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
5
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
6
Gold prices today: ३३५१ रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण; खरेदीदारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
7
Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
8
IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील
9
Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
10
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
11
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
12
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
13
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
14
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
15
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
16
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
17
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
18
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
19
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
20
New Fastag Rule: आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : पहिल्या पत्नीच्या खूनातून निर्दोष सुटलेल्याने केला पत्नीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 14:27 IST

चारित्र्याच्या संशयाचे पिशाच मानगुटीवर बसलेल्या पतीने बुधवारी पहाटे दुसऱ्या पत्नीचाही गळा दाबून खून केला. उचगाव येथील जानकीनगर येथे हा प्रकार घडला. खूनानंतर पतीने स्वत: विळीने स्वत:च्या गळ्यावर वार करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. शिवाजी प्रभाकर ठोंबरे (वय ४0, रा. ) असे आरोपीचे नाव आहे. विशेष म्हणजे शिवाजी पहिल्या पत्नीच्या खूनाच्या आरोपातून निर्दोष सुटला होता.

ठळक मुद्देपहिल्या पत्नीच्या खूनातून निर्दोष सुटलेल्याने केला पत्नीचा खूनचारित्र्याचाच संशय : आत्महत्येचा केला प्रयत्न

कोल्हापूर : चारित्र्याच्या संशयाचे पिशाच मानगुटीवर बसलेल्या पतीने बुधवारी पहाटे दुसऱ्या पत्नीचा गळा दाबून खून केला. उचगाव येथील जानकीनगर येथे हा प्रकार घडला. खूनानंतर पतीने स्वत: विळीने स्वत:च्या गळ्यावर वार करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. शिवाजी प्रभाकर ठोंबरे (वय ४0, रा. ) असे आरोपीचे नाव आहे. विशेष म्हणजे शिवाजी पहिल्या पत्नीच्या खूनाच्या आरोपातून निर्दोष सुटला होता.

आरोपी शिवाजी ठोंबरे

मिळालेल्या माहितीनुसार शिवाजी ठोंबरे हा उचगाव येथील जानकीनगर येथे रहात होता. त्याचा पाच महिन्यापूर्वीच कुर्डूवाडी, जि. सोलापूर येथील विद्या धायगुडे (वय २२) हिच्याशी दुसरा विवाह झाला होता. मात्र, विवाहानंतर तो पत्नीवर वारंवार चारित्र्याचा संशय घेत होता, तसेच तिला मारहाणही करीत असल्यामुळे विद्याने माहेरी कळविले होते. त्यानुसार विद्याचा भाउ प्रकाश दत्ता धायगुडे हा अहिल्यानगर, कुर्डूवाडी, जि. सोलापूर येथून तिला माहेरी नेण्यासाठी आला होता.

पत्नी माहेरी जाणार यामुळे चिडलेल्या शिवाजीने पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास पत्नीच्या छातीवर बसून तिचा गळा दोन्ही हाताने दाबून तिचा खून केला. त्यानंतर त्याने स्वत: डाव्या हाताने विळीने शिरा कापून घेतल्या आणि गळ्यावर मारुन घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रयत्नात तो गंभीर जखमी झाला असून त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.विद्याचा भाउ प्रकाश धायगुडे याने गांधीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिस अधिक तपास करीत आहेत. घटनास्थळी करवीरचे उपविभागीय पोलिस अधिकारी सूरज गुरव, गांधीनगर पोलिस ठाण्याचे प्रभारी, सहायक पोलिस निरिक्षक सुशांत चव्हाण, पोलिस उपनिरिक्षक एस. एस. पांचाळ यांनी भेट दिली आहे.पहिल्या पत्नीच्या खूनातून निर्दोषआरोपी शिवाजीने यापूर्वी पहिली पत्नी सुलभा हिचा २ जुलै २0१४ मध्ये चारित्र्याच्या संशयावरुनच डोक्यात लोखंडी पार मारुन जखमी केले होते. याप्रकरणी सोलापूर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यानंतर पुन्हा त्याने १0 सप्टेंबर २0१४ रोजी राहत्या घरी चारित्र्याच्या संशय घेउन पत्नी सुलभा झोपली असता तिच्या डोक्यात भरलेले गॅस सिलिंडर मारुन खून केला होता. याबाबत गांधीनगर पोलिस ठाण्यात कलम ३0२ नुसार गुन्हा दाखल होता. मात्र या गुन्ह्यात तो १५ नोव्हेबर २0१७ रोजी निर्दोष सुटला होता.