शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर ‘केरोसिनमुक्त’ शहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 00:50 IST

गडहिंग्लज : संपूर्ण कोल्हापूर शहर केरोसिनमुक्त करण्यात जिल्हा पुरवठा विभागाला शंभर टक्के यश आले आहे. त्यामुळे दरमहा तब्बल साडेतीन कोटींची बचत होत असून, चंदीगड व दिल्लीनंतर कोल्हापूर हे देशातील तिसरे केरोसिनमुक्त शहर ठरले आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.येथील तहसील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ...

ठळक मुद्देविवेक आगवणे : देशात तिसरे, जिल्हा पुरवठा विभागाला यश, साडेतीन कोटींची बचत

गडहिंग्लज : संपूर्ण कोल्हापूर शहर केरोसिनमुक्त करण्यात जिल्हा पुरवठा विभागाला शंभर टक्के यश आले आहे. त्यामुळे दरमहा तब्बल साडेतीन कोटींची बचत होत असून, चंदीगड व दिल्लीनंतर कोल्हापूर हे देशातील तिसरे केरोसिनमुक्त शहर ठरले आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

येथील तहसील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी जिल्हा पुरवठा विभागाच्या यशस्वी कामगिरीचा आढावा घेतला. यावेळी तहसीलदार राजेश चव्हाण, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.आगवणे म्हणाले, दरमहा जिल्ह्यातील चार लाखांहून अधिक कुटुंबांना सुमारे १३ हजार मेट्रिक टन धान्य वितरित केले जाते. ई-पॉझ मशीनवरील बायोमेट्रिक रेशनिंग योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे साधारणपणे १० टक्के धान्याची बचत होऊन हजारो कोटी रुपये शासनाच्या तिजोरीत जमा होताहेत. त्याबरोबरच वितरण व्यवस्थेत कमालीची पारदर्शकता आली असून, सर्व प्रकारच्या गैरप्रकारांनाही आळा बसला आहे.

स्वेच्छेने रेशन धान्य नाकारणाºयांची संख्या कमी असली तरी पात्र लाभार्थ्यांना त्यांचे हक्काचे धान्य वेळेत उपलब्ध करून देण्याबरोबरच सार्वजनिक वितरण व्यवस्था अधिक बळकट करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. तद्वत, गावागावांतील रास्त भाव दुकाने भविष्यात ‘मिनीबँक’ म्हणून काम करतील. ३० सप्टेंबरपर्यंत शिधापत्रिकांना आधारकार्ड लिंक करण्याची मुदत आहे. त्यानंतर आधारकार्ड शिधापत्रिकेला न जोडल्यास धान्य बंद होण्याची शक्यता आहे.

‘द्वार वितरण’ पद्धतीच्या माध्यमातून रेशनिंगचे धान्य थेट रास्त भाव दुकानदारांच्या दुकानात पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे वाहतूक, हमाली व गोदामावरीलदेखील खर्च कमी होऊन आणखी बचत होण्यास मदत होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

‘कोल्हापूर पॅटर्न’मुळे राज्य आघाडीवर..!आंध्र व हरियाणानंतर बायोमेट्रिक रेशनिंगच्या ‘कोल्हापूर पॅटर्न’च्या धर्तीवर अन्य जिल्ह्यांतदेखील ही योजना राबविण्यात आल्यामुळे त्याचा राज्यभरातून उठाव झाला आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील आदर्शवत राज्य म्हणून महाराष्ट्राची गणना होऊ लागली.किंबहुना, ‘कोल्हापूर पॅटर्न’मुळेच राज्य आघाडीवर जाण्यास मदत झाली, त्याचे श्रेय कोल्हापूरकरांना जाते, असेही आगवणे यांनी नम्रपणे नमूद केले.