शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

कोल्हापूर ‘केरोसिनमुक्त’ शहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 00:50 IST

गडहिंग्लज : संपूर्ण कोल्हापूर शहर केरोसिनमुक्त करण्यात जिल्हा पुरवठा विभागाला शंभर टक्के यश आले आहे. त्यामुळे दरमहा तब्बल साडेतीन कोटींची बचत होत असून, चंदीगड व दिल्लीनंतर कोल्हापूर हे देशातील तिसरे केरोसिनमुक्त शहर ठरले आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.येथील तहसील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ...

ठळक मुद्देविवेक आगवणे : देशात तिसरे, जिल्हा पुरवठा विभागाला यश, साडेतीन कोटींची बचत

गडहिंग्लज : संपूर्ण कोल्हापूर शहर केरोसिनमुक्त करण्यात जिल्हा पुरवठा विभागाला शंभर टक्के यश आले आहे. त्यामुळे दरमहा तब्बल साडेतीन कोटींची बचत होत असून, चंदीगड व दिल्लीनंतर कोल्हापूर हे देशातील तिसरे केरोसिनमुक्त शहर ठरले आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

येथील तहसील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी जिल्हा पुरवठा विभागाच्या यशस्वी कामगिरीचा आढावा घेतला. यावेळी तहसीलदार राजेश चव्हाण, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.आगवणे म्हणाले, दरमहा जिल्ह्यातील चार लाखांहून अधिक कुटुंबांना सुमारे १३ हजार मेट्रिक टन धान्य वितरित केले जाते. ई-पॉझ मशीनवरील बायोमेट्रिक रेशनिंग योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे साधारणपणे १० टक्के धान्याची बचत होऊन हजारो कोटी रुपये शासनाच्या तिजोरीत जमा होताहेत. त्याबरोबरच वितरण व्यवस्थेत कमालीची पारदर्शकता आली असून, सर्व प्रकारच्या गैरप्रकारांनाही आळा बसला आहे.

स्वेच्छेने रेशन धान्य नाकारणाºयांची संख्या कमी असली तरी पात्र लाभार्थ्यांना त्यांचे हक्काचे धान्य वेळेत उपलब्ध करून देण्याबरोबरच सार्वजनिक वितरण व्यवस्था अधिक बळकट करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. तद्वत, गावागावांतील रास्त भाव दुकाने भविष्यात ‘मिनीबँक’ म्हणून काम करतील. ३० सप्टेंबरपर्यंत शिधापत्रिकांना आधारकार्ड लिंक करण्याची मुदत आहे. त्यानंतर आधारकार्ड शिधापत्रिकेला न जोडल्यास धान्य बंद होण्याची शक्यता आहे.

‘द्वार वितरण’ पद्धतीच्या माध्यमातून रेशनिंगचे धान्य थेट रास्त भाव दुकानदारांच्या दुकानात पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे वाहतूक, हमाली व गोदामावरीलदेखील खर्च कमी होऊन आणखी बचत होण्यास मदत होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

‘कोल्हापूर पॅटर्न’मुळे राज्य आघाडीवर..!आंध्र व हरियाणानंतर बायोमेट्रिक रेशनिंगच्या ‘कोल्हापूर पॅटर्न’च्या धर्तीवर अन्य जिल्ह्यांतदेखील ही योजना राबविण्यात आल्यामुळे त्याचा राज्यभरातून उठाव झाला आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील आदर्शवत राज्य म्हणून महाराष्ट्राची गणना होऊ लागली.किंबहुना, ‘कोल्हापूर पॅटर्न’मुळेच राज्य आघाडीवर जाण्यास मदत झाली, त्याचे श्रेय कोल्हापूरकरांना जाते, असेही आगवणे यांनी नम्रपणे नमूद केले.