शहरं
Join us  
Trending Stories
1
Conversion Law: राजस्थानात धर्मांतरण कायदा लागू, राज्यपाल हरीभाऊ बागडे यांची मंजुरी, उल्लंघन केल्यास किती शिक्षा होणार? जाणून थक्क व्हाल
2
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
3
शून्य बँक शिल्लक असतानाही होईल UPI पेमेंट? 'भीम ॲप'चं 'हे' खास फीचर जाणून घ्या!
4
भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्र आघाडीवर; ७८५ शासकीय कर्मचारी, खासगी व्यक्तींना अटक; देशभरात २,८७५ ठिकाणी कारवाई
5
मुंबई: ठाकरे गटाच्या पेडणेकर, दुधवडकरांसह आठ जणांची उमेदवारी धोक्यात; प्रभाग आरक्षणाचा फटका
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: गणपतीसह लक्ष्मी देवीचेही करा पूजन, मंत्राचे जप ठरतील उपयुक्त!
7
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
8
अंत्यसंस्काराच्या दिवशी कापला केक; चितेवर ठेवण्यापूर्वी वडिलांनी साजरा केला मुलीचा वाढदिवस
9
चातुर्मासाची शेवटची संकष्ट चतुर्थी: गणेश कल्याण करेल, शुभ घडेल; पाहा, व्रत विधी-चंद्रोदय वेळ
10
५ राजयोगात संकष्ट चतुर्थी: १० राशींची इच्छा पूर्ण, मान-सन्मान; यश-कीर्ती-लाभ, शुभ-वरदान काळ!
11
VIRAL : गर्लफ्रेंडच्या हातात हात घालून हॉटेल बाहेर आला; पत्नीने बघताच भर रस्त्यात धुतला! व्हिडीओ व्हायरल
12
मलायकाला झालंय तरी काय? अरबाज खानने लेकीला आणलं घरी, अभिनेत्रीने स्टोरी शेअर करत...
13
India Vs China: भारत जागतिक अर्थव्यवस्थेचा प्रमुख विकास इंजिन, चीनची वाढ संथ; पाहा काय म्हणाल्या IMF प्रमुख
14
वर्षाला २० लाखाचं पॅकेज, ५ महिन्यापूर्वी केले लव्ह मॅरेज; २८ वर्षीय युवकानं स्वत:ला का संपवलं?
15
स्वतःवर गोळी झाडणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्याची IAS पत्नी आली समोर; एफआयआर दाखल, कुणावर केले आरोप?
16
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, निफ्टी २५ हजारांच्या वर; Cipla, Zomato, Dr Reddy's मध्ये खरेदी
17
IND W vs SA W ICC Women's ODI World Cup Live Streaming : टीम इंडियाला हॅटट्रिकसह टेबल टॉपर होण्याची संधी, पण..
18
तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला
19
"भाई, ती मुलगी नाही...एक पंजा अन्...!"; थेट वाघोसोबतच 'लिप लॉक' करताना दिसला तरुण, Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल
20
घरबसल्या महिन्याला ₹९२५० ची कमाई करुन देणारी पोस्टाची स्कीम! पण एक चूक पडेल भारी, बसू शकतो ३० हजारांचा फटका

कोल्हापूर ‘केरोसिनमुक्त’ शहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 00:50 IST

गडहिंग्लज : संपूर्ण कोल्हापूर शहर केरोसिनमुक्त करण्यात जिल्हा पुरवठा विभागाला शंभर टक्के यश आले आहे. त्यामुळे दरमहा तब्बल साडेतीन कोटींची बचत होत असून, चंदीगड व दिल्लीनंतर कोल्हापूर हे देशातील तिसरे केरोसिनमुक्त शहर ठरले आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.येथील तहसील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ...

ठळक मुद्देविवेक आगवणे : देशात तिसरे, जिल्हा पुरवठा विभागाला यश, साडेतीन कोटींची बचत

गडहिंग्लज : संपूर्ण कोल्हापूर शहर केरोसिनमुक्त करण्यात जिल्हा पुरवठा विभागाला शंभर टक्के यश आले आहे. त्यामुळे दरमहा तब्बल साडेतीन कोटींची बचत होत असून, चंदीगड व दिल्लीनंतर कोल्हापूर हे देशातील तिसरे केरोसिनमुक्त शहर ठरले आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

येथील तहसील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी जिल्हा पुरवठा विभागाच्या यशस्वी कामगिरीचा आढावा घेतला. यावेळी तहसीलदार राजेश चव्हाण, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.आगवणे म्हणाले, दरमहा जिल्ह्यातील चार लाखांहून अधिक कुटुंबांना सुमारे १३ हजार मेट्रिक टन धान्य वितरित केले जाते. ई-पॉझ मशीनवरील बायोमेट्रिक रेशनिंग योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे साधारणपणे १० टक्के धान्याची बचत होऊन हजारो कोटी रुपये शासनाच्या तिजोरीत जमा होताहेत. त्याबरोबरच वितरण व्यवस्थेत कमालीची पारदर्शकता आली असून, सर्व प्रकारच्या गैरप्रकारांनाही आळा बसला आहे.

स्वेच्छेने रेशन धान्य नाकारणाºयांची संख्या कमी असली तरी पात्र लाभार्थ्यांना त्यांचे हक्काचे धान्य वेळेत उपलब्ध करून देण्याबरोबरच सार्वजनिक वितरण व्यवस्था अधिक बळकट करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. तद्वत, गावागावांतील रास्त भाव दुकाने भविष्यात ‘मिनीबँक’ म्हणून काम करतील. ३० सप्टेंबरपर्यंत शिधापत्रिकांना आधारकार्ड लिंक करण्याची मुदत आहे. त्यानंतर आधारकार्ड शिधापत्रिकेला न जोडल्यास धान्य बंद होण्याची शक्यता आहे.

‘द्वार वितरण’ पद्धतीच्या माध्यमातून रेशनिंगचे धान्य थेट रास्त भाव दुकानदारांच्या दुकानात पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे वाहतूक, हमाली व गोदामावरीलदेखील खर्च कमी होऊन आणखी बचत होण्यास मदत होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

‘कोल्हापूर पॅटर्न’मुळे राज्य आघाडीवर..!आंध्र व हरियाणानंतर बायोमेट्रिक रेशनिंगच्या ‘कोल्हापूर पॅटर्न’च्या धर्तीवर अन्य जिल्ह्यांतदेखील ही योजना राबविण्यात आल्यामुळे त्याचा राज्यभरातून उठाव झाला आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील आदर्शवत राज्य म्हणून महाराष्ट्राची गणना होऊ लागली.किंबहुना, ‘कोल्हापूर पॅटर्न’मुळेच राज्य आघाडीवर जाण्यास मदत झाली, त्याचे श्रेय कोल्हापूरकरांना जाते, असेही आगवणे यांनी नम्रपणे नमूद केले.