शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

दोन्ही मंत्र्यांकडून राजीनाम्याचे नाटक कोल्हापूर जनशक्ती : जनतेची फसवणूक करू नका

By admin | Updated: May 9, 2014 00:38 IST

कोल्हापूर : टोल रद्द न झाल्यास राजीनामा देण्याचा इशारा मंत्र्यांनी दिला आहे. गेल्या चार वर्षांत जे केले नाही,

 कोल्हापूर : टोल रद्द न झाल्यास राजीनामा देण्याचा इशारा मंत्र्यांनी दिला आहे. गेल्या चार वर्षांत जे केले नाही, ते या उरलेल्या दोन महिन्यांत, जे काही वजन वापरायचे ते वापरून टोल रद्द करा. उगाचच राजीनाम्याने नाटक करू नका. असे करून पुढील दोन महिन्यांसाठी जनतेची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन कोल्हापूर जनशक्तीच्या वतीने सुभाष वोरा व समीर नदाफ यांनी पत्रकाद्वारे केले आहे. टोलविरोधात गेली चार वर्षे जनता रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. या काळात शासन आणि प्रशासनाने सातत्याने जनतेच्या विरोधी भूमिका घेऊन आय.आर.बी.ची तळी उचलली आहे. शासनाचे प्रतिनिधी या नात्याने कोल्हापुरातील दोन्ही मंत्र्यांना वेळोवेळी निवेदने देऊन जनतेने साकडे घातले. परंतु, चार वर्षे लाल दिव्याच्या गाडीत बसून मंत्रिपदाची ऐट मिरवणारे मंत्री केवळ तोंडदेखलेपणाने या आंदोलनाला सामोरे गेले आहेत. आमरण उपोषणाला बसलेल्या आंदोलनकर्त्यांना खोटे आश्वासन देऊन, टोल पंचगंगेत बुडवल्याचा दावा करून त्यांची दिशाभूल केली व आंदोलन मागे घ्यावयास लावले. सातत्याने जनतेबरोबर आहोत असे आश्वासन देऊन शासनाच्या निर्णयाची इमानेइतबारे अंमलबजावणी करणार्‍या मंत्र्यांना गेल्या चार वर्षांत मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची उपरती कधी झाली नाही. परंतु, पुढील दोन महिन्यांनंतर राज्य विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने लाल दिवे उतरून गाड्या सरकारदरबारी जमा कराव्या लागणार आहेत. तेव्हा चार वर्षांत जे केले नाही, ते केवळ दोन महिन्यांकरिता करून जनतेसाठी इतके कष्ट घेऊ नका. कोल्हापुरातील मंत्र्यांनी ओठात एक व पोटात एक अशीच भूमिका घेतली आहे. चार वर्षे जनतेसाठी जे केले नाही, ते या दोन महिन्यांत राज्य सरकारकडे वापरून पहा; अन्यथा कोल्हापूरची जनता सार्वभौम आहे. येत्या विधानसभा निवडणुकांमध्ये याचा काय घ्यायचा तो निर्णय जनताच घेईल, असे पत्रकात म्हटले आहे.