शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

नियोजनबद्ध उपक्रमामुळे ‘कोल्हापूर’ आदर्श

By admin | Updated: April 17, 2015 00:06 IST

राज्यात झेंडा : ‘कायापालट’चा झाला आहे शासन निर्णय; नावीन्यपूर्ण उपक्रमांची दखल

भीमगोंडा देसाई - कोल्हापूर- विविध योजनांची नियोजनबद्ध अंमलबजावणी, गतिमान प्रशासन, लोकसहभागातून राबविलेले कायापालट अभियान, बोलक्या शाळांचा उपक्रम, अशा आदर्शवत उपक्रमांमुळे येथील जिल्हा परिषद केंद्र स्तरावर जाऊन पोहोचली आहे. राज्यात प्रथम आल्यानंतर केंद्रातही अव्वल ठरल्यामुळे कोल्हापूर जिल्हा परिषद आदर्श ठरली आहे.२०१३-१४ मधील कामकाजावर यशवंत पंचायत राज अभियान तथा पंचायत सबलीकरण व उत्तरदायित्व प्रोत्साहन योजनेंतर्गत अत्युत्कृष्ट ठरवीत राज्यात जिल्हा परिषदेने प्रथम क्रमांक मिळविला. त्याचबरोबर केंद्राच्या पंचायत राज मंत्रालयाच्या राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण योजनेंतर्गत ३० लाखांचे बक्षीस मिळविले. राज्य आणि केंद्र पातळीवर अव्वल ठरल्याने जिल्हा परिषदेचे उपक्रम पाहण्यासाठी राज्यातून अधिकारी, पदाधिकारी येत आहेत. जिल्हा परिषदेने निर्मल भारत अभियानात पहिल्यापासून देशात घेतलेली आघाडी आजही कायम ठेवली आहे. सहा तालुके पूर्णपणे निर्मल झालेला राज्यातील कोल्हापूर हा एकमेव जिल्हा आहे. जिल्ह्यातील तब्बल १००२ गावांनी निर्मलग्राम पुरस्कार मिळविले आहेत. आता जिल्हा देशात निर्मल करण्यासाठी व्यापक नियोजन केले आहे.आरोग्य विभागाने गेल्या वर्षापासून लोकसहभागातून कायापालट हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला. या उपक्रमातून देणगी व वस्तू स्वरूपात ९१ लाख ३८ हजारांची कामे प्राथमिक आरोग्य केंद्रांत झाली आहेत. परिणामी, आरोग्य केंद्रांचा चेहरामोहरा बदलला. दर्जेदार सेवा-सुविधांमुळे आरोग्य केंद्रांत उपचार घेण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. राज्यस्तरावर याची नोंद घेण्यात आली. राज्यात सर्व जिल्ह्यांत कायापालट योजना राबविण्यासाठी शासनाने ३ सप्टेंबर २०१४ रोजी शासन निर्णय काढला. बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी ‘चिरायू योजना’ व्यापकपणे राबविली. ग्रामीण भागातील खेळाडंूना दर्जेदार शिक्षण व खेळाचे प्रशिक्षण मोफत उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील एकमेव पथदर्शी अशी ‘राजर्षी शाहू छत्रपती निवासी क्रीडा प्रशाला’ सुरू केली. राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत ‘कौशल्य विकास व रोजगारनिर्मिती’मध्ये ‘एक कुटुंब, एक नोकरी’ हा उपक्रम राबवून गेल्या वर्षी राज्यात पहिला क्रमांक मिळविला.बायोगॅस बांधण्यात विक्रमराष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत २०१३-१४ मध्ये राज्यात सर्वाधिक बायोगॅस सयंत्र उभारणी करण्याचा विक्रमही जिल्हा परिषदेने केला आहे. बायोगॅस उभारणीत राज्याच्या एकूण उद्दिष्टाच्या टक्केवारीत २७ टक्के हिस्सा कोल्हापूर जिल्ह्याचा आहे.