शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

नियोजनबद्ध उपक्रमामुळे ‘कोल्हापूर’ आदर्श

By admin | Updated: April 17, 2015 00:06 IST

राज्यात झेंडा : ‘कायापालट’चा झाला आहे शासन निर्णय; नावीन्यपूर्ण उपक्रमांची दखल

भीमगोंडा देसाई - कोल्हापूर- विविध योजनांची नियोजनबद्ध अंमलबजावणी, गतिमान प्रशासन, लोकसहभागातून राबविलेले कायापालट अभियान, बोलक्या शाळांचा उपक्रम, अशा आदर्शवत उपक्रमांमुळे येथील जिल्हा परिषद केंद्र स्तरावर जाऊन पोहोचली आहे. राज्यात प्रथम आल्यानंतर केंद्रातही अव्वल ठरल्यामुळे कोल्हापूर जिल्हा परिषद आदर्श ठरली आहे.२०१३-१४ मधील कामकाजावर यशवंत पंचायत राज अभियान तथा पंचायत सबलीकरण व उत्तरदायित्व प्रोत्साहन योजनेंतर्गत अत्युत्कृष्ट ठरवीत राज्यात जिल्हा परिषदेने प्रथम क्रमांक मिळविला. त्याचबरोबर केंद्राच्या पंचायत राज मंत्रालयाच्या राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण योजनेंतर्गत ३० लाखांचे बक्षीस मिळविले. राज्य आणि केंद्र पातळीवर अव्वल ठरल्याने जिल्हा परिषदेचे उपक्रम पाहण्यासाठी राज्यातून अधिकारी, पदाधिकारी येत आहेत. जिल्हा परिषदेने निर्मल भारत अभियानात पहिल्यापासून देशात घेतलेली आघाडी आजही कायम ठेवली आहे. सहा तालुके पूर्णपणे निर्मल झालेला राज्यातील कोल्हापूर हा एकमेव जिल्हा आहे. जिल्ह्यातील तब्बल १००२ गावांनी निर्मलग्राम पुरस्कार मिळविले आहेत. आता जिल्हा देशात निर्मल करण्यासाठी व्यापक नियोजन केले आहे.आरोग्य विभागाने गेल्या वर्षापासून लोकसहभागातून कायापालट हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला. या उपक्रमातून देणगी व वस्तू स्वरूपात ९१ लाख ३८ हजारांची कामे प्राथमिक आरोग्य केंद्रांत झाली आहेत. परिणामी, आरोग्य केंद्रांचा चेहरामोहरा बदलला. दर्जेदार सेवा-सुविधांमुळे आरोग्य केंद्रांत उपचार घेण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. राज्यस्तरावर याची नोंद घेण्यात आली. राज्यात सर्व जिल्ह्यांत कायापालट योजना राबविण्यासाठी शासनाने ३ सप्टेंबर २०१४ रोजी शासन निर्णय काढला. बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी ‘चिरायू योजना’ व्यापकपणे राबविली. ग्रामीण भागातील खेळाडंूना दर्जेदार शिक्षण व खेळाचे प्रशिक्षण मोफत उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील एकमेव पथदर्शी अशी ‘राजर्षी शाहू छत्रपती निवासी क्रीडा प्रशाला’ सुरू केली. राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत ‘कौशल्य विकास व रोजगारनिर्मिती’मध्ये ‘एक कुटुंब, एक नोकरी’ हा उपक्रम राबवून गेल्या वर्षी राज्यात पहिला क्रमांक मिळविला.बायोगॅस बांधण्यात विक्रमराष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत २०१३-१४ मध्ये राज्यात सर्वाधिक बायोगॅस सयंत्र उभारणी करण्याचा विक्रमही जिल्हा परिषदेने केला आहे. बायोगॅस उभारणीत राज्याच्या एकूण उद्दिष्टाच्या टक्केवारीत २७ टक्के हिस्सा कोल्हापूर जिल्ह्याचा आहे.