शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
3
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
4
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
5
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
6
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
8
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
9
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
10
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
11
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
12
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
13
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
14
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
15
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
16
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
17
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
18
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
19
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
20
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  

कोल्हापूर हाऊसफुल्ल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 00:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : दीपावलीनिमित्त गेले चार दिवस शासकीय कार्यालयांसह खासगी आस्थापनांनाही राज्यभरात सुट्या आहेत; त्यामुळे करवीरनिवासिनी अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी शहरात लाखो भाविक दाखल झाले आहेत. भाविकांच्या झुंडींमुळे शहर जणू पर्यटकांचे रम्यस्थळ झाल्याचे चित्र होते.गुरुवार (दि. १९) पासून दीपावलीनिमित्त असलेल्या सुट्टीचा लाभ घेत राज्यासह परराज्यांतून करवीरनिवासिनी अंबाबाई देवीच्या दर्शनासह पन्हाळगड, ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : दीपावलीनिमित्त गेले चार दिवस शासकीय कार्यालयांसह खासगी आस्थापनांनाही राज्यभरात सुट्या आहेत; त्यामुळे करवीरनिवासिनी अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी शहरात लाखो भाविक दाखल झाले आहेत. भाविकांच्या झुंडींमुळे शहर जणू पर्यटकांचे रम्यस्थळ झाल्याचे चित्र होते.गुरुवार (दि. १९) पासून दीपावलीनिमित्त असलेल्या सुट्टीचा लाभ घेत राज्यासह परराज्यांतून करवीरनिवासिनी अंबाबाई देवीच्या दर्शनासह पन्हाळगड, जोतिबा, नृसिंहवाडी, आदी ठिकाणी देवदर्शनासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक, भाविक दाखल झाले आहेत. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून भवानी मंडप, भाऊसिंगजी रोड, महाद्वार रोड, जोतिबा रोड, ताराबाई रोड, शिवाजी चौक, आदी परिसरात खाद्यपदार्थांसह विविध वस्तूंच्या खरेदीसाठी झुंडीच्या झुंडी फिरताना दिसत होत्या. वाहतूक व्यवस्थेसाठी शहर वाहतूक शाखेनेही कंबर कसली होती. याकरिता मेन राजाराम हायस्कूल, बिंदू चौक, शिवाजी स्टेडियम, सरस्वती टॉकीज, आदी ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. ही पार्किंगची ठिकाणेही दिवसभर फुल्ल होती. त्यामुळे काही ठिकाणी वाहने बाहेर काढताना वाहतुकीच्या कोंडीचे चित्र सर्वत्र दिसत होते. गेल्या चार दिवसांत सरलष्कर भवन मार्गाद्वारे लाखो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. गेल्या दोन दिवसांत भाविकांनी पहाटे पाच वाजल्यापासूनच दर्शनरांगा लावल्या होत्या; तर रांगा तुडुंब झाल्याचे चित्र दिवसभर पाहण्यास मिळत होते. रविवार सुटीचा शेवटचा दिवस असल्याने अनेक भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. अनेक भाविकांनी दर्शनरांगेतून लागणारा वेळ लक्षात घेता, केवळ मुखदर्शन घेतले. असेच चित्र श्रीक्षेत्र ज्योतिर्लिंग अर्थात जोतिबा डोंगरावर व नृसिंहवाडी येथे नृसिंह दत्तदर्शनासाठी लागले होते.राज्यासह परराज्यांतून आलेल्या भाविकांमुळे अंबाबाई मंदिर परिसरासह महाद्वार रोड, जोतिबा रोड, ताराबाई रोड, भाऊसिंगजी रोड, आदी परिसराला शनिवार, रविवार असे दोन दिवस जत्रेचे स्वरूप आले होते. पर्यटक भाविकांच्या मोठ्या संख्येमुळे परिसरातील धर्मशाळा, यात्री निवास, आदी ठिकाणे फुल्ल असल्याचे बोर्ड लागले होते. खाद्यपदार्थांच्या गाड्यांसह हॉटेलमध्ये जेवण व खरेदीसाठी भाविकांना प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र होते.