शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर हाऊसफुल्ल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 00:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : दीपावलीनिमित्त गेले चार दिवस शासकीय कार्यालयांसह खासगी आस्थापनांनाही राज्यभरात सुट्या आहेत; त्यामुळे करवीरनिवासिनी अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी शहरात लाखो भाविक दाखल झाले आहेत. भाविकांच्या झुंडींमुळे शहर जणू पर्यटकांचे रम्यस्थळ झाल्याचे चित्र होते.गुरुवार (दि. १९) पासून दीपावलीनिमित्त असलेल्या सुट्टीचा लाभ घेत राज्यासह परराज्यांतून करवीरनिवासिनी अंबाबाई देवीच्या दर्शनासह पन्हाळगड, ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : दीपावलीनिमित्त गेले चार दिवस शासकीय कार्यालयांसह खासगी आस्थापनांनाही राज्यभरात सुट्या आहेत; त्यामुळे करवीरनिवासिनी अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी शहरात लाखो भाविक दाखल झाले आहेत. भाविकांच्या झुंडींमुळे शहर जणू पर्यटकांचे रम्यस्थळ झाल्याचे चित्र होते.गुरुवार (दि. १९) पासून दीपावलीनिमित्त असलेल्या सुट्टीचा लाभ घेत राज्यासह परराज्यांतून करवीरनिवासिनी अंबाबाई देवीच्या दर्शनासह पन्हाळगड, जोतिबा, नृसिंहवाडी, आदी ठिकाणी देवदर्शनासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक, भाविक दाखल झाले आहेत. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून भवानी मंडप, भाऊसिंगजी रोड, महाद्वार रोड, जोतिबा रोड, ताराबाई रोड, शिवाजी चौक, आदी परिसरात खाद्यपदार्थांसह विविध वस्तूंच्या खरेदीसाठी झुंडीच्या झुंडी फिरताना दिसत होत्या. वाहतूक व्यवस्थेसाठी शहर वाहतूक शाखेनेही कंबर कसली होती. याकरिता मेन राजाराम हायस्कूल, बिंदू चौक, शिवाजी स्टेडियम, सरस्वती टॉकीज, आदी ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. ही पार्किंगची ठिकाणेही दिवसभर फुल्ल होती. त्यामुळे काही ठिकाणी वाहने बाहेर काढताना वाहतुकीच्या कोंडीचे चित्र सर्वत्र दिसत होते. गेल्या चार दिवसांत सरलष्कर भवन मार्गाद्वारे लाखो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. गेल्या दोन दिवसांत भाविकांनी पहाटे पाच वाजल्यापासूनच दर्शनरांगा लावल्या होत्या; तर रांगा तुडुंब झाल्याचे चित्र दिवसभर पाहण्यास मिळत होते. रविवार सुटीचा शेवटचा दिवस असल्याने अनेक भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. अनेक भाविकांनी दर्शनरांगेतून लागणारा वेळ लक्षात घेता, केवळ मुखदर्शन घेतले. असेच चित्र श्रीक्षेत्र ज्योतिर्लिंग अर्थात जोतिबा डोंगरावर व नृसिंहवाडी येथे नृसिंह दत्तदर्शनासाठी लागले होते.राज्यासह परराज्यांतून आलेल्या भाविकांमुळे अंबाबाई मंदिर परिसरासह महाद्वार रोड, जोतिबा रोड, ताराबाई रोड, भाऊसिंगजी रोड, आदी परिसराला शनिवार, रविवार असे दोन दिवस जत्रेचे स्वरूप आले होते. पर्यटक भाविकांच्या मोठ्या संख्येमुळे परिसरातील धर्मशाळा, यात्री निवास, आदी ठिकाणे फुल्ल असल्याचे बोर्ड लागले होते. खाद्यपदार्थांच्या गाड्यांसह हॉटेलमध्ये जेवण व खरेदीसाठी भाविकांना प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र होते.