शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

‘राजीव गांधी आरोग्य’मध्ये कोल्हापूर चौथ्या स्थानी

By admin | Updated: November 27, 2015 01:04 IST

जिल्ह्यात ३० हजार रुग्णांना लाभ : राज्य सरकारने ८६ कोटी ४५ लाख खर्च केले

गणेश शिंदे -- कोल्हापूर -सर्वसामान्यांना आरोग्य सेवा मिळावी या उद्देशाने दोन वर्षांपूर्वी तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारने सुरू केलेल्या ‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य’ योजनेत राज्यात कोल्हापूर जिल्हा चौथ्या क्रमांकावर असल्याचे आशादायक चित्र आहे. जिल्ह्यात दोन वर्षांत सुमारे ३० हजार ३२८ जणांनी याचा लाभ घेतला, तर सुमारे ८६ कोटी ४५ लाख रुपये राज्य सरकारने यावर खर्च केला आहे. या योजनेत न बसलेल्या दुर्धर आजारांवरील उपचारांकरिता येणाऱ्या खर्चासाठी ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी’ हा कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षामार्फत रुग्णांना एक लाखापासून ते दोन लाखांपर्यंत मदत मिळणार आहे. या योजनेमुळे सर्वसामान्यांना एक प्रकारे दिलासा मिळाला आहे.राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेत ९७१ आजारांचा समावेश आहे. दीड लाख रुपयांपर्यंतचा लाभ सर्वसामान्यांना या योजनेतून मिळतो. दोन वर्षांत कोल्हापूर जिल्ह्णात सुमारे ३० हजार ३२८ जणांनी लाभ घेतला, तर ८६ कोटी रुपये यावर खर्च केला. योजनेतील समाविष्ट रुग्णालयांना राज्य सरकारकडून ‘नॅशनल इन्श्युरन्स कॉर्पोरेशन’या विमा कंपनीकडून परतावा (रिटर्न) दिला जातो. जिल्ह्णात सध्या ३२ रुग्णालये या योजनेत समाविष्ट आहेत.दरम्यान, या योजनेमध्ये ९७१ आजार असले, तरी काही आजारांचा या योजनते समावेश नाही, अशा (राजीव गांधीमध्ये न बसणाऱ्या शस्त्रक्रिया) आजारांवर उपचारांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षातून मदत केली जाणार आहे. यामध्ये हृदयशस्त्रक्रिया, ट्रामा (रस्त्यावरील भीषण अपघात), मेंदूमधील रक्तस्त्राव, कर्करोग (सर्व आजार) या आजारांचा समावेश आहे. त्यासाठी त्याला एक लाखापेक्षा कमी उत्पन्नाचा दाखला लागणार आहे. मुंबई प्रथम; शेवट नंदूरबार राज्यात या योजनेमध्ये पहिला क्रमांक मुंबई जिल्हा, दुसरा अहमदनगर, तर तिसरा औरंगाबाद या जिल्ह्णांचा नंबर लागतो. त्या पाठोपाठ चौथा क्रमांक कोल्हापूर जिल्ह्णाचा लागला असून, पुणे जिल्ह्णाचा पाचवा, तर नाशिक सहाव्या क्रमांकावर आहे.नंदूरबार जिल्ह्णाचा क्रमांक शेवट लागतो. या एका वर्षात मुंबईमध्ये २१ हजार ६०५ जणांनी लाभ घेतला. यासाठी ६९ कोटी १७ लाख ४७ हजार ६१० रुपये खर्च झाले आहेत.तर नंदुरबार जिल्ह्णात वर्षात केवळ ९० जणांनी लाभ घेतला. यासाठी सहा लाख ५१ हजार रुपये खर्च करण्यात आले.कोल्हापूर जिल्हा दृष्टिक्षेपात...वर्ष लाभ खर्चरुग्णालय परतावा२१ नोव्हेंबर २०१३ ते१२ हजार २५०३५ कोटीसर्व२० नोव्हेंबर २०१४ २१ नोव्हेंबर २०१४ ते १८ हजार ७८ ५१ कोटी सुमारे ४० कोटी रुपये २०नोव्हेंबर २०१५४५ लाख(आजअखेर)अशी असते प्रक्रिया...मुख्यमंत्री सहायता निधी कक्षामधून ज्यांना लाभ घ्यावयाचा असेल त्यांना राजीव गांधी योजनेतील समाविष्ठ असलेल्या संबंधित रुग्णालयांच्या डॉक्टरांचा दाखला द्यावा लागणार आहे. या दाखल्यामध्ये रुग्णाच्या खर्चाचा तपशील, त्याच्या बसत नसलेल्या आजाराचे नाव डॉक्टरला द्यावे लागणार आहे. त्यानंतर रुग्णाच्या नातेवाइकांनी हा दाखला घेऊन ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष ’या नावाने अर्ज तयार करावा व हा अर्ज जिल्हा समन्वयक यांच्याकडे शेरा मारून आणावा. या दाखल्यावर शेरा मारल्यानंतर नातेवाइकांनी हा अर्ज टपालाने पाठवावा, अथवा स्वहस्ते कक्षाकडे द्यावा. या कक्षातूनच संबंधित रुग्णाला ही मदत मिळणार आहे.