शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

कोल्हापुरात पाच रुपयांत पोटभर भाजी-चपातीचे जेवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 00:30 IST

समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूरमध्ये केवळ पाच रुपयांमध्ये भाजी-चपातीचे जेवण उपलब्ध करून देण्याचा निर्णय पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला आहे. एवढ्यावरच न थांबता शहरातील वयोवृद्ध दाम्पत्यांच्या घरी दोन्ही वेळचा जेवणाचा डबाही पोहोच करण्यात येणार आहे.पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गेल्या काही वर्षांमध्ये अनेक नवनवीन उपक्रम राबविले. त्यांनी रद्दी गोळा ...

समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूरमध्ये केवळ पाच रुपयांमध्ये भाजी-चपातीचे जेवण उपलब्ध करून देण्याचा निर्णय पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला आहे. एवढ्यावरच न थांबता शहरातील वयोवृद्ध दाम्पत्यांच्या घरी दोन्ही वेळचा जेवणाचा डबाही पोहोच करण्यात येणार आहे.पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गेल्या काही वर्षांमध्ये अनेक नवनवीन उपक्रम राबविले. त्यांनी रद्दी गोळा करून त्यामध्ये स्वत:चे पैसे घालून त्यातून समाजोपयोगी उपक्रम राबविले. शहरामध्ये संस्कार केंद्रे सुरू करण्यापासून ते कार्यकर्त्याला सॅँडविचचा स्टॉल सुरू करून देण्यापर्यंत अनेक ठिकाणी त्यांनी पुढाकार घेतला.याचाच पुढील टप्पा म्हणजे आता त्यांनी भुकेशी संबंधित तीन उपक्रम आखले आहेत. कोल्हापूर शहरामध्ये अनेक घरांमध्ये केवळ वयोवृद्ध दाम्पत्ये राहतात. एकीकडे औषधे सुरू असतात; परंतु जेवणाचा कंटाळा केला जातो. अनेकदा शिळे खाल्ले जाते. अनेकांना मुले आहेत; पण ती नोकरीनिमित्त बाहेर आहेत. परिस्थितीअभावीही अनेकांना पोटभर चांगले अन्न मिळत नाही. अशा वयोवृद्ध दाम्पत्यांना दोन्ही वेळचे जेवण मोफत घरपोहोच करण्यात येणार आहे.दुसऱ्या योजनेमध्ये केवळ पाच रुपयांमध्ये भाजी-चपातीचे जेवण उपलब्ध करून दिले जाणार आहे. कॉलेजला जाणाºया युवक-युवतींपासून ते लक्ष्मीपुरीमध्ये काम करणाºया कामगारांपर्यंत अनेकांना सकाळी १५ रुपयांचा वडापावचा नाश्ताही परवडत नाही. शहर आणि ग्रामीण भागांतील अनेक मुलांना सकाळी लवकर बाहेर पडावे लागते. अशा सर्वांसाठी एका वेळच्या नाश्त्यासाठीही पंचवीस-तीस रुपये खर्च करणे परवडणारे नसते;म्हणूनच अशा सर्वांसाठी ही योजना सुरू करण्यात येणार आहे.तिसºया योजनेत कोल्हापूरशहरातील ज्या रुग्णालयातील नातेवाइकांकडून मागणी येईल, त्यांना त्या रुग्णालयात जेवण पोहोच केले जाणार आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून हे काम करण्यात येणार आहे.काही वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला तुम्ही ज्या गावात राहता त्या गावातील एकही माणूस उपाशी राहता कामा नये, अशी सूचना केली आणि त्यासाठी मी काम करण्याचा निर्णय घेतला. कोल्हापूरमध्ये अतिशय माफक दरामध्ये भाजी-चपातीचे जेवण, वृद्ध दाम्पत्यांना मोफत डबे आणि मागणीप्रमाणे रुग्णालयातील नातेवाइकांसाठी जेवण पुरविले जाणार आहे. यासाठी ‘स्वयंसिद्धा’च्या कांचनताई परुळेकर यांचे सहकार्य मी घेणार आहे. पुढील महिन्यात या उपक्रमाची सुरुवात व्हावी, यासाठी मी प्रयत्नशील आहे.- चंद्रकांत पाटील, पालकमंत्री, कोल्हापूर