शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कोल्हापुरात पाच रुपयांत पोटभर भाजी-चपातीचे जेवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 00:30 IST

समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूरमध्ये केवळ पाच रुपयांमध्ये भाजी-चपातीचे जेवण उपलब्ध करून देण्याचा निर्णय पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला आहे. एवढ्यावरच न थांबता शहरातील वयोवृद्ध दाम्पत्यांच्या घरी दोन्ही वेळचा जेवणाचा डबाही पोहोच करण्यात येणार आहे.पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गेल्या काही वर्षांमध्ये अनेक नवनवीन उपक्रम राबविले. त्यांनी रद्दी गोळा ...

समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूरमध्ये केवळ पाच रुपयांमध्ये भाजी-चपातीचे जेवण उपलब्ध करून देण्याचा निर्णय पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला आहे. एवढ्यावरच न थांबता शहरातील वयोवृद्ध दाम्पत्यांच्या घरी दोन्ही वेळचा जेवणाचा डबाही पोहोच करण्यात येणार आहे.पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गेल्या काही वर्षांमध्ये अनेक नवनवीन उपक्रम राबविले. त्यांनी रद्दी गोळा करून त्यामध्ये स्वत:चे पैसे घालून त्यातून समाजोपयोगी उपक्रम राबविले. शहरामध्ये संस्कार केंद्रे सुरू करण्यापासून ते कार्यकर्त्याला सॅँडविचचा स्टॉल सुरू करून देण्यापर्यंत अनेक ठिकाणी त्यांनी पुढाकार घेतला.याचाच पुढील टप्पा म्हणजे आता त्यांनी भुकेशी संबंधित तीन उपक्रम आखले आहेत. कोल्हापूर शहरामध्ये अनेक घरांमध्ये केवळ वयोवृद्ध दाम्पत्ये राहतात. एकीकडे औषधे सुरू असतात; परंतु जेवणाचा कंटाळा केला जातो. अनेकदा शिळे खाल्ले जाते. अनेकांना मुले आहेत; पण ती नोकरीनिमित्त बाहेर आहेत. परिस्थितीअभावीही अनेकांना पोटभर चांगले अन्न मिळत नाही. अशा वयोवृद्ध दाम्पत्यांना दोन्ही वेळचे जेवण मोफत घरपोहोच करण्यात येणार आहे.दुसऱ्या योजनेमध्ये केवळ पाच रुपयांमध्ये भाजी-चपातीचे जेवण उपलब्ध करून दिले जाणार आहे. कॉलेजला जाणाºया युवक-युवतींपासून ते लक्ष्मीपुरीमध्ये काम करणाºया कामगारांपर्यंत अनेकांना सकाळी १५ रुपयांचा वडापावचा नाश्ताही परवडत नाही. शहर आणि ग्रामीण भागांतील अनेक मुलांना सकाळी लवकर बाहेर पडावे लागते. अशा सर्वांसाठी एका वेळच्या नाश्त्यासाठीही पंचवीस-तीस रुपये खर्च करणे परवडणारे नसते;म्हणूनच अशा सर्वांसाठी ही योजना सुरू करण्यात येणार आहे.तिसºया योजनेत कोल्हापूरशहरातील ज्या रुग्णालयातील नातेवाइकांकडून मागणी येईल, त्यांना त्या रुग्णालयात जेवण पोहोच केले जाणार आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून हे काम करण्यात येणार आहे.काही वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला तुम्ही ज्या गावात राहता त्या गावातील एकही माणूस उपाशी राहता कामा नये, अशी सूचना केली आणि त्यासाठी मी काम करण्याचा निर्णय घेतला. कोल्हापूरमध्ये अतिशय माफक दरामध्ये भाजी-चपातीचे जेवण, वृद्ध दाम्पत्यांना मोफत डबे आणि मागणीप्रमाणे रुग्णालयातील नातेवाइकांसाठी जेवण पुरविले जाणार आहे. यासाठी ‘स्वयंसिद्धा’च्या कांचनताई परुळेकर यांचे सहकार्य मी घेणार आहे. पुढील महिन्यात या उपक्रमाची सुरुवात व्हावी, यासाठी मी प्रयत्नशील आहे.- चंद्रकांत पाटील, पालकमंत्री, कोल्हापूर