शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

यशवंतराव चव्हाण यांचा पुतळा बसवणारी कोल्हापूर ही राज्यातील पहिलीच जिल्हा परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:57 IST

कोल्हापूर : त्रिस्तरीय पंचायत राजव्यवस्थेचा पाया घालणारे राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा रविवारी जिल्हा परिषदेच्या दारात पुतळा स्थानापन्न ...

कोल्हापूर : त्रिस्तरीय पंचायत राजव्यवस्थेचा पाया घालणारे राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा रविवारी जिल्हा परिषदेच्या दारात पुतळा स्थानापन्न झाला आणि कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. पंचायत राज रचनेतील सर्वोच्च स्थानावर असलेल्या जिल्हा परिषदेच्या आवारात पुतळा बसवणारी कोल्हापूर ही राज्यातील एकमेव जिल्हा परिषद ठरली आहे. हा पुतळा देशातील चौथ्या क्रमांकाचा पुतळा ठरला आहे.

राज्याचे पहिले मुख्यमंत्री व देशाचे उपपंतप्रधानपद, संरक्षण मंत्रीपद भूषवलेले यशवंतराव चव्हाण यांनी राज्याला आणि देशाला पंचायत राजव्यवस्था दिली. देशातील इतर राज्यांनी द्विस्तरीय रचना स्वीकारली; पण महाराष्ट्राने मात्र जाणीवपूर्वक जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, अशी उतरंड असणारी त्रिस्तरीय रचना लागू केली. स्थानिक पातळीवर नेतृत्व विकसित व्हावे, कार्यकर्त्यांची सोय व्हावी, जनतेशी सुसंवाद राहावा, या उदात्त हेतूने या पंचायत राजव्यवस्थेला बळ दिले गेले. त्याचे परिणामही चांगले दिसले. येथून अनेक जण आमदार, खासदार, मंत्री झाले. राज्य आणि देशपातळीवरील नेता घडवणाऱ्या राज्यातील ३२ पैकी एकाही जिल्हा परिषदेसमोर यशवंतरावांचा पुतळा नसणे ही बाब खटकणारी होती. यातून कोल्हापुरात माजी कृषी राज्यमंत्री श्रीपतराव बोंद्रे यांनी १९८६ साली यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने प्रतिष्ठान स्थापन केले. माजी नगराध्यक्ष एम.के. जाधव, माजी महापौर बळीराम पोवार, माजी नगराध्यक्ष के.बी. जगदाळे, मराठा बँकेचे वसंतराव मोहिते, जगन्नाथ पोवार, विजयसिंह पाटील, किसनराव कल्याणकर, संभाजीराव पाटील, जयकुमार शिंदे यांना प्रतिष्ठानच्या समितीत घेतले. यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याचा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी विविध उपक्रम घेणे हा प्रतिष्ठानचा उद्देश होता. कालौघात हे प्रतिष्ठान विस्मृतीत गेले. २०१८ मध्ये प्रतिष्ठानने जिल्हा परिषदेच्या आवारात यशवंतरावांचा पुतळा बसवण्यात येईल का याबाबत चाचपणी सुरू केली. प्रतिष्ठानच्या खात्यावर १९८६ मध्ये २५ हजार रुपये ठेवले होते. व्याजासह ती रक्कम २०१८ मध्ये ४ लाख ५० इतकी झाली. एवढ्या रकमेत पुतळ्याचे काम होऊ शकत नसल्याने यशवंतराव चव्हाण पुतळा समिती स्थापन करण्यात आली. कोल्हापुरातील उद्योगपती व्ही.बी. पाटील यांना कार्याध्यक्ष केले गेले. त्यांनी स्वत:चे ७ लाख लाख ५० हजार दिले. यानंतर तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष शौमिका महाडिक यांची भेट घेऊन पुतळा बसवण्याबाबत चर्चा होऊन सर्वसाधारण सभेत ठरावही झाला. जिल्हा परिषदेतील ठेकेदारांनीही पुतळा बसवण्यात पुढाकार घेतला.

चबुतरा तयार झाला, सप्टेंबर २० मध्येच पुतळाही तयार झाला, १२ मार्चला अनावरण करण्याचेही निश्चित झाले; पण लॉकडाऊनमुळे सर्वच काम थांबले. आता येत्या २२ जानेवारीला शरद पवार यांच्या हस्ते राज्यातील या एकमेव पुतळ्याचे अनावरण होत आहे.

चौकट ०१

पुतळा समितीचे योगदान

पुतळा समितीत अशोक पोवार, माणिक मंडलिक, रमेश मोरे यांचा सदस्य म्हणून समावेश केला गेला. यांनी पुतळ्याची सरकारकडून परवानगी मिळवण्याची किचकट प्रक्रिया तब्बल सहा महिन्यांच्या पाठपुराव्यानंतर पूर्ण केली.

चौकट ०२

देशातील चौथ्या क्रमांकाचा पुतळा

दिल्लीत संसद भवन परिसर, कराडमध्ये कराड अर्बन बँक आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर यशवंतराव चव्हाण यांचा पुतळा आहे. कोल्हापुरातील हा पुतळा देशातील चौथ्या क्रमांकाचा आहे.

चौकट ०३

कोल्हापुरातच निर्मिती

पुतळा कोल्हापुरात तयार झाला आहे. बापट कॅम्प येथील कारागीर संजय तडसकर यांनी यशवंतराव चव्हाण ब्रँझमध्ये अगदी हुबेहूब साकारले आहेत. निर्मितीचे काम ६ महिने चालले होते. १२ लाख रुपये खर्च आला आहे. ९ फूट उंची आहे.

(फोटो: १००१२०२१-कोल-झेडपी)

फोटो ओळ : यशवंतराव चव्हाण यांचा पूर्णाकृती पुतळा रविवारी कोल्हापुरात जिल्हा परिषदेच्या प्रांगणात स्थानापन्न झाला.