शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
2
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
3
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
4
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
5
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
6
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
7
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
8
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
9
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
10
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
11
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
12
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
13
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
14
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
15
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
16
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
17
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
18
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
19
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
20
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”

यशवंतराव चव्हाण यांचा पुतळा बसवणारी कोल्हापूर ही राज्यातील पहिलीच जिल्हा परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:57 IST

कोल्हापूर : त्रिस्तरीय पंचायत राजव्यवस्थेचा पाया घालणारे राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा रविवारी जिल्हा परिषदेच्या दारात पुतळा स्थानापन्न ...

कोल्हापूर : त्रिस्तरीय पंचायत राजव्यवस्थेचा पाया घालणारे राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा रविवारी जिल्हा परिषदेच्या दारात पुतळा स्थानापन्न झाला आणि कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. पंचायत राज रचनेतील सर्वोच्च स्थानावर असलेल्या जिल्हा परिषदेच्या आवारात पुतळा बसवणारी कोल्हापूर ही राज्यातील एकमेव जिल्हा परिषद ठरली आहे. हा पुतळा देशातील चौथ्या क्रमांकाचा पुतळा ठरला आहे.

राज्याचे पहिले मुख्यमंत्री व देशाचे उपपंतप्रधानपद, संरक्षण मंत्रीपद भूषवलेले यशवंतराव चव्हाण यांनी राज्याला आणि देशाला पंचायत राजव्यवस्था दिली. देशातील इतर राज्यांनी द्विस्तरीय रचना स्वीकारली; पण महाराष्ट्राने मात्र जाणीवपूर्वक जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, अशी उतरंड असणारी त्रिस्तरीय रचना लागू केली. स्थानिक पातळीवर नेतृत्व विकसित व्हावे, कार्यकर्त्यांची सोय व्हावी, जनतेशी सुसंवाद राहावा, या उदात्त हेतूने या पंचायत राजव्यवस्थेला बळ दिले गेले. त्याचे परिणामही चांगले दिसले. येथून अनेक जण आमदार, खासदार, मंत्री झाले. राज्य आणि देशपातळीवरील नेता घडवणाऱ्या राज्यातील ३२ पैकी एकाही जिल्हा परिषदेसमोर यशवंतरावांचा पुतळा नसणे ही बाब खटकणारी होती. यातून कोल्हापुरात माजी कृषी राज्यमंत्री श्रीपतराव बोंद्रे यांनी १९८६ साली यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने प्रतिष्ठान स्थापन केले. माजी नगराध्यक्ष एम.के. जाधव, माजी महापौर बळीराम पोवार, माजी नगराध्यक्ष के.बी. जगदाळे, मराठा बँकेचे वसंतराव मोहिते, जगन्नाथ पोवार, विजयसिंह पाटील, किसनराव कल्याणकर, संभाजीराव पाटील, जयकुमार शिंदे यांना प्रतिष्ठानच्या समितीत घेतले. यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याचा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी विविध उपक्रम घेणे हा प्रतिष्ठानचा उद्देश होता. कालौघात हे प्रतिष्ठान विस्मृतीत गेले. २०१८ मध्ये प्रतिष्ठानने जिल्हा परिषदेच्या आवारात यशवंतरावांचा पुतळा बसवण्यात येईल का याबाबत चाचपणी सुरू केली. प्रतिष्ठानच्या खात्यावर १९८६ मध्ये २५ हजार रुपये ठेवले होते. व्याजासह ती रक्कम २०१८ मध्ये ४ लाख ५० इतकी झाली. एवढ्या रकमेत पुतळ्याचे काम होऊ शकत नसल्याने यशवंतराव चव्हाण पुतळा समिती स्थापन करण्यात आली. कोल्हापुरातील उद्योगपती व्ही.बी. पाटील यांना कार्याध्यक्ष केले गेले. त्यांनी स्वत:चे ७ लाख लाख ५० हजार दिले. यानंतर तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष शौमिका महाडिक यांची भेट घेऊन पुतळा बसवण्याबाबत चर्चा होऊन सर्वसाधारण सभेत ठरावही झाला. जिल्हा परिषदेतील ठेकेदारांनीही पुतळा बसवण्यात पुढाकार घेतला.

चबुतरा तयार झाला, सप्टेंबर २० मध्येच पुतळाही तयार झाला, १२ मार्चला अनावरण करण्याचेही निश्चित झाले; पण लॉकडाऊनमुळे सर्वच काम थांबले. आता येत्या २२ जानेवारीला शरद पवार यांच्या हस्ते राज्यातील या एकमेव पुतळ्याचे अनावरण होत आहे.

चौकट ०१

पुतळा समितीचे योगदान

पुतळा समितीत अशोक पोवार, माणिक मंडलिक, रमेश मोरे यांचा सदस्य म्हणून समावेश केला गेला. यांनी पुतळ्याची सरकारकडून परवानगी मिळवण्याची किचकट प्रक्रिया तब्बल सहा महिन्यांच्या पाठपुराव्यानंतर पूर्ण केली.

चौकट ०२

देशातील चौथ्या क्रमांकाचा पुतळा

दिल्लीत संसद भवन परिसर, कराडमध्ये कराड अर्बन बँक आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर यशवंतराव चव्हाण यांचा पुतळा आहे. कोल्हापुरातील हा पुतळा देशातील चौथ्या क्रमांकाचा आहे.

चौकट ०३

कोल्हापुरातच निर्मिती

पुतळा कोल्हापुरात तयार झाला आहे. बापट कॅम्प येथील कारागीर संजय तडसकर यांनी यशवंतराव चव्हाण ब्रँझमध्ये अगदी हुबेहूब साकारले आहेत. निर्मितीचे काम ६ महिने चालले होते. १२ लाख रुपये खर्च आला आहे. ९ फूट उंची आहे.

(फोटो: १००१२०२१-कोल-झेडपी)

फोटो ओळ : यशवंतराव चव्हाण यांचा पूर्णाकृती पुतळा रविवारी कोल्हापुरात जिल्हा परिषदेच्या प्रांगणात स्थानापन्न झाला.