शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
2
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
3
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
4
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
5
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
6
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
7
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
8
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
9
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
10
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
11
पंडित नेहरुंच्या शब्दांनी भाषणाची सुरुवात; न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम महापौर ममदानींचा व्हिडिओ व्हायरल...
12
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं आधीच दिलाय मोठा इशारा
13
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
14
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
15
"RJD, काँग्रेसने बिहारला गुन्हेगारी, जातीय हिंसाचाराची राजधानी बनवलं", योगींचा जोरदार हल्लाबोल
16
बॉलिवूड अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीला संशय येताच मागे लावला डिटेक्टिव्ह अन् मग...
17
समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’
18
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
19
Banganga Aarti: बाणगंगा महाआरतीसाठी नियमावली कठोर, 'क्यूआर कोड'सह पूर्व-नोंदणी अनिवार्य!

‘स्वच्छता दर्पण’मध्ये कोल्हापूर देशात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ‘स्वच्छ भारत’ मिशन अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या ‘स्वच्छता दर्पण’ मोहिमेत देशातील ४७ जिल्हे प्रथम क्रमांकावर आहेत. यामध्ये महाराष्टÑातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग व वर्धा या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. येत्या२ आॅक्टोबरला राष्ट्रीय स्तरावर होणाºया कार्यक्रमात या जिल्ह्यांंना ‘स्वच्छता दर्पण’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.२ आॅक्टोबर २०१४ ला ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ‘स्वच्छ भारत’ मिशन अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या ‘स्वच्छता दर्पण’ मोहिमेत देशातील ४७ जिल्हे प्रथम क्रमांकावर आहेत. यामध्ये महाराष्टÑातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग व वर्धा या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. येत्या२ आॅक्टोबरला राष्ट्रीय स्तरावर होणाºया कार्यक्रमात या जिल्ह्यांंना ‘स्वच्छता दर्पण’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.२ आॅक्टोबर २०१४ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत मोहिमेची घोषणा केली होती. या मोहिमेला येत्या सोमवारी तीन वर्षे पूर्ण होत आहेत. या तीन वर्षांत देशातील पाच राज्ये, २०३ जिल्हे आणि २.४८ लाख खेडी हागणदारीमुक्त घोषित झाली आहेत. या काळात ४ कोटी ९३ लाख वैयक्तिक शौचालये, तर २ लाख ७१ हजार स्वच्छतागृहे बांधण्यात आली आहेत. याच मोहिमेअंतर्गत केंद्र सरकारच्या पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाने स्वच्छता दर्पण मोहीम सुरू केली. यामध्ये पुरस्कार देण्याची घोषणाही करण्यात आली होती. कामगिरी, सातत्य आणि पारदर्शकता या निकषांवर आधारित दिलेल्या गुणांकनानुसार देशातील ४७ जिल्हे ९० गुण मिळवून संयुक्तरित्या पहिल्या क्रमांकावर आहेत. यामध्ये महाराष्टÑातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आणि वर्धा हे पाच जिल्हे आहेत.या मोहिमेअंतर्गत दर तीन महिन्यांनी गुणांकन जाहीर केले जाणार आहे आणि प्रथम येणाºया जिल्ह्यांना स्वच्छता दर्पण पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. याअंतर्गत २५ सप्टेंबरपर्यंत झालेल्या कामगिरीवर आधारीत पहिला पुरस्कार वितरण सोहळा नवी दिल्लीत येत्या गांधी जयंतीदिनी म्हणजेच दोन आॅक्टोबरला होणार आहे.----कोल्हापूर जिल्ह्याला मिळालेले गुणकोल्हापूर जिल्ह्याला कामगिरीमध्ये ५० पैकी ५० गुण मिळाले आहेत. तसेच शाश्वतता या घटकासाठी २५ पैकी १५ गुण मिळाले आहेत; तसेच पारदर्शकतेसाठी २५ पैकी २५ गुण मिळाले आहेत.प्रथम स्थानावर येण्यासाठी जिल्हास्तरावर पाणी व स्वच्छता विभाग, तालुकास्तर गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत), गटसंसाधन केंद्रातील कर्मचारी आणि ग्रामसेवक आणि कर्मचाºयांनी मेहनत घेतली. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुषमा देसाई व तज्ज्ञ, सल्लागार यांनीही विशेष परिश्रम घेतले.