शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वच्छता दर्पण’मध्ये कोल्हापूर देशात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ‘स्वच्छ भारत’ मिशन अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या ‘स्वच्छता दर्पण’ मोहिमेत देशातील ४७ जिल्हे प्रथम क्रमांकावर आहेत. यामध्ये महाराष्टÑातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग व वर्धा या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. येत्या२ आॅक्टोबरला राष्ट्रीय स्तरावर होणाºया कार्यक्रमात या जिल्ह्यांंना ‘स्वच्छता दर्पण’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.२ आॅक्टोबर २०१४ ला ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ‘स्वच्छ भारत’ मिशन अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या ‘स्वच्छता दर्पण’ मोहिमेत देशातील ४७ जिल्हे प्रथम क्रमांकावर आहेत. यामध्ये महाराष्टÑातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग व वर्धा या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. येत्या२ आॅक्टोबरला राष्ट्रीय स्तरावर होणाºया कार्यक्रमात या जिल्ह्यांंना ‘स्वच्छता दर्पण’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.२ आॅक्टोबर २०१४ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत मोहिमेची घोषणा केली होती. या मोहिमेला येत्या सोमवारी तीन वर्षे पूर्ण होत आहेत. या तीन वर्षांत देशातील पाच राज्ये, २०३ जिल्हे आणि २.४८ लाख खेडी हागणदारीमुक्त घोषित झाली आहेत. या काळात ४ कोटी ९३ लाख वैयक्तिक शौचालये, तर २ लाख ७१ हजार स्वच्छतागृहे बांधण्यात आली आहेत. याच मोहिमेअंतर्गत केंद्र सरकारच्या पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाने स्वच्छता दर्पण मोहीम सुरू केली. यामध्ये पुरस्कार देण्याची घोषणाही करण्यात आली होती. कामगिरी, सातत्य आणि पारदर्शकता या निकषांवर आधारित दिलेल्या गुणांकनानुसार देशातील ४७ जिल्हे ९० गुण मिळवून संयुक्तरित्या पहिल्या क्रमांकावर आहेत. यामध्ये महाराष्टÑातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आणि वर्धा हे पाच जिल्हे आहेत.या मोहिमेअंतर्गत दर तीन महिन्यांनी गुणांकन जाहीर केले जाणार आहे आणि प्रथम येणाºया जिल्ह्यांना स्वच्छता दर्पण पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. याअंतर्गत २५ सप्टेंबरपर्यंत झालेल्या कामगिरीवर आधारीत पहिला पुरस्कार वितरण सोहळा नवी दिल्लीत येत्या गांधी जयंतीदिनी म्हणजेच दोन आॅक्टोबरला होणार आहे.----कोल्हापूर जिल्ह्याला मिळालेले गुणकोल्हापूर जिल्ह्याला कामगिरीमध्ये ५० पैकी ५० गुण मिळाले आहेत. तसेच शाश्वतता या घटकासाठी २५ पैकी १५ गुण मिळाले आहेत; तसेच पारदर्शकतेसाठी २५ पैकी २५ गुण मिळाले आहेत.प्रथम स्थानावर येण्यासाठी जिल्हास्तरावर पाणी व स्वच्छता विभाग, तालुकास्तर गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत), गटसंसाधन केंद्रातील कर्मचारी आणि ग्रामसेवक आणि कर्मचाºयांनी मेहनत घेतली. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुषमा देसाई व तज्ज्ञ, सल्लागार यांनीही विशेष परिश्रम घेतले.