शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

‘स्वच्छता दर्पण’मध्ये कोल्हापूर देशात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ‘स्वच्छ भारत’ मिशन अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या ‘स्वच्छता दर्पण’ मोहिमेत देशातील ४७ जिल्हे प्रथम क्रमांकावर आहेत. यामध्ये महाराष्टÑातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग व वर्धा या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. येत्या२ आॅक्टोबरला राष्ट्रीय स्तरावर होणाºया कार्यक्रमात या जिल्ह्यांंना ‘स्वच्छता दर्पण’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.२ आॅक्टोबर २०१४ ला ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ‘स्वच्छ भारत’ मिशन अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या ‘स्वच्छता दर्पण’ मोहिमेत देशातील ४७ जिल्हे प्रथम क्रमांकावर आहेत. यामध्ये महाराष्टÑातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग व वर्धा या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. येत्या२ आॅक्टोबरला राष्ट्रीय स्तरावर होणाºया कार्यक्रमात या जिल्ह्यांंना ‘स्वच्छता दर्पण’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.२ आॅक्टोबर २०१४ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत मोहिमेची घोषणा केली होती. या मोहिमेला येत्या सोमवारी तीन वर्षे पूर्ण होत आहेत. या तीन वर्षांत देशातील पाच राज्ये, २०३ जिल्हे आणि २.४८ लाख खेडी हागणदारीमुक्त घोषित झाली आहेत. या काळात ४ कोटी ९३ लाख वैयक्तिक शौचालये, तर २ लाख ७१ हजार स्वच्छतागृहे बांधण्यात आली आहेत. याच मोहिमेअंतर्गत केंद्र सरकारच्या पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाने स्वच्छता दर्पण मोहीम सुरू केली. यामध्ये पुरस्कार देण्याची घोषणाही करण्यात आली होती. कामगिरी, सातत्य आणि पारदर्शकता या निकषांवर आधारित दिलेल्या गुणांकनानुसार देशातील ४७ जिल्हे ९० गुण मिळवून संयुक्तरित्या पहिल्या क्रमांकावर आहेत. यामध्ये महाराष्टÑातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आणि वर्धा हे पाच जिल्हे आहेत.या मोहिमेअंतर्गत दर तीन महिन्यांनी गुणांकन जाहीर केले जाणार आहे आणि प्रथम येणाºया जिल्ह्यांना स्वच्छता दर्पण पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. याअंतर्गत २५ सप्टेंबरपर्यंत झालेल्या कामगिरीवर आधारीत पहिला पुरस्कार वितरण सोहळा नवी दिल्लीत येत्या गांधी जयंतीदिनी म्हणजेच दोन आॅक्टोबरला होणार आहे.----कोल्हापूर जिल्ह्याला मिळालेले गुणकोल्हापूर जिल्ह्याला कामगिरीमध्ये ५० पैकी ५० गुण मिळाले आहेत. तसेच शाश्वतता या घटकासाठी २५ पैकी १५ गुण मिळाले आहेत; तसेच पारदर्शकतेसाठी २५ पैकी २५ गुण मिळाले आहेत.प्रथम स्थानावर येण्यासाठी जिल्हास्तरावर पाणी व स्वच्छता विभाग, तालुकास्तर गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत), गटसंसाधन केंद्रातील कर्मचारी आणि ग्रामसेवक आणि कर्मचाºयांनी मेहनत घेतली. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुषमा देसाई व तज्ज्ञ, सल्लागार यांनीही विशेष परिश्रम घेतले.