शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
2
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
3
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
4
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
5
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
6
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
7
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
8
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
9
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
10
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत
11
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
12
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
13
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
14
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
15
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
16
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
17
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
18
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
19
दही की ताक... आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय? फायदे समजल्यावर व्हाल चकित
20
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!

‘स्वच्छता दर्पण’मध्ये कोल्हापूर देशात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ‘स्वच्छ भारत’ मिशन अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या ‘स्वच्छता दर्पण’ मोहिमेत देशातील ४७ जिल्हे प्रथम क्रमांकावर आहेत. यामध्ये महाराष्टÑातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग व वर्धा या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. येत्या२ आॅक्टोबरला राष्ट्रीय स्तरावर होणाºया कार्यक्रमात या जिल्ह्यांंना ‘स्वच्छता दर्पण’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.२ आॅक्टोबर २०१४ ला ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ‘स्वच्छ भारत’ मिशन अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या ‘स्वच्छता दर्पण’ मोहिमेत देशातील ४७ जिल्हे प्रथम क्रमांकावर आहेत. यामध्ये महाराष्टÑातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग व वर्धा या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. येत्या२ आॅक्टोबरला राष्ट्रीय स्तरावर होणाºया कार्यक्रमात या जिल्ह्यांंना ‘स्वच्छता दर्पण’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.२ आॅक्टोबर २०१४ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत मोहिमेची घोषणा केली होती. या मोहिमेला येत्या सोमवारी तीन वर्षे पूर्ण होत आहेत. या तीन वर्षांत देशातील पाच राज्ये, २०३ जिल्हे आणि २.४८ लाख खेडी हागणदारीमुक्त घोषित झाली आहेत. या काळात ४ कोटी ९३ लाख वैयक्तिक शौचालये, तर २ लाख ७१ हजार स्वच्छतागृहे बांधण्यात आली आहेत. याच मोहिमेअंतर्गत केंद्र सरकारच्या पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाने स्वच्छता दर्पण मोहीम सुरू केली. यामध्ये पुरस्कार देण्याची घोषणाही करण्यात आली होती. कामगिरी, सातत्य आणि पारदर्शकता या निकषांवर आधारित दिलेल्या गुणांकनानुसार देशातील ४७ जिल्हे ९० गुण मिळवून संयुक्तरित्या पहिल्या क्रमांकावर आहेत. यामध्ये महाराष्टÑातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आणि वर्धा हे पाच जिल्हे आहेत.या मोहिमेअंतर्गत दर तीन महिन्यांनी गुणांकन जाहीर केले जाणार आहे आणि प्रथम येणाºया जिल्ह्यांना स्वच्छता दर्पण पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. याअंतर्गत २५ सप्टेंबरपर्यंत झालेल्या कामगिरीवर आधारीत पहिला पुरस्कार वितरण सोहळा नवी दिल्लीत येत्या गांधी जयंतीदिनी म्हणजेच दोन आॅक्टोबरला होणार आहे.----कोल्हापूर जिल्ह्याला मिळालेले गुणकोल्हापूर जिल्ह्याला कामगिरीमध्ये ५० पैकी ५० गुण मिळाले आहेत. तसेच शाश्वतता या घटकासाठी २५ पैकी १५ गुण मिळाले आहेत; तसेच पारदर्शकतेसाठी २५ पैकी २५ गुण मिळाले आहेत.प्रथम स्थानावर येण्यासाठी जिल्हास्तरावर पाणी व स्वच्छता विभाग, तालुकास्तर गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत), गटसंसाधन केंद्रातील कर्मचारी आणि ग्रामसेवक आणि कर्मचाºयांनी मेहनत घेतली. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुषमा देसाई व तज्ज्ञ, सल्लागार यांनीही विशेष परिश्रम घेतले.