शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
3
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
4
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
5
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
6
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
7
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
8
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
9
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
10
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
11
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
12
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
13
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
14
फायद्याची गोष्ट! स्टील, अ‍ॅल्युमिनियम की लोखंड... स्वयंपाकासाठी कोणतं भांडं सर्वात बेस्ट?
15
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
16
"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक
17
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
18
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश
19
Navratri 2025: अष्टमी-नवमीला 'या' दिशेला दिवा लावा; अखंड दिवा लावण्याचे लाभ मिळतील 
20
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली

कोल्हापूर : ‘आयआरबी’वर गुन्हा दाखल

By admin | Updated: October 24, 2014 00:17 IST

‘एन. डी.’ यांचा दणका : रस्ता खचल्याप्रकरणी दोन तास ‘रास्ता रोको’; प्रशासनाचे नमते

कोल्हापूर : रस्ता खचल्याप्रकरणी सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीने ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली फुलेवाडी पेट्रोल पंपाच्या दारात आज, गुरुवारी तब्बल दोन तास रास्ता रोको केला. सुरुवातीस जुजबी उत्तरे देत, गुन्हा दाखल करण्यास नकार देणाऱ्या पोलीस प्रशासनास ‘वर्दीची शान राखा. या प्रत्येक मिनिटाचा जबाब द्यावा लागेल,’ असा दम प्रा. एन. डी. पाटील यांनी भरला. अखेर पोलिसांनी ‘एन. डी.’यांच्या दणक्यापुढे नमते घेत, ‘आयआरबी’वर महापालिकेच्या पत्राच्या आधारे गुन्हा नोंद केला. रंकाळ्याजवळील रस्त्यावरील पदपथ व चॅनेलचा मोठा भाग काल, बुधवारी शेतात कोसळला. खराब रस्त्याप्रकरणी आयआरबीवर गुन्हा नोंद करण्याची मागणी करीत कृती समितीने रास्ता रोको केले. कार्यकर्त्यांनी आयआरबीविरोधी घोषणा देत परिसर दणाणून सोडला. आमदार चंद्रदीप नरके, चंद्रकांत पाटील व अमल महाडिक यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा दिला. सकाळी साडेअकरापासून दीड वाजेपर्यंत प्रा. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते रस्त्यावर बसून होते. सुरुवातीस शहर पोलीस उपअधीक्षक भरतकुमार राणे यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढत आयआरबीवर गुन्हा नोंद करता येणार नाही, असे सांगितले. गुन्हा नोंदीस टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांवर ‘एन. डी.’ अक्षरश: कडाडले. ‘गुन्हा नोंद न करता आयआरबीची वकिली करण्यासाठीच जनतेचा पगार घेता काय? अंगावरील वर्दीची शान व मान राहील, असे काम करा. इतर गुन्ह्णांत प्रथम तपास करून गुन्हा नोंदविता काय? आॅनलाईन गुन्हा नोंदीची कशाला नाटके करता? आयआरबीवर गुन्हा नोंद केल्याशिवाय जाग्यावरून हलणार नाही.’ अशी गर्जना करीत एन. डी. पाटील यांनी केलेल्या हल्लाबोलमुळे हबकलेल्या राणे यांनी वरिष्ठांशी चर्चा करतो, असे सांगत माघार घेतली.यानंतर आंदोलन ठिकाणी आलेले अतिरिक्त पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी ‘एन. डी.’ यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. ‘आत्ताच कृती समितीचे व महापालिकेचे पत्र मिळाले असून गुन्हा नोंद करतो. आंदोलन मागे घ्यावे,’ अशी विनंती गोयल यांनी केली. ‘जुजबी उत्तरे देऊन दिशाभूल करू नका. कालच आम्ही पोलिसांना पत्र दिले आहे. खोटे बोलू नका. तत्काळ गुन्हा दाखल करून त्याची प्रत द्या.’ असे एन. डी. पाटील यांनी सुनावले. अखेर पोलिसांनी आयआरबी व एमएसआरडीसीवर खराब रस्त्यांमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून घेतला. यानंतरच दोन तासांचा तणाव निवळला. आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी नगरसेवक सत्यजित कदम, प्रा. जयंत पाटील, मुरलीधर जाधव, बाबा पार्टे, रमेश मोरे, अजित सासने, दीपाताई पाटील, वैशाली महाडिक, चारूलता चव्हाण, सतीशचंद्र कांबळे, भगवान काटे, प्रसाद पाटील, आदींसह कृ ती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)महापालिकेचे पत्रमहापालिकेने रस्त्याचे हस्तांतरण आयआरबीला के ले आहे. देखभाल व दुरुस्तीची सर्व जबाबदारी आयआरबीची आहे. रस्ते करून घेण्याची जबाबदारी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाची आहे. रस्ते मानवी जीवितास धोका निर्माण होईल, अशा पद्धतीने झाल्यास याबाबत सर्व जबाबदारी आयआरबी व महामंडळाची असेल, अशा आशयाचे पत्र महापालिकेने कृती समितीला दिले आहे. या आधारेच आयआरबी व महामंडळावर गुन्हा नोंद करण्याची मागणी करीत असल्याची माहिती अ‍ॅड. बाबा इंदुलकर व चंद्रकांत यादव यांनी दिली.आय.आर.बी.विरोधात २८३, ३३६ कलमांने गुन्हाकोल्हापुरातील रंकाळा ते फुलेवाडी पेट्रोलपंपाजवळचा रस्ता खचल्याने काल, बुधवारी याबाबत चंद्रकांत शंकरराव यादव (रा. १५०७, ए वॉर्ड, शिवाजी पेठ) यांनी जुना राजवाडा पोलिसांत तक्रार अर्ज दिला होता. त्यानुसार पोलिसांनी महापालिकेचे आयुक्त व विशेष सहायक सरकारी वकील, कोल्हापूर यांना लेखी पत्र देऊन त्यांचा अभिप्राय घेतला. त्यामध्ये या रस्त्याची देखभाल व दुरुस्तीची संपूर्ण जबाबदारी आय.आर.बी.ची असल्याचा अभिप्राय आयुक्तांनी आज, गुरुवारी दिला. त्यामुळे पोलिसांनी अर्जदार यांच्या चौकशीवरून आय.आर.बी. कंपनी, कोल्हापूर यांच्याविरोधात भारतीय दंडविधान संहिता कलम २८३ व ३३६ अनुसार गुन्हा दाखल केला.खचलेल्या रस्त्याची डागडुजीरंकाळा-फुलेवाडीदरम्यान पेट्रोल पंपासमोरील दिवाळीदिवशी बुधवारी पहाटे ‘आयआरबी’च्या खचलेल्या रस्त्याची आज, गुरुवारी आयआरबीने डागडुजी केली. रस्त्याच्या कडेला दोन फूट रूंद व १०० मीटर लांब पडलेली मोठी भेग खरमाती टाकून बुजविली आहे. जुजबी दुरुस्ती केल्याने या चरीत अवजड वाहन अडकून मोठा आपघात होण्याची भीती वाहनधारक व्यक्त करत आहेत. रस्त्याचा शेतात कोसळलेला पूर्ण भाग काढून दुरूस्त करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.टोल आंदोलकांना आमदारांची आश्वासनेचंद्रकांत पाटील - टोल हद्दपार करण्याची जबाबदारी भाजपचे सरकार पार पाडील.अमल महाडिक - टोल हद्दपार होईपर्यंत कृती समितीच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरूच राहील.चंद्रदीप नरके - यापुढेही टोलविरोधी लढ्यात अग्रभागी राहू. सभागृहात ताकदीने टोलचा प्रश्न मांडणार.