शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

कोल्हापूर-- कांदा दर पडल्याने शेतकरी आक्रमक

By admin | Updated: September 2, 2014 00:10 IST

बाजार समितीमधील सौदे पाडले बंद : व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांवर अरेरावी

कोल्हापूर : कांद्याचे दर पडल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आज, सोमवारी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमधील सौदे बंद पाडले. इतर मार्केटप्रमाणे दर देण्याची मागणी करीत भरपावसात सौदा मार्केटमध्येच शेतकऱ्यांनी ठिय्या मारला. सौदे बंद केल्यानंतर एका व्यापाऱ्याने शेतकऱ्यांना अरेरावीची भाषा वापरल्याने शेतकरी व व्यापारी यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. बाजार समितीत सध्या जुन्या-नव्या कांद्यांची आवक सुरू आहे. आज २३ गाड्यांची आवक झाली आहे. सकाळी अकरा वाजता कांदा सौदे सुरू झाले. अठरा रुपयांवर दर जात नसल्याचे लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांनी सौदे बंद पाडले. समितीचे सचिव संपतराव पाटील, सहायक सचिव मोहन सालपे यांनी शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; पण इतर मार्केटप्रमाणे दर मिळाला पाहिजे, या मागणीवर शेतकरी ठाम राहिले. नागपूर, भिवंडी मार्केटमध्ये २२ रुपये किलोने कांदा आहे, मग येथे कमी का? अशी विचारणा करत शुक्रवारी १४ रुपयांनी विकलेला कांद्याचा साडेसहा रुपये दर काढता ही मनमानी चालणार नाही, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला. ही बाजार समिती शेतकऱ्यांची की व्यापाऱ्यांची आहे, अशी विचारणा करीत एक व्यापारी शेतकऱ्यांना मार्केटच्या बाहेर जाण्यास सांगतो. ही मग्रूरी खपवून घेणार नाही. एका बाजूने दर पाडून शेतकऱ्यांना लुटायचे आणि दुसरीकडे त्यांच्यावरच अरेरावी करायची, हाच काय तुमचा कारभार? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी समिती प्रशासनाला केला. संबंधित व्यापाऱ्याने माफी मागितल्याशिवाय सौदे सुरू होणार नसल्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला. अखेर दुपारी अडीच वाजता समिती प्रशासनाने शेतकरी व व्यापाऱ्यांबरोबर बैठक घेऊन वादावर तोडगा काढला. दुपारी तीननंतर सौदे पूर्ववत सुरू झाले. (प्रतिनिधी)लायसन्स रद्द कराव्यापाऱ्यांना कांदा परवडत नसेल, तर बाजार समितीने मार्केट बंद करीत असल्याचे सांगावे. शेतकरी पर्याय बघेल. दोनशे किलोमीटरवरून येऊन अपमान करता. शेतकऱ्यांवर अरेरावी करणाऱ्या व्यापाऱ्यांची लायसन्स रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. वरातीमागून घोडेतीन तास सौदे ठप्प झाल्याने शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला होता. अशा वेळी तातडीने प्रशासक मंडळाने हस्तक्षेप करून तोडगा काढणे गरजेचे होते; पण दुपारी दोनपर्यंत इकडे अशासकीय प्रशासक मंडळातील एकही सदस्य फिरकला नाही. दोननंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष समितीत आले. व्यापारी जाणीवपूर्वक दर पाडतात. सांगली मार्केटमध्ये २३ रुपये दर चालू असताना येथे १७ रुपयांच्यावर दर जात नाही. उलट आम्हालाच अरेरावीची भाषा वापरली जाते आणि बाजार समिती मूग गिळून गप्प बसते, हे योग्य नाही. - संतोष तोडकर, शेतकरी, श्रीगोंदा