शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

कोल्हापूर : अर्थसंकल्पात रोजगाराधारित उत्पादक क्षेत्रास प्राधान्य हवे : जे. एफ. पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 16:39 IST

देशाचा आर्थिक विकास हा रोजगार दरावर अवलंबून असतो. सद्य:काळातील रोजगाराची स्थिती विचारात घेता, आगामी २०१८-१९ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प हा उत्पादक अशा रोजगार निर्मिती क्षेत्रास प्राधान्य देणारा असावा, असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील यांनी येथे केले.

ठळक मुद्दे शिवाजी विद्यापीठातील चर्चासत्रमहिला सबलीकरणाचे धोरण, जीएसटीची तुलनात्मक मांडणी

कोल्हापूर : देशाचा आर्थिक विकास हा रोजगार दरावर अवलंबून असतो. सद्य:काळातील रोजगाराची स्थिती विचारात घेता, आगामी २०१८-१९ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प हा उत्पादक अशा रोजगार निर्मिती क्षेत्रास प्राधान्य देणारा असावा, असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील यांनी येथे केले.शिवाजी विद्यापीठाच्या बँक आॅफ इंडिया चेअर इन रुरल बँकिंग आणि अर्थशास्त्र अधिविभागातर्फे ‘अर्थसंकल्प २०१८ पूर्व’ चर्चासत्रात ते बोलत होते. विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागातील या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, तर उद्योजक सुरेंद्र जैन प्रमुख उपस्थित होते.

ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. पाटील म्हणाले, कल्याणकारी राज्याची निर्मिती करतानाच वित्तीय तुटीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आगामी अर्थसंकल्पात सरकारला मोठी कसरत करावी लागणार आहे. आगामी अर्थसंकल्पात वित्तीय कल्याणकारी, न्यायिक कल्याणकारी व वितरण कल्याणकारी या घटकावर अधिक लक्ष द्यावे. याशिवाय जीएसटी अंमलबजावणीनंतर प्रत्यक्ष करांमध्ये सुधारणा, स्वयंरोजगार व रोजंदारीवर काम करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला करप्रणालीमध्ये समाविष्ट करण्याचे धोरण सरकारने अर्थसंकल्पातून स्वीकारावे.

कुलसचिव डॉ. नांदवडेकर म्हणाले, शिक्षण व संशोधन क्षेत्रांत सरकारने अधिकाधिक भर देण्याबरोबर शिक्षण क्षेत्र करमुक्त करावे. या कार्यक्रमास कार्यशाळेचे संयोजक डॉ. व्ही. बी. ककडे, समन्वयक डॉ. एम. एस. देशमुख, मानव्यशास्त्र अधिष्ठाता डॉ. भारती पाटील, विभागप्रमुख प्रा. डॉ. पी. एस. कांबळे, आदी उपस्थित होते. डॉ. ककडे यांनी प्रास्ताविक केले. सहायक प्राध्यापक एस. पी. पंचगल्ले यांनी सूत्रसंचालन केले. सहायक प्राध्यापक एस. टी. कोंबडे यांनी आभार मानले.महिला सबलीकरणाचे धोरण, जीएसटीची तुलनात्मक मांडणीया चर्चासत्रात अधिष्ठाता डॉ. भारती पाटील यांनी महिला सबलीकरण धोरणाच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेतील लिंगतफावत दूर करण्यासाठी सरकारने अर्थसंकल्पात त्या प्रकारची तरतूद करावी, असे संगितले. सुरेंद्र जैन यांनी जीएसटी व उद्योगक्षेत्र यांची तुलनात्मक मांडणी केली.

मनीष झंवर यांनी कृषी विकासासाठी भागीदारी शेतीची आवश्यकता स्पष्ट केली. डॉ. ए. आर. पडोशी यांनी विकास आणि रोजगार यांचा परस्परसंबंध व त्यांची सर्वसमावेशक वृद्धीतील भूमिका स्पष्ट केली. महेश शिंदे यांनी कर संरचना, शाश्वत विकास यांचा आर्थिक दृष्टिकोनातून आढावा घेतला.

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरuniversityविद्यापीठ