शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

कोल्हापुरात दिवसभर उघडीप सायंकाळी जोरदार पाऊस

By admin | Updated: July 2, 2016 00:43 IST

धरणक्षेत्रात अतिवृष्टी : पंचगंगेची पातळी १२ फुटांवर; कुंभी, भोगावती नद्यांचे पाणी पात्राबाहेर

कोल्हापूर : जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभर पावसाची उघडीप राहिली. सायंकाळी मात्र पावसाने दमदार हजेरी लावली. धरणक्षेत्रात सरासरी ९२ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाल्याने पाणीपातळीत वाढ झाली असून, पंचगंगा नदीची पातळी १२ फुटांपर्यंत पोहोचली आहे. जिल्ह्यात सरासरी २८.६२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेले दोन-तीन दिवस जिल्ह्यात पावसाचा असणारा जोर शुक्रवारी सकाळपासून काहीसा कमी झाला होता. शहरात दिवसभर पावसाने एकदम विश्रांती घेतली होती. सायंकाळी पाचनंतर पावसाने दमदार हजेरी लावली. तब्बल तासभर पावसाने अक्षरश: झोडपून काढल्याने शहरात पाणीच पाणी झाले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप राहिली. शुक्रवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात ३४३.४४ मिलिमीटर पाऊस झाला असून, सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात ६२ मिलिमीटर झाला आहे. शाहूवाडी ५८, पन्हाळा ३७, राधानगरी ३०.६७, भुदरगड ३३.४०, आजरा ३६.२५ मिलिमीटर पाऊस झाला. धरणक्षेत्रात अतिवृष्टी झाली असून सर्वाधिक पाऊस कडवी परिसरात १४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. नद्यांच्या पातळीत कमालीची वाढ झाली असून, पंचगंगा नदीची पातळी १२ फुटांपर्यंत पोहोचली आहे. राजाराम बंधाऱ्यातून प्रतिसेकंद ३२६६ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू असून कुंभी, भोगावती नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले आहे.राजाराम बंधाऱ्याजवळ पाणीपातळीत वाढकसबा बावडा : पावसाची दोन-तीन दिवसांपासून संततधार कायम असल्यामुळे ‘राजाराम’ बंधाऱ्याजवळ पाणीपातळीत वाढ होऊन ती आता १६ फुटांवर गेली आहे. १८ फुटाला बंधारा पाण्याखाली जातो. सध्या बंधाऱ्याजवळ नदीचे पाणी घाटाच्या पायरीजवळ आले आहे. पाण्याच्या पातळीत हळूहळू वाढ होत आहे. पाऊस सलग आणखी एक-दोन दिवस झाल्यास बंधारा पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. बंधाऱ्याजवळ पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने नदीपात्रातील महादेवाचे मंदिर पाण्यात बुडाले आहे. मंदिराचा कळस तेवढा दिसत आहे.